AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narendra Modi : नरेंद्र मोदींची GST बाबत मोठी घोषणा, आता संपूर्ण भारतात…नेमका काय फायदा होणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित केले. नवरात्री पर्वाच्या पूर्वसंध्येला मोदी यांनी यावेळी महत्त्वाच्या घोषणा केली. त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच आत्मनिर्भर भारताचा उल्लेख केला आहे. त्यांनी जीएसटीवर महत्त्वाची माहिती दिली आहे.   

Narendra Modi : नरेंद्र मोदींची GST बाबत मोठी घोषणा, आता संपूर्ण भारतात...नेमका काय फायदा होणार?
narendra modi
| Updated on: Sep 21, 2025 | 5:22 PM
Share

Narendra Modi On GST : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (21 सप्टेंबर) जनतेला संबोधित केले. नवरात्री पर्वाच्या पूर्वसंध्येला मोदी यांनी यावेळी महत्त्वाच्या घोषणा केली. त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच आत्मनिर्भर भारताचा उल्लेख केला आहे. त्यांनी जीएसटीवर महत्त्वाची माहिती दिली आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवसापासून जीएसटीचे नवे दर लागू होतील, अशी घोषणा यावेळी मोदी यांनी केली. तसेच हा नवा कर लागू झाल्यानंतर भारतीयांचा एका प्रकारे बचत उत्सव सुरू होईल, असेही यावेळी मोदी म्हणाले. तसेच या नव्या जीएसटी दरामुळे शेतकरी, महिला, युवक यांचा फायदा होईल, असेही भाष्य यावेळी मोदी यांनी जनेला संबोधित करताना केले.

22 सप्टेंबरपासून जीएसटीच्या नव्या सुधारणा लागू होणार

आता नवरात्रीचे पर्व चालू होणार आहे. तुम्हा सर्वांनाच शुभेच्छा. नवरात्रीच्या पहिल्याच दिवसापासून देश आत्मनिर्भर भारत अभियानासाठी महत्त्वाचे पाऊल उचलत आहे. 22 सप्टेंबरपासून सुर्योदयानंतर जीएसटीच्या नव्या सुधारणा लागू होणार आहेत. एका प्रकारे देशात जीएसटी बचत उत्सव सुरू होणार आहे. या जीएसटी बचत उत्सवात तुमची बचत वाढणार आहे. तुम्ही तुमच्या पसंदीच्या वस्तूंना खरेदी करू शकाल.

देशातील प्रत्येक कुटुंबाचा आनंद वाढणार- नरेंद्र मोदी

यामुळे मध्यमवर्ग, युवक, शेतकरी, महिला, दुकानदार, नागरिक, उद्योजक अशा सर्वांनाच या बचत उत्सवाचा खूप फायदा होणार आहे. म्हणजेच सणांच्या या उत्सवात सर्वांचेच तोंड गोड होईल. देशातील प्रत्येक कुटुंबाचा आनंद वाढणार आहे. मी देशातील कोट्यवधी कुटुंबांना जीएसटीच्या नव्या सुधारणांबद्दल शुभेच्छा देतो. या सुधारणा भारताच्या विकासाला गतिमान करतील. व्यवसायांना आणखी सोपे केले जाईल. या नव्या सुधारणांमुळे प्रत्येक राज्याला विकासाच्या शर्यतीत बरोबरीने यायला मदत होईल. 2017 साली भारताने जीएसटीच्या सुधारणांच्या दिशेने पाऊल टाकले होते. नवा इतिहास रचण्याची ही एक सुरुवात होती. अगोदर देशातील जनता वेगवेगळ्या करांमध्ये अडकलेली होती.

अगोदर एका शहरातून दुसऱ्या शहरात माल पोहोचवायचा असेल तर कित्येक फॉर्म भरावे लागत होते. प्रत्येक ठिकाणी कराचे नवे नियम होते. त्यामुळे अनेक अडचणी यायच्या. आता मात्र वन नेशन नव टॅक्स या धोरणामुळे अडचणी कमी होतील.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक