AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नामिबियाच्या स्वातंत्र्यलढ्यात भारतीय लोक तुमच्या पाठीशी होते, नामिबियाच्या संसदेत पंतप्रधान मोदींचे भाषण

पंतप्रधान नरेंद्र मोदी नामिबियाच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांना नामिबियाचा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला. यानंतर पंतप्रधानांनी नामिबियाच्या संसदेत भाषण केले. त्यांनी काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

नामिबियाच्या स्वातंत्र्यलढ्यात भारतीय लोक तुमच्या पाठीशी होते, नामिबियाच्या संसदेत पंतप्रधान मोदींचे भाषण
PM modi speech
| Updated on: Jul 09, 2025 | 10:01 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी नामिबियाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात नरेंद्र मोदींना नामिबियाचा सर्वोच्च सन्मान ‘ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शियंट वेल्विट्सचिया मिराबिलिस’ प्रदान करण्यात आला. नामिबियाच्या प्राचीन वाळवंटातील वनस्पती वेल्विट्सचिया मिराबिलिसच्या नावावरून या पुरस्काराचे नाव ठेवण्यात आले आहे. यानंतर पंतप्रधानांनी नामिबियाच्या संसदेत भाषण केले. त्यांनी काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

नामिबियाच्या संसदेत बोलताना पंतप्रधान मोदींनी सर्वप्रथम आभार व्यक्त केले. ते म्हणाले की, ‘लोकशाहीचे मंदिर असलेल्या या सभागृहाला संबोधित करणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. मला हा सन्मान दिल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. लोकशाहीच्या जननीचा प्रतिनिधी म्हणून मी तुमच्यासमोर उभा आहे. 1.4 अब्ज जनतेच्या शुभेच्छा माझ्यासोबत आहेत.’

पंतप्रधानांनी पुढे बोलताना नामिबियात पार पडलेल्या निवडणूक निकालांचा केला. ते म्हणाले की, ‘काही महिन्यांपूर्वी तुम्ही एक ऐतिहासिक क्षण साजरा केला. नामिबियात पहिल्यांदाच महिला राष्ट्रपती बनल्या आहेत. तुम्हाला याचा किती गर्व आणि आनंद झाला हे मी समजू शकतो, कारण भारतातही राष्ट्रपतीपदावर महिला विराजमान आहे.

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘भारताच्या संविधानामुळे एका गरीब आदिवासी कुटुंबातील मुलगी आज जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाची राष्ट्रपती आहे. संविधानाच्या या शक्तीमुळे माझ्यासारख्या गरीब कुटुंबात जन्मलेल्या व्यक्तीलाही सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याची संधी मिळाली आहे. कारण ज्यांच्याकडे काहीही नसते त्यांच्याकडे संविधानाची हमी असते.’

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे आपल्या भाषणात म्हणाले की, ‘भारतातील लोक स्वातंत्र्यलढ्यात नामिबियाच्या पाठीशी अभिमानाने उभे होते. देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीही भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये नैऋत्य आफ्रिकेचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी नामिबियातील संयुक्त राष्ट्रांच्या शांतीसेनेचे नेतृत्व भारतीय लेफ्टनंट जनरल दिवाण प्रेम चंद करत होते. भारताला तुमच्यासोबत उभे राहिल्याचा अभिमान आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यापाराबाबत बोलताना म्हणाले की, ‘आम्हाला आनंद आहे की नामिबिया हा भारताच्या UPI-(युनिफाइड पेमेंट इंटरफेस) तंत्रज्ञानाचा अवलंब करणारा पहिला देश आहे. आपला द्विपक्षीय व्यापार 800 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त आहे. आता आगामी काळात त्यात नक्कीच जास्त भर पडणार आहे.

Follow Us
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला.
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?.
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट.
मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही - CM फडणवीस
मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही - CM फडणवीस.
दिल्ली मेट्रो स्टेशनजवळील सदनगर परिसरात भीषण आग; 7 जणांचा मृत्यू
दिल्ली मेट्रो स्टेशनजवळील सदनगर परिसरात भीषण आग; 7 जणांचा मृत्यू.
बलिदान मास पूर्ण करत, शंभू भक्तांकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवाद
बलिदान मास पूर्ण करत, शंभू भक्तांकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवाद.
अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवार यांचा थेट सरकारवर आरोप
अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवार यांचा थेट सरकारवर आरोप.
दिल्ली दौऱ्यात शिंदेचं मोदींसोबत खलबतं; केंद्रीय मंत्रिमंडळ....
दिल्ली दौऱ्यात शिंदेचं मोदींसोबत खलबतं; केंद्रीय मंत्रिमंडळ.....
हे सर्व भाजपचे अंगवस्त्र, संजय राऊत यांची कुणावर टीका; काय दिला इशारा?
हे सर्व भाजपचे अंगवस्त्र, संजय राऊत यांची कुणावर टीका; काय दिला इशारा?.