AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Omicron upadate : राजस्थानमध्ये ओमिक्रॉनचा बळी, महाराष्ट्रासाठीही धोक्याची घंटा!

पिंपरी-चिंचवड नंतर राजस्थानमध्येही ओमिक्रॉनचा बळी गेला आहे. देशात सध्या ओमिक्रॉनच्या रूग्णांनी दोन हजारांचा टप्पा पार केला आहे.

Omicron upadate : राजस्थानमध्ये ओमिक्रॉनचा बळी, महाराष्ट्रासाठीही धोक्याची घंटा!
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: दादासाहेब कारंडे | Updated on: Jan 05, 2022 | 4:25 PM
Share

कोरोनाच्या स्फोटक आकडेवारीसोबत ओमिक्रॉनची दहशतही वाढत आहे. पिंपरी-चिंचवड नंतर राजस्थानमध्येही ओमिक्रॉनचा बळी गेला आहे. देशात सध्या ओमिक्रॉनच्या रूग्णांनी दोन हजारांचा टप्पा पार केला आहे. मुंबईवरील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस आणखी गडद होत आहे. महाराष्ट्राच्या एकूण कोरोना रुग्णांच्या आकडेवारीच्या तुलनेत एकट्या मुंबईतील कोरना रुग्णांची आकडेवारी निम्म्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे मुंबई पुन्हा तिसर्‍या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. ओमिक्रॉन जरी वेगाने पसरत असला तरी त्याचा मृत्यूदर कमी असल्याचे आतापर्यंत निदर्शनास आले होते, मात्र राजस्थानमध्येही ओमिक्रॉनमुळे रुग्णाचा बळी गेल्याने दहशत वाढली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये काही दिवसांपूर्वीच ओमिक्रॉनमुळे मृत्यू

पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा 28 डिसेंबर रोजी मृत्यू झाला होता. त्या रुग्णाला ओमिक्रॉनची लागण झाली होती असा अहवाल काही दिवसांपूर्वीच आला आहे. सदर व्यक्ती नायजेरियातून 12 डिसेंबरला आली होती. 17 डिसेंबरला त्यांना छातीत त्रास जाणवू लागला. म्हणून त्यास परदेशी रुग्णांसाठी राखीव असणाऱ्या भोसरी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी तपासात हृदय विकाराचा सौम्य धक्का असल्याचं तपासात निष्पन्न झालं. मग पुढील उपचारासाठी वायसीएम रुग्णालयातील रुबी एलकेअर कार्डियाक सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. तेथे उपचार सुरू असतानाच त्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणंही जाणवू लागली. म्हणून कोरोनाची चाचणी केली असता, अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर ओमिक्रॉन चाचणीसाठी नमुने देण्यात आले. अहवाल प्रतीक्षेत असतानाच संबंधित रुग्णाची तब्येत सुधारली होती. पण 28 डिसेंबरला पुन्हा हृदय विकाराचा झटका आला आणि त्यात ती व्यक्ती मृत्यू पावली, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

राज्यात कोरोना, ओमिक्रॉनचा कहर

काल राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा तब्बल 18 हजाराच्या पुढे गेलाय. तर साडे चार हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना आकडेवारीमुळे राज्यातील कोरोनास्थिती आता चिंताजनक बणल्याचं पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात काल 18 हजार 466 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 4 हजार 558 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात काल 20 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर राज्यात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 66 हजार 308 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रासाठी ही धोक्याची घंटा आहे.

Vivo V23 : कलर चेंजिंग इफेक्ट असलेला भारतातला पहिला स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमत…

Chemical fertilizer : रब्बी हंगामात दुहेरी संकट, रासायनिक खतांच्या दरात वाढ झाल्याने शेतकरी हतबल

pimpri chinchwad crime |दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळक्यांवर पोलिसांची कारवाई ; अशी केली अटक

Follow Us
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं विधान...
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं अगदी जिव्हारी लागणारं वक्तव्य
राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट
मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट: राज्याच्या विकासासाठी मागितले सहकार्य
रायगडला नवा पालकमंत्री. गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव...
रायगडला नवा पालकमंत्री. गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा
पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला,पालकमंत्रीपदी गोगावले, महाजन यांची नियुक्ती
रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले, नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट...
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट याचिकाकर्त्यांनाच नोटीस; ED, CBI...
दिमागी नक्षलवाद: सोशल मीडियावर नवीन ट्रेंड, लाखोंनी केले फॉलो
दिमागी नक्षल पार्टीचा सोशल मीडियावर धुमाकूळ: पंतप्रधानांच्या शब्दातून झालेली ऑनलाईन चळवळ
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना दिले तातडीचे निर्देश... झारखंड विद्यार्थी
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना दिले तातडीचे निर्देश... झारखंड विद्यार्थी आंदोलनावर अखेर राहुल गांधींनी सोडलं मौन
दिल्लीत राजकीय हालचालींना वेग! CM फडणवीस आणि पंतप्रधानांच्या भेटीत...
दिल्लीत राजकीय हालचालींना वेग! CM फडणवीस आणि पंतप्रधानांच्या भेटीत नेमकं काय घडलं? मोठी अपडेट समोर