AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान मोदी आज 2 मोठ्या अभियानांचं उद्घाटन करणार, स्वच्छ भारत मिशन-शहरी 2.0 आणि अमृत 2.0 ने शहरांचं चित्र बदलणार

पहिली मोहिम आहे PM मोदी स्वच्छ भारत मिशन-शहरी 2.0 (SBM-U 2.0) आणि दुसरी मोहिम शहरी सुधारणांसाठी अटल मिशन 2.0 (AMRUT 2.0) हे 2 मिशन लाँच करणार आहे.

पंतप्रधान मोदी आज 2 मोठ्या अभियानांचं उद्घाटन करणार, स्वच्छ भारत मिशन-शहरी 2.0 आणि अमृत 2.0 ने शहरांचं चित्र बदलणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Oct 01, 2021 | 11:23 AM
Share

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज म्हणजेच 1 ऑक्टोबर रोजी, दोन मोठ्या मोहिमा सुरू करणार आहेत. पहिली मोहिम आहे PM मोदी स्वच्छ भारत मिशन-शहरी 2.0 (SBM-U 2.0) आणि दुसरी मोहिम शहरी सुधारणांसाठी अटल मिशन 2.0 (AMRUT 2.0) हे 2 मिशन लाँच करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मोहिमांची सुरुवात डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये होणार आहे. ( pm-modi-to-launch-swachh-bharat-mission-urban-2-and-amrut-2-on-1st-october-SBM-U 2.0)

सर्व शहरांना ‘कचरामुक्त’ आणि ‘पाणी सुरक्षा’ करण्याच्या उद्देशाने SBM-U 2.0 आणि AMRUT 2.0 या मोहिमा तयार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या मोहिमांतर्गत भारतातील जलद शहरीकरणाच्या आव्हानांना प्रभावीपणे हाताळण्यासाठी काम केलं जाईल. याशिवाय, शाश्वत विकास ध्येय 2030 साध्य करण्यासाठी या मोहिमांचा उपयोग होईल. या कार्यक्रमाला सर्व केंद्रीय मंत्री, गृहनिर्माण मंत्री, शहरी विकास राज्यमंत्री, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे शहरी विकास मंत्रीही उपस्थित असतील.

काय आहे स्वच्छ भारत मिशन-शहरी 2.0?

स्वच्छ भारत मिशन-शहरी 2.0 मध्ये सगळ्या शहरांन कचरामुक्त बनवणं आणि अमृत मिशन अंतर्गत येणाऱ्या शहरांमध्ये धूर आणि काळ्या पाण्याचं शुद्धीकरण करणं सामाविष्ट आहे. याचा खर्च तब्बल 1.41 लाख कोटी रुपये आहे. या अभियानात शहरांचं लोकसंख्या आणि प्रदुषणाच्या बेसेसवर वर्गीकरण करण्यात आलं आहे.

काय आहे AMRUT 2.0 चा लक्ष्य?

AMRUT 2.0 ही योजन जवळपास 2.654 कोटी सीवेज किंवा सेफ्टिक टँक पुरवण्यासाठी बनवण्यात आली आहे. यात तब्बल 2.68 कोटी नळ कनेक्शन, 500 शहरांमध्ये सीवेज आणि सेफ्टीक टँकचं 100 टक्के कव्हरेज देण्यात येणार आहे. याशिवाय 4.700 स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सर्व घऱांमध्ये नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. याशिवाय, भूजल पातळी वाढवण्यासाठीही या योजनेत प्रयत्न केला जाणार आहे. शहरांमध्ये योजनेच्या बाबतीत प्रतिस्पर्धा वाढावी यासाठी पेयजल सर्व्हेक्षण ही स्पर्धाही आयोजित केली जाणार आहे. अमृत 2.0 चा अंदाजित खर्च तब्बल 2.87 कोटी रुपये आहे.

आधीच्या स्वच्छता मिशन-शहरी आणि AMRUT चा परिणाम काय?

SBM-U और AMRUT या दोन्ही योजनांमध्ये मागच्या 7 वर्षात अनेक चांगल्या गोष्टी झाल्या आहेत. दोन्ही मिशनमुळे नागरिकांना घरापर्यंत स्वच्छ पाणी मिळालं आहे. पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या आहेत. उघड्यावर शौच करण्याचं प्रमाण हे अत्यल्प झालं आहे. अनेक गावं ही हगणदारीमुक्त झाली आहेत. 70 टक्के घन कचऱ्यावर आता प्रक्रिया होत आहे. अमृत योजनेतर्गत तब्बल 1.1 कोटी लोकांना घरापर्यंत पाण्याचं कनेक्शन मिळालं आहे तर 85 लाख सीवर कनेक्शन जोडण्यात आले आहेत. यामुळे तब्बल 4 कोटी लोकांना फायदा झाला आहे.

हेही वाचा:

भाजपातही जाणार नाही, कॅप्टन नवीन टीम तयार करणार?; पंजाब निवडणुकीत अमरिंदर सिंगांचा ‘खेला होबे’?

ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंहांकडून संघ आणि भाजपचं कौतुक, नर्मदा यात्रेतल्या सहकार्याबद्दल अमित शाहांचे आभार

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ