AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राचा चित्ररथ नाकारला, जे बेस्ट, त्यांनाच संधी : पियुष गोयल

हरियाणाचा चित्ररथही नाकारला गेला आहे. जे बेस्ट आहेत, त्यांना संधी दिली गेली आहे, असं पियुष गोयल म्हणाले.

महाराष्ट्राचा चित्ररथ नाकारला, जे बेस्ट, त्यांनाच संधी : पियुष गोयल
| Updated on: Jan 03, 2020 | 11:51 AM
Share

मुंबई : महाराष्ट्राच्या चित्ररथाला नाकारण्यामागे कोणताही उद्देश नाही, ही प्रक्रिया नियमानुसार झाली, असा दावा रेल्वे आणि केंद्रीय वाणिज्य-उद्योग मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal on Maharashtra Tableau) यांनी केला आहे. ‘भारताला सीएएची गरज का?’ या विषयावर मुंबईत आयोजित जाहीर कार्यक्रमात गोयल बोलत होते.

चित्ररथाला नाकारणं हे नियमाच्या अनुषंगाने झालेलं आहे. हरियाणाचा चित्ररथही नाकारला गेला आहे. जे बेस्ट आहेत, त्यांना संधी दिली गेली आहे, असं पियुष गोयल म्हणाले. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालच्या चित्ररथांना परवानगी नाकारल्यामुळे भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांशी आकसातून दुजाभाव केल्याचा आरोप झाला होता. त्यावर भाजपशासित हरियाणाचा दाखला गोयलांनी दिला.

यंदा प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथसंचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही. गृहमंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाने महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारली. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ अव्वल क्रमांक पटकावत होता.

विरोधक नागरी सुधारणा कायद्याबाबत अज्ञानी आहेत. चुकीच्या माहितीच्या आधारे तरुणांना भडकवण्याचं काम विरोधकांनी केलं आहे. हिंसा घडवून आणली जात आहे. सर्वांनी एकत्र येऊन ‘सीएए’साठी काम करायला हवं, असं आवाहन पियुष गोयल यांनी केलं. देशाच्या विभाजनाला काँग्रेस कारणीभूत असल्याचा घणाघातही गोयल यांनी केला.

शिवसेनेला टोला

काही राज्यात अनैतिक आघाडी तयार झाली आहे. काही पक्ष हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत होते, ते आता हिंदूंवर अत्याचार होत असताना गप्प बसले आहेत, अशा शब्दात पियुष गोयल यांनी शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतःच्या फायद्यासाठी सीएए विरोधात चुकीचा प्रचार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या चित्ररथाला केंद्राने परवानगी नाकारली

राज्यात मिश्र सरकार बसलं आहे. परंतु यामुळे महाराष्ट्राचं भविष्यात काय होईल, देव जाणे, अशी चिंताही पियुष गोयल यांनी व्यक्त केली. काँग्रेसला वाईट दिवस आले आहेत. केवळ 44 आमदार राज्यात निवडून आले. काँग्रेस दिशाहीन राजकीय पक्ष आहे, अशी टीका गोयल यांनी केली.

मुस्लिमांना चिंता करण्याचे कारण नाही. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी सर्वांच्या फायद्याची आहे. या नोंदणीची घोषणा मनमोहन सिंह यांनी केली होती. सीएए, एनआरसी आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीला जाणीवपूर्वक एकत्र केलं जात आहे, असंही पियुष गोयल म्हणाले. Piyush Goyal on Maharashtra Tableau

संबंधित बातम्या :

“चित्ररथ नाकारणं महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान, यातून केंद्र सरकारचा कोतेपणा दिसला”

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.