AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली (Parakash Javadekar allegations on Congress).

काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप
| Updated on: Jan 27, 2021 | 9:40 PM
Share

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी संपूर्ण दिल्ली धुमसली. दिल्लीत शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण आले. या हिंसाचारात अनेक पोलीस जखमी झाले. या प्रकरणावर केंद्र सरकारकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली आहे. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारची बाजू मांडली. यावेळी त्यांनी दिल्ली पोलिसांचं कौतुक केलं. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली (Parakash Javadekar allegations on Congress).

“भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता आणि यश वाढत आहे. काँग्रेस आणि कम्युनिस्टांची लोकप्रियता आणि यश घटत आहे. त्यांना राजकीय घराण्यांची चिंता आहे. लोकांनी त्यांना नाकारलं आहे. मात्र, तीच काँग्रेस अहंकारात लोकांना भडकवण्याचं काम करत आहे. काल दिल्ली पोलिसांनी अद्भूत संयम दाखवला. त्यांच्याजवळ शस्त्र होते. मात्र, त्यांनी चालवले नाहीत. तलवारीने, काठ्यांनी प्रहार झाले तरीही पोलिसांनी संयम दाखवलं. हे निश्चितच प्रशंसनीय काम आहे”, असं प्रकाश जावडेकर म्हणाले.

“सरकारने तर दहा वेळा चर्चा केलीय. वर्ष-दीडवर्ष कायदा थांबवण्याची आणि स्थगिती करण्याची तयारी दाखवली आहे. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे कोणते अधिकार कमी झाले आहेत? एमएसपी, मंडी, मालकी हक्क कशालाही ठेच बसलेली नाही. उलट या कायद्यांमधून शेतकऱ्यांना पर्याय सूचवण्याचा मार्ग आहे. काँग्रेसलाही या गोष्टील माहिती आहे. मात्र, काँग्रेसला ते होऊ द्यायचं नाही”, असा आरोप त्यांनी केला.

“निवडणुकीत जे पराभवी झाले आहेत ते देशभरात एकत्र येवून देशातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. २६ जानेवारीला काँग्रेस अशाप्रकारे शेतकऱ्यांना भडकवू शकते, यावरुन काँग्रेस कोणत्या थरावर आली आहे, त्याचं हे उदाहरण आहे. काँग्रेसच्या भडकवण्याच्या या राजकारणाला लोक नक्की उत्तर देतील”, असं जावडेकर म्हणाले.

“पंजाबमध्ये त्यांचं सरकार असताना हा सर्व प्रकार घडला आहे. काँग्रेसच्या अशा राजनीतीचा आम्ही निषेध करतो. जनताच त्याला योग्य उत्तर देणार आहे. याआधी त्यांनी सीएए कायद्यावेळी असाच प्रयत्न केला होता”, असा आरोप त्यांनी केला (Parakash Javadekar allegations on Congress).

हेही वाचा : Delhi Violence : आंदोलकांनी विश्वासघात केला, आम्ही संयम पाळला – दिल्ली पोलीस

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.