AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वतःचे तीन सैनिक गमावले, खोटं बोलून पाकिस्तान स्वतःच्याच जाळ्यात अडकला

उत्तर देत आम्हीही भारताच्या पाच सैनिकांचा खात्मा केला, असा दावा पाकिस्तानने केला होता, जो खोटा (Pakistan Army soldiers killed) ठरलाय. अशा प्रकारची कोणतीही घटना घडली नसल्याचं भारतीय सैन्याने स्पष्ट केलंय.

स्वतःचे तीन सैनिक गमावले, खोटं बोलून पाकिस्तान स्वतःच्याच जाळ्यात अडकला
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Aug 15, 2019 | 8:56 PM
Share

नवी दिल्ली : केंद्र सरकारने जम्मू काश्मीरचं पुनर्गठन केल्यापासून पाकिस्तानचा तिळपापड झालाय. आंतरराष्ट्रीय स्तरावर दाद मागूनही कुणी प्रतिसाद न दिल्याने आणखीच संतापलेल्या पाकिस्तानने आता खोटे दावे करणं सुरु केलंय. दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये जाणं सोपं व्हावं यासाठी पाकिस्तानी सैन्याकडून सतत गोळीबार केला जातोय. यात भारताने प्रत्युत्तर दिलं आणि पाकिस्तानच्या तीन सैनिकांना कंठस्नान (Pakistan Army soldiers killed) घातलं. पण याला उत्तर देत आम्हीही भारताच्या पाच सैनिकांचा खात्मा केला, असा दावा पाकिस्तानने केला होता, जो खोटा (Pakistan Army soldiers killed) ठरलाय. अशा प्रकारची कोणतीही घटना घडली नसल्याचं भारतीय सैन्याने स्पष्ट केलंय.

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सैन्याने पुँछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये सकाळी 7 वाजता गोळीबार सुरु केला. भारतीय जवानांनीही याला सडेतोड उत्तर दिलं आणि पाकिस्तानला यात मोठं नुकसान सहन करावं लागलं. सकाळी 7 ते सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत झालेल्या गोळीबारात पाकिस्तानचे तीन जवान मारले गेले. पाकिस्तानने स्वतः आपले सैनिक मारले गेल्याचं कबूल केलंय.

जम्मू काश्मीरचं दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन केल्यामुळे पाकिस्तानचा संताप झालाय. या निर्णयामुळे आता काश्मीरमध्ये दहशतवाद पोसता येणार नाही, अशी पाकिस्तानला भीती आहे. यासाठीच एकीकडे पाकिस्तानी सैनिक गोळीबार करुन भारतीय सैनिकांचं लक्ष विचलित करतात आणि दहशतवाद्यांना घुसण्यासाठी मदत करतात. पण पाकिस्तानचा एकही प्रयत्न भारतीय जवानांनी यशस्वी होऊ दिलेला नाही.

भारतीय सैन्याचे नॉर्थर्न कमांडचे प्रमुख ले. जनरल रणबीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानने दहशतवाद्यांची मदत करण्याचा अनेकदा प्रयत्न केलाय. पण कायम सतर्क असलेल्या भारतीय सैन्याने हे प्रयत्न हाणून पाडले आहेत.

Follow Us
ऑपरेशन टायगर ॲक्टिव्ह? बुलढाणा असेल बालेकिल्ला अन् तब्बल...
ऑपरेशन टायगर ॲक्टिव्ह! बुलढाणा असेल बालेकिल्ला अन् तब्बल... शिवसेनेच्या कोर्टातील निकालाआधीच मोठा बॉम्ब
ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर आढळल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न
कल्याणमध्ये ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर आढळल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न
मुंडे भाऊ-बहिण पुन्हा चर्चेत; थेट म्हणाले, आमच्यातील वाद आता...
मुंडे भाऊ-बहिण पुन्हा चर्चेत; थेट म्हणाले, आमच्यातील वाद आता... बीडच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
पान मसाल्याच्या जाहिरातीवरून FDA ची तीन बॉलीवूड कलाकारांना नोटीस
पान मसाल्याच्या जाहिरातीवरून FDA ची तीन बॉलीवूड कलाकारांना नोटीस.
'प्रत्येक बहिणीला वाटते एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत'
'प्रत्येक बहिणीला वाटते एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत'-ज्योति वाघमारे
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुजय विखे आक्रमक
'ट्रम्प सारखा वेडा माणूस मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिला नाही'-सुजय विखे
१६ ऑगस्ट २०२६ च्या ठळक बातम्या: महिला आरक्षण, देशातील प्रमुख घडामोडी
१६ ऑगस्ट २०२६: महाराष्ट्रातील आणि देशातील प्रमुख घडामोडी
मुंबई लोकल: मध्य आणि हार्बर मार्गांवर आज मेगाब्लॉक
मुंबई लोकल: मध्य आणि हार्बर मार्गांवर आज मेगाब्लॉक, प्रवाशांना उशीर
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस