AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Sindoor: सरकार लढायला तयार नव्हते, अवघ्या 30 मिनिटात सरेंडर केलं, राहुल गांधींचा आरोप

लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधींनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. भारत सरकारने अवघ्या 30 मिनिटात माघार घेतली. याबाबत खुद्ध संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी माहिती दिली आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

Operation Sindoor: सरकार लढायला तयार नव्हते, अवघ्या 30 मिनिटात सरेंडर केलं, राहुल गांधींचा आरोप
Rahul Gandhi
| Updated on: Jul 29, 2025 | 5:47 PM
Share

लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरु आहे. यावेळी बोलताना लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधींनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. भारत सरकारने अवघ्या 30 मिनिटात माघार घेतली. याबाबत खुद्ध संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी माहिती दिली आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आपले भाषण सुरु करताना राहुल गांधी म्हणाले की, पहलगाममधील हल्ल्यानंतर या हाऊसमधील प्रत्येक व्यक्तीने पाकिस्तानचा निषेध नोंदवला. या घटनेनंतर आम्ही सरकार आणि सैन्याच्या पाठी खंबीरपणे उभे राहिलो. काही सीनियर नेत्यांनी आतातायी विधाने केल्याचं ऐकलं. आपण सर्व एकसंघपणे उभे राहिलो, याचा आम्हाला विरोधक म्हणून अभिमान आहे. जे झालं ते चुकीचं झालं. प्रत्येकाने निषेध नोंदवला.

अध्यक्ष महोदय, राजकीय काम करताना आपण संपूर्ण देशात जातो. लोकांना भेटतो. सैन्याच्या कुटुंबातील कुणाच्याही घरी जातो, जेव्हा त्यांच्या हातात हात मिळवतो, तेव्हा भारतीय सैन्याचा माणूस असल्याचं कळतं. हात मिळवताच कळतं हा टायगर आहे. त्याला हलवलं जाऊ शकत नाही. त्यांना कुठेही पाठवा तो देशासाठी लढायला, मरायला तयार असतो. टागरला संपूर्ण स्वातंत्र्य द्यावं लागतं. टागरला तुम्ही बांधू शकत नाही. टायगरकडून पूर्ण काम घ्यायचं असेल तर त्याला सूट द्यावी लागेल असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, ‘काल राजनाथ सिंह यांचं भाषण ऐकत होतो. राजनाथ म्हणाले, ऑपरेशन सिंदूर हे पहाटे 1 वाजता सुरू झालं. नंतर म्हणाले, ऑपरेशन सिंदूर 22 मिनिटे चालले. नंतर म्हणाले, 1.30 वाजता आम्ही पाकिस्तानला फोन केला. आणि सांगितलं आम्ही नॉन मिलिट्री टार्गेटवर हल्ला केला. आम्हाला डिस्क्लेशन नाही पाहिजे. हे त्यांचे शब्द होते. भारताच्या डीजीएमओने सांगितलं, की सीजफायर करा.

रात्री 1.30 वाजता. तुम्ही पाकिस्तानला काय सांगितलं. तुम्ही सांगितलं आम्ही मिलिट्री टार्गेट केलं नाही. दोन लोकांमध्ये भांडण होतं. एक दुसऱ्याला ठोसा मारला, आणि म्हणतो आम्हाला लढायचं नाही. म्हणजे पाकिस्तानला तुम्ही सांगितलं की आमची लढायची इच्छा नाही. म्हणजे तुम्हाला पाकिस्तानशी युद्ध करायचं नव्हतं. आम्हाला लढाई करायची नाही. आमची लढायची इच्छा नाही. हे तुम्ही सांगितलं. तुम्ही अवघ्या 30 मिनिटात सरेंडर झाला असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

Follow Us
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,.
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले....
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले.....
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत.
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28लाखांची लाच घेताना रंगे.
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28लाखांची लाच घेताना रंगे..
गडचिरोलीत उष्णतेचा कहर; ट्रान्सफॉर्मर जळाले, वीजपुरवठा खंडित...
गडचिरोलीत उष्णतेचा कहर; ट्रान्सफॉर्मर जळाले, वीजपुरवठा खंडित....
उबाठा गटाची हीच मानसिकता...शिंदे गटाची ताकद वाढल्याने...
उबाठा गटाची हीच मानसिकता...शिंदे गटाची ताकद वाढल्याने....
धाराशिवमध्ये महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग, वाढत्या उष्णतेमुळे उडाला
धाराशिवमध्ये महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग, वाढत्या उष्णतेमुळे उडाला.
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन.
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन...
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन....