AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्या दिवशीच पाकिस्तानवर भारताकडून मोठा हल्ला झाला असता, माजी अधिकाऱ्याचा पुस्तकात मोठा खुलासा

Abhinandan Vardhaman : पाकिस्तानी सैन्याने भारतीय हवाई दलाच्या पायलटला ताब्यात घेतल्यानंतर त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. भारताने यावर लगेचच कारवाई सुरु केली. आपल्या पायलटला परत आणण्यासाठी भारताने अतिशय आक्रमक भूमिका घेतल्याचं या माजी अधिकाऱ्याने आपल्या पुस्तकात सांगितलं आहे.

त्या दिवशीच पाकिस्तानवर भारताकडून मोठा हल्ला झाला असता, माजी अधिकाऱ्याचा पुस्तकात मोठा खुलासा
shailesh musale
shailesh musale | Updated on: Jan 09, 2024 | 6:06 PM
Share

Air strike inside story : भारतीय हवाईदलाचे पायलट अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानात ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर भारताच्या कठोर भूमिकेमुळे पाकिस्तानला अभिनंदन वर्धमानला सोडावं लागलं होतं. पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांचे भारताला शांत करण्याचे प्रयत्नही निष्फळ ठरत होते अशी परिस्थिती होती. तत्कालीन उच्चायुक्त अजय बिसारिया यांनी तत्कालीन घडामोडी उघड केल्या आहेत.

भारत काय करु शकते हे पाकिस्तानला माहीत होते

बिसारिया म्हणतात, ‘पुलवामा हल्ल्यानंतर लगेचच मी भारतात आलो आणि त्यातून निर्माण झालेल्या परिस्थितीवर लक्ष ठेवणाऱ्या टीमचा सदस्य होतो. त्यानंतर पाकिस्तानने वैमानिकाला परत न पाठवल्यास भारत हे प्रकरण आणखी वाढवण्याचा प्रयत्न करेल असा संदेश देत होता. आम्ही पाकिस्तानकडून जे काही ऐकत होतो आणि आमचे संभाषण जे काही होत होते, आम्हाला खात्री होती की पायलट परत येईल. कारण पाकिस्तानला माहित होते की त्याचे परिणाम गंभीर होणार आहेत.

इम्रान खान यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बोलायचे होते. पण ते फोनवर उपलब्ध नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारने ‘हत्याची रात्र’ तयार केली होती. बिसारिया यांनी सांगितले की, ‘पंतप्रधान मोदींनीही आपल्या भाषणात याचा उल्लेख केला होता. इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या संसदेत केलेल्या भाषणात भारताच्या पंतप्रधानांशी बोलण्याचा प्रयत्न केल्याचेही सांगितले होते.

पाकिस्तानावर होतं मोठं संकट

पाकिस्तानच्या संसदेतही यावर चर्चा झाली, ज्याची माहिती पाकिस्तानी खासदाराला होती. त्यांनी सांगितले की परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी आणि तत्कालीन लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी खासदारांना माहिती दिली होती आणि म्हटले होते की गंभीर संकट उद्भवत आहे आणि भारत कठोर भूमिका घेत आहे. अशा परिस्थितीत आम्हाला पायलटला परत पाठवावे लागेल.’

एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून देखील भारतात घुसण्याचा प्रयत्न झाला. पण भारतीय हवाई दल देखील तयार होते. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानचे एक विमान पाडले. पण त्यांच्या विमानाला देखील आग लागल्याने विमान पाकिस्तानच्या हद्दीतच पडले. मात्र, भारताच्या कठोर भूमिकेमुळे अभिनंदन वर्धमानला काही दिवसांतच सोडून देण्यात आले.

Follow Us
मोठी बातमी! मनोज जरांगेंचे वडील त्यांच्या भेटीसाठी रुग्णालयात दाखल;
मोठी बातमी! मनोज जरांगेंचे वडील त्यांच्या भेटीसाठी रुग्णालयात दाखल; लेकाची प्रकृती खालावल्याचं कळताच...
नाशिकमधील जीवघेण्या खड्ड्यांमुळे ठाकरे सेनेचा महापालिकेवर भव्य मोर्चा
नाशिकमधील जीवघेण्या खड्ड्यांमुळे ठाकरे सेनेचा महापालिकेवर भव्य मोर्चा
चाळणी झालेल्या रस्त्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन; नाशिककरांसाठी..
चाळणी झालेल्या रस्त्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन; नाशिककरांसाठी संजय राऊत मैदानात, पहा व्हिडीओ
ज्याची भीती तेच... महाराष्ट्रातदेखील बिहार सारखं होणार, SIR बाबत
ज्याची भीती तेच... महाराष्ट्रातदेखील बिहार सारखं होणार, SIR बाबत बड्या नेत्याचा धक्कादायक दावा
मराठा आरक्षण आंदोलन: मनोज जरांगेंची ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांची मागणी
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांची मागणी, सत्ता जाण्याची शक्यता
तुमचं सरकार पाडणार, मराठ्यांचा तळतळाट... मनोज जरांगे काडाडले,
तुमचं सरकार पाडणार, मराठ्यांचा तळतळाट... मनोज जरांगे काडाडले, पुर्ण 58 लाख...
रस्त्याच्या दुरवस्थेचा व्हिडिओ बनवणाऱ्या मुली राज ठाकरेंच्या भेटीला
रस्त्याच्या दुरावस्थेचा व्हिडिओ बनवणाऱ्या मुली राज ठाकरेंच्या भेटीला
देशातील राजकारणाचे 3 Idiots कोण? राऊतांनी एकदमच सांगितलं... व्हिडीओ
Sanjay Raut | देशातील राजकारणाचे 3 Idiots कोण? राऊतांनी एकदमच सांगितलं... व्हिडीओ तुफान व्हायरल
सिंहगड हाणामारीचे नवे व्हिडीओ: १५ ऑगस्टची घटना, पोलिसांचा तपास सुरू
सिंहगडावरील हाणामारीचे नवे व्हिडीओ समोर. १५ ऑगस्टच्या घटनेने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
दक्षिणेकडे भाजपला मोठा धक्का, पक्षातील बड्या नेत्याचा अचानक राजीनामा
दक्षिणेकडे भाजपला सर्वात मोठा धक्का, पक्षातील बड्या नेत्याने अचानक दिला राजीनामा अन्...