AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांना रोखताय की संपवताय? पोलिसांचा ‘गालिचा’ संतापजनक?

दिल्ली सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला रोखण्यासाठी पोलिसांनी आता वेगळ्या मार्गांचा उपयोग सुरु केलेला दिसतोय.

शेतकऱ्यांना रोखताय की संपवताय? पोलिसांचा 'गालिचा' संतापजनक?
| Updated on: Feb 02, 2021 | 1:37 AM
Share

नवी दिल्ली : दिल्ली सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला रोखण्यासाठी पोलिसांनी आता वेगळ्या मार्गांचा उपयोग सुरु केलेला दिसतोय. पोलिसांनी दिल्ली बाहेरील आंदोलकांचे ट्रॅक्टर आणि गाड्या दिल्लीत येऊ नये म्हणून टिकरी बॉर्डरवर थेट रस्त्यावर खिळ्यांचा गालिचाच पसरलाय. त्यामुळे वाहनांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचे टायर फुटतील अशीच ही व्यवस्था आहे. मात्र, आधीच बॅरिकेट्स लावलेले असताना ट्रॅक्टर उलटून एका आंदोलकाचा मृत्यू झालेला असल्याने पोलिसांच्या या कृतीचा विरोधही होत आहे (Police use nails on roads to stop Farmer Protesters on Delhi Border).

पोलिसांनी आधी दिल्ली सीमेवरील रस्ते जेसीबीने खोदले आणि त्यानंतर रस्त्यावर सिमेंटचा उपयोग करुन खिळे लावले. त्यामुळे या रस्त्यांवर खिळ्यांचा गालिचा पसरलाय. गाझीपूर सीमा शेतकरी आंदोलनाचं केंद्र बनलंय. या ठिकाणी सातत्याने वाढत्या आंदोलक शेतकऱ्यांची संख्या पाहता पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. रात्रीतून 12 स्तराचं बॅरिकेटिंग करण्यात आलंय. याशिवाय नोएडा सेक्टरमधून अक्षरधाम मंदिराकडे जाणारा रस्ता देखील बंद करण्यात आलाय.

दरम्यान, याआधी पोलिसांनी शेतकरी आंदोलन दडपण्याचाही प्रयत्न केला. याचाच भाग म्हणून शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या अटकेसाठी हालचालीही झाल्या. मात्र, टिकैत यांचा दबावातून रडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आंदोलनस्थळी शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतेय. शेतकरी आंदोलनाला वेग आलाय. त्यामुळे सरकारवरील दबाव चांगलाच वाढलाय. त्यामुळेच सरकारने पोलीस प्रशासनाला शेतकरी आंदोलन बंद करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

याआधी दिल्लीच्या सीमेवर गाझीपूर, टिकरी आणि सिंधु बॉर्डरच्या आजूबाजूच्या परिसरात 31 जानेवारी रात्री 11 वाजेपर्यंत इंटरनेट बंदीही केली होती. तसेच दिल्लीला उत्तर प्रदेशशी जोडणारा राष्ट्रीय महामार्गही बंद करण्यात आला होता.

हेही वाचा :

शरद पवारांकडून 9 ट्विट्सची मालिका, केंद्रीय मंत्र्यांची झाडाझडती

शेतकरी आंदोलनादरम्यान सुरक्षा रक्षकांकडून कडेकोट बंदोबस्त, पाहा फोटो

‘कृषी कायदे परत घेतले नाही, तर आत्महत्या करेन,’ शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा इशारा

व्हिडीओ पाहा :

Police use nails on roads to stop Farmer Protesters on Delhi Border

Follow Us
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.