AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाइंड मुश्ताक जरगरसह भारताने सोडले होते हे तीन धोकादायक दहशतवादी, जाणून घ्या ती घटना

Pahalgam Terror Attack: कंदहार विमान अपहरण केल्यानंतर 176 प्रवाशांच्या बदल्यात मसूद अझहर, मुश्ताक जरगर आणि उमर शेख यांना सोडण्याची मागणी दहशतवाद्यांनी केली. भारत सरकारने प्रवाशांना सोडवण्यासाठी या तीन दहशतवाद्यांना सोडवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या दहशतवाद्यांना सोडल्यावर 176 भारतीय प्रवाशी परत आले होते.

पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाइंड मुश्ताक जरगरसह भारताने सोडले होते हे तीन धोकादायक दहशतवादी, जाणून घ्या ती घटना
mushtaq ahmed zargar
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 06, 2025 | 2:37 PM
Share

Pahalgam Terror Attack: भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध होण्याचा धोका आहे. त्याला कारण दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये घडवलेला हल्ला आहे. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर पावले उचलली. आता भारत दहशतवादी आणि दहशतवाद्यांची साथ देणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करणार आहे. पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाइंड म्हणून मुश्ताक अहमद याचे नाव समोर आले आहे. त्याला कंदहार विमान अपहरण प्रकरणानंतर भारताने सोडले होते. आता त्याच दहशतवाद्यासह इतर तिघांनी भारतात अनेक वेळा दहशतवादी कारवाया घडवून आणल्या आहेत.

काय आहे ते प्रकरण

भारतीय सुरक्षा दलाने मोठ्या प्रयत्नानंतर तीन धोकादायक दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यांची नावे मसूद अझहर, मुश्ताक जरगर आणि उमर शेख आहे. हे तिन्ही दहशतवादी भारताच्या कारागृहात होते. या दहशतवाद्यांना भारताने अटक केल्यानंतर पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय अडचणीत आली होती. आयएसआयकडून या दहशतवाद्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले होते.

पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी मसूद अझहर, मुश्ताक जरगर आणि उमर शेख यांना सोडवण्यासाठी मोठा कट रचला. या दशतवाद्यांनी इंडियन एयरलायन्सचे विमान आयसी-814 चे हवेतच अपहरण केले. त्यानंतर हे विमान अफगाणिस्तानमधील कंदहारमध्ये नेले. परंतु पायलटने इंधन कमी असल्याचे कारण दिल्यावर काही वेळ अमृतसरमध्ये विमान उतरवण्यात आले. त्यानंतर हे विमान पाकिस्तानात गेले. त्या ठिकाणावरुन कंदहार येथे विमान पोहचले.

कंदहार विमान अपहरण केल्यानंतर 176 प्रवाशांच्या बदल्यात मसूद अझहर, मुश्ताक जरगर आणि उमर शेख यांना सोडण्याची मागणी दहशतवाद्यांनी केली. भारत सरकारने प्रवाशांना सोडवण्यासाठी या तीन दहशतवाद्यांना सोडवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या दहशतवाद्यांना सोडल्यावर 176 भारतीय प्रवाशी परत आले होते.

भारताने सोडलेल्या या तीन दहशतवाद्यांमध्ये सर्वात मोठे नाव मसूद अझहर आहे. त्याची जैश-ए-मोहम्मद संघटना आहे. मुंबई हल्ला, पुलमावा हल्ल्यात त्याचे नाव आले. दुसरा दहशतवादी मुश्ताक जरगर आहे. त्याचे नाव पहलगाम हल्ल्यात आहे. तिसरा दहशतवादी उमर शेख होता. मुश्ताक जरगर काश्मीरमध्ये काम करणारा एक धोकादायक दहशतवादी होता. त्याने अनेक हल्ले घडवून आणले होते. तसेच अनेक हल्ल्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. त्यानंतर त्याला 1992 मध्ये अटक करण्यात आली होती. जरगर खूपच धोकादायक दहशतवादी आहे. यामुळे त्याला पाकिस्तानने आश्रय दिला.

Follow Us
ठाकरेंना सर्वात मोठा धक्का! कालच बैठक घेतली अन् आज ठाकरेंच्या नगरसेवका
ठाकरेंना सर्वात मोठा धक्का! कालच बैठक घेतली अन् आज ठाकरेंच्या नगरसेवकांनी... अखेर ज्याची भीती तेच घडलं
लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या मुलांना... अभिजीत दीपके यांचा संताप
Abhijeet Dipke | लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या मुलांना... अभिजीत दीपके यांचा संताप, नेमकं काय घडलं?
थोड्याच वेळात शिवसेना चिन्हावर सुनावणी, इतक्यात वकील सरोदेंचं वक्तव्य
अध्यक्षांनी साक्ष, पुरावे, प्रश्नोत्तरे सगळंच... थोड्याच वेळात शिवसेना पक्ष चिन्हावर सुनावणी, इतक्यात वकील असीम सरोदेंचं विधान चर्चेत
संजय राऊतांकडे तडजोड करण्याची मागणी, नारायण राणे मानहानी प्रकरणी...
संजय राऊतांकडे तडजोड करण्याची मागणी, नारायण राणे मानहानी प्रकरणी नेमकं काय घडलं?
शिंदे यांची धावपळ आणि... शिवसेना पक्षाची सुनावणी सुरु होण्याआधीच बड्या
शिंदे यांची धावपळ आणि... शिवसेना पक्षाची सुनावणी सुरु होण्याआधीच बड्या नेत्याचं मोठं विधान
सुनेत्रा पवारांचे अध्यक्षपद खरंच अवैध? सचिदानंद सिंह यांची पुन्हा रिमा
सुनेत्रा पवारांचे अध्यक्षपद खरंच अवैध? सचिदानंद सिंह यांची पुन्हा रिमाईंडर नोटीस, आता...
मूळ शिवसेना कुणाची? 7 दिवसांच्या सुनावणीनंतर निकाल कोणत्या वळणावर?
मूळ शिवसेना कुणाची? 7 दिवसांच्या सुनावणीनंतर निकाल कोणत्या वळणावर? आज ठाकरेंचे वकील...
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं घडणार? शरद पवार आणि पार्थ पवार भेटीनंतर
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं घडणार? शरद पवार आणि पार्थ पवार भेटीनंतर भलत्याच चर्चांना उधाण, 3 तासांच्या बैठकीत...
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं विधान
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं सुचक वक्तव्य, अखेर मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठ विधान
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेतील अपात्रतेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठं विधान; काय म्हणाले?