AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर पीएम किसान योजनेचे 2000 रुपये मिळणार नाहीत! शेतकऱ्यांनो तुम्ही ‘ही’ चूक करु नका

पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता सप्टेंबर महिन्यातील कोणत्याही तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो असं सांगण्यात आले आहे. 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान चार महिन्यांच्या अंतराने एका वर्षात 3 हप्त्यांमध्ये या योजनेचा हफ्ता दिला जातो. त्यानंतर, दुसरा हफ्ता हा क्रमांक 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान खात्यावर जमा होतो तर 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान तिसरा हप्ता मिळण्याची शक्यता असते.

...तर पीएम किसान योजनेचे 2000 रुपये मिळणार नाहीत! शेतकऱ्यांनो तुम्ही 'ही' चूक करु नका
| Updated on: Sep 04, 2022 | 8:19 AM
Share

नवी दिल्लीः केंद्र सरकारने चालू केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana)  12 वा हप्ता (12th installment) सप्टेंबर महिन्यातील कोणत्याही तारखेला जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठी नोंदणी करताना चुका केल्या होत्या त्यांचे पैसे मात्र अडकण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. तर ईकेवायसीही (EKYC) केली नसेल तरीही खात्यावर पैसे येणार नसल्याचेही बोलले जात आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. त्यामुळे देशातील अनेकांच्या खात्यावर चार महिन्यातून दोन हजार रुपये मिळत असल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो. आतापर्यंत केंद्र सरकारकडून या योजनेतून 11 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे आता त्याच शेतकऱ्यांना 12 व्या हफ्त्याची आशा लागून राहिली आहे.

पीएम किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार?

पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता सप्टेंबर महिन्यातील कोणत्याही तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो असं सांगण्यात आले आहे. 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान चार महिन्यांच्या अंतराने एका वर्षात 3 हप्त्यांमध्ये या योजनेचा हफ्ता दिला जातो. त्यानंतर, दुसरा हफ्ता हा क्रमांक 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान खात्यावर जमा होतो तर 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान तिसरा हप्ता मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे आता या सप्टेंबर महिन्यात तरी एक हफ्ता मिळण्याची आशा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.

योजनेच्या आरखड्यात दुरुस्त्या

ही योजना 2019 मध्ये सुरू झाली होती, तेव्हा या योजनेचा लाभ फक्त लहान आणि अत्यल्प शेतकऱ्यांनाच दिला जात होता. मात्र त्यानंतरच्या काळात या आराखड्यात अनेक दुरुस्त्या करण्यात आल्या आहे, आता देशातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

ई-केवायसीची अंतिम मुदत संपली

ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2022 होती. त्यामुळे शेतकऱ्यांकडून अद्याप ई-केवायसी केली गेली नाही तर मात्र यावेळचा पीएम किसान योजनेचा हफ्ता चुकणार आहे. पीएम किसान योजनेचा पुढील हप्ताही लवकरच खात्याव जमा होणार आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातही पैसे ट्रान्सफर होऊ शकतात, असे मानले जाते.

…म्हणून पैसे मिळणार नाहीत

ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठी नोंदणी करताना चुका केल्या होत्या, त्या शेतकऱ्यांनाही पैसे मिळताना अडचणी येणार आहेत. आधार कार्ड आणि बँक खात्यावर असलेल्या नावात जर चुका आढळल्या तरीही पैसे मिळताना अडचणी येण्याची शक्यता आहे. बँक खाते बरोबर नसले तरीही तुमचे पैसे गोठवले जाऊ शकतात. त्यायाशिवाय आयकर भरणारे किंवा सरकारी संस्थांमध्ये काम करणारे नागरिकही या योजनेपासून वंचित राहणार आहे.

गणेश नाईक यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय
गणेश नाईक यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय.
अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?
अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?.
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता.
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी.
अमरावतीत बस स्थानकाची दुर्दशा; जीर्ण इमारतीमुळे प्रवाशांमध्ये चिंता
अमरावतीत बस स्थानकाची दुर्दशा; जीर्ण इमारतीमुळे प्रवाशांमध्ये चिंता.
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका.
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया.
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला.
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले.
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल.