AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! वक्फ सुधारणा विधेयक कायद्याच्या कचाट्यात? एकूण 15 याचिका दाखल; नेमकी मागणी काय?

वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात देशभरात एकूण 15 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

मोठी बातमी! वक्फ सुधारणा विधेयक कायद्याच्या कचाट्यात? एकूण 15 याचिका दाखल; नेमकी मागणी काय?
supreme court
| Updated on: Apr 08, 2025 | 2:40 PM
Share

Waqf Amendment Act 2025 : वक्फ सुधारणा विधेयक 2025 चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. हे विधेयक आता लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहांत मंजूर झाले असून राष्ट्रपतींनीही या विधेयकाला मंजुरी दिली आहे. आता या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले आहे. असे असले तरी या कायद्याला देशभरातून विरोध होत आहे. या विधेयकाविरोधात देशभरातून तब्बल 15 याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत.

सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी होण्याची शक्यता

वक्फ विधेयकाविरोधात सर्वोच्च न्यायालयात एकूण 15 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. येत्या 15 एप्रिलला सुप्रीम कोर्टात सर्व याचिकांवर सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी होण्याची शक्यता आहे. नुकतेच केंद्र सरकारने वक्फ सुधारणा विधेयक समंत केले आहे. हे विधेयक बेकायदेशीर आणि अन्यायकारक असल्याचा दावा या याचिकांमधून करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता न्यायालय या याचिकांवर नेमका काय निर्णय देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

याचिका नेमकी कोणी-कोणी दाखल केली?

याचिका दाखल करणाऱ्यांमध्ये अनेक पक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे. डीएमके पक्षानेही या विधेयकाला विरोध कलेा असून सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या विधेयकाच्या माध्यमातून तामिळनाडूतील एकूण 50 लाख तसेच देशभरातील साधारण 20 कोटी मुस्लिमांच्या मूलभूत अधिकारांचे हनन केले जात आहे, असे म्हणण्यात आले आहे. तमिळनाडूच्या विधानसभेत हे विधेयक केंद्राने मागे घ्यावे, अशी मागणी करणारा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. राजद पक्षानेही या विधेयकाला विरोध करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याशिवाय काँग्रेसचे कासदार इम्रान प्रतापगढी यांनीही विधेयकाला विरोध करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

ओवैसी यांनीही केली याचिका

एमायएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध करत सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. मणिपूरचे आमदार शेक नुरूल हसन यांनीही मी विधेयकाविरोधात न्यायालयात दाद मागणार आहे, असे स्पष्ट केले आहे. नॅशनल पिपल्स पार्टीचे आमदार हहसन यांनीही या विधेयकाला विरोध करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.