AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं, DGMO पत्रकार परिषदेत मोठी माहिती समोर

ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं आहे. भारताचे DGMO लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे.

'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं, DGMO पत्रकार परिषदेत मोठी माहिती समोर
DGMOImage Credit source: Social Media
| Updated on: May 11, 2025 | 7:15 PM
Share

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी एक महत्त्वाचा युद्धविराम करारावर सहमती झाली आहे. या कराराचा पुढाकार पाकिस्तानकडून घेण्यात आला, ज्याला भारताने आपल्या अटींसह स्वीकारले. हा करार दोन्ही देशांच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिट्री ऑपरेशन्स (DGMO) स्तरावर झाला. भारतीय DGMO आज यासंदर्भात पत्रकार परिषद घेत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

पाकिस्तानात 9 दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त

भारताचे DGMO लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सांगितले की, आम्ही अनेक दहशतवादी ठिकाणांची ओळख पटवली होती. मात्र, भीतीमुळे अनेक दहशतवादी ठिकाणे रिकामी झाली होती. भारताने अत्यंत विचारपूर्वक लक्ष्य निश्चित केले होते. लष्कराने दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर दिले. लष्कराने पाकिस्तानात 9 दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली. त्यांनी सांगितले की, 100 हून अधिक दहशतवादी हल्ल्यात मारले गेले. आम्ही तीन मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यामध्ये मुदस्सर खास, हाफिज जमील आणि यूसुफ अजहर यांचा समावेश आहे. या दहशतवाद्यांनी पुलवामा हल्ला आणि आयसी814चे अपहरण केले होते. वाचा: दर गुरुवारी हाफिज सईद कोणते काम करतो? माजी शागिर्दाने केला खुलासा

अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांनी असीम मुनीर यांच्याशी केली चर्चा

सूत्रांनुसार, 7 मे रोजी भारताने पाकिस्तानच्या DGMO ला कळवले होते की, त्याने पाकिस्तानातील दहशतवादी पायाभूत सुविधांना लक्ष्य केले आहे. परंतु पाकिस्तानकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर 9 मे रोजी भारताने हवाई हल्ले केले आणि 10 मे च्या सकाळी गोळीबार केला. या घटनांनंतर अमेरिकी परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्याशी चर्चा केली आणि नंतर भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांना फोन करून सांगितले की, पाकिस्तान चर्चेसाठी तयार आहे.

Follow Us
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?
जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये...
Tejaswi Ghosalkar | जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी 3 डबे राखीव ठेवण्याची मागणी!
मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद
Mohan Bhagwat | मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद; भारताच्या उज्ज्वल भविष्यावर मांडणार विचार
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र 'या' नेत्याने फिरवली पाठ, नेमकं कारण...
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?