AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan : शेतकऱ्यांसाठी खुशखबर, आता पीएम किसानचे पैसे येण्यासही मांजर आडवी येणार नाही…

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर आता एक मोठा बदल करण्यात आला आहे. या योजनेतील ई-केवायसीच्या तारखेबाबत वेबसाइटवर दिलेले अपडेट काढून टाकण्यात आले आहे. आता या बदलानंतर योजनेतून मिळणाऱ्या 12 व्या हप्त्याबाबत मात्र वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत.

PM Kisan : शेतकऱ्यांसाठी खुशखबर, आता पीएम किसानचे पैसे येण्यासही मांजर आडवी येणार नाही…
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Sep 09, 2022 | 3:14 PM
Share

नवी दिल्लीः देशातील सगळ्यात मोठा वर्ग शेतीवर अवलंबून असलेला दिसून येतो. त्याच शेतीवर अनेक जण आपला उदरनिर्वाहही करत आहेत. देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्नही केले जात आहेत. शेतकऱ्यांसाठी आणि त्यांच्या फायद्यासाठीही पंतप्रधान किसान योजना (Pradhan Mantri Kisan Yojana) शेतकऱ्यांसाठी अंमलात आणली गेली आहे. या योजनेअंतर्गत भारतातील शेतकऱ्यांना (Farmers) दर 4 महिन्यांनी 2-2 दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले जातात. त्यामुळे दरवर्षी 6 हजार रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतो. देशातील अनेक शेतकऱ्यांना आतापर्यंत या योजनेचा फायदा 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना झाला असून केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर 11 हप्ते पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाईटवर बदल (Website update change) करण्यात आल्यानंतर शेतकरी आता 12 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यात कोणत्याह दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयांची रक्कम जमा होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

वेबसाईटवर महत्वाचा बदल

सध्या पीएम किसान सन्मान निधी योजनेबाबत अनेक सूचना सरकारकडून देण्यात येत असल्या तरी आता पीएम किसान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर एक महत्वाचा बदल केला गेला आहे. ई-केवायसीच्या तारखेविषयी असलेले अपडेट आता वेबसाईटवरुन काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे ई-केवायसीचा पर्याय काढून घेतला आहे असा सवालही उपस्थित केला जात आहे.

लाभार्थ्यांमध्ये होणार घट

पीएम किसान सन्मान निधीचा जे शेतकरी लाभ घेत आहेत, त्या लाभार्थ्यांच्या जमिनीच्या नोंदींची पडताळणीही सुरू करण्यात आली आहे. जमिनींची नोंदी आणि त्यांची पडताळणी सुरू झाल्यानंतर अनेक शेतकरी मात्र यामुळे अपात्र केले गेले होते. त्यामुळे अशा अपात्र शेतकऱ्यांना नोटीस देऊन चुकीच्या पद्धतीने मिळालेल्या सर्व हप्त्यांची वसुली केली जात असून यामुळे लाभ घेणाऱ्यांच्या संख्येत घट होण्याची चिन्हं आहेत.

Follow Us
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?