AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राशन कार्ड धरणासाठी खुशखबर, ऑक्टोबर महिन्यात मोदी सरकार देणार ही विशेष सुविधा

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. याचा फायदा तब्बल 80 कोटी लोकांना होणार आहे.

राशन कार्ड धरणासाठी खुशखबर, ऑक्टोबर महिन्यात मोदी सरकार देणार ही विशेष सुविधा
शिधा पत्रिका Image Credit source: Social Media
| Updated on: Sep 28, 2022 | 11:49 AM
Share

मुंबई,  जर तुमच्याकडे रेशन कार्ड आहे आणि तुम्ही प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) अंतर्गत मोफत रेशन घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची (Latest Information) आहे. वास्तविक, ही योजना एप्रिल 2020 मध्ये कोविड काळात सुरू करण्यात आली होती नंतर मार्च 2022 मध्ये ही योजना सहा महिन्यांसाठी सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेशी (Pradhanmantri Garib Kalyan Yojna) तब्बल 80 कोटी लोक थेट जोडले गेले आहेत. आकडेवारीनुसार या योजनेचे लाभार्थी मोठ्याप्रमाणात आहे. केंद्र सरकार पुन्हा एकदा मोफत रेशन वितरणाची ही सर्वात मोठी योजना सहा महिन्यांनी म्हणजेच  मार्च 2023 पर्यंत वाढविण्याची शक्यता आहे. केंद्रीय अन्न विभागाच्या सचिवांनीही तसे संकेत दिले आहेत. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा अद्याब करण्यात आलेली नाही.

योजनेवर खर्च झाले आतापर्यंत 3.40 लाख कोटी

अधिकाऱ्यांच्या मते, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) ही जगातील सर्वात मोठी अन्न योजना आहे. यासाठी सरकारकडे धान्याचा पुरेसा साठा आहे. यासाठी सरकारकडून स्टॉकच्या स्थितीचाही आढावा घेण्यात आला आहे.  सरकारने आतापर्यंत 3.40 लाख कोटी रुपये या योजनेवर खर्च केले आहेत. सरकारने योजेच्या कालावधीत वाढ केल्यामुळे लाभार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

योजने अंतर्गत लाभ

केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत देशातील सर्व गरीब शिधापत्रिकाधारक कुटुंबांना प्रति व्यक्ती 5 किलो रेशन दिले जाते. सुरुवातीला या योजनेंतर्गत कुटुंबाला एक किलो हरभरा डाळ आणि आवश्यक मसाल्यांचे एक किट देण्यात आले. पूर्वी ही योजना फक्त शिधापत्रिकाधारकांसाठी होती. नंतर त्यात शिधापत्रिका नसलेल्या गरीब कुटुंबांना देखील जोडण्यात आले.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.