AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mann Ki Baat: ओमिक्रॉनच्या विरोधात कसं लढायचं?, द्विसूत्री काय?; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितली ‘मन की बात’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षीच्या शेवटच्या मन की बातमधून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ओमिक्रॉनपासून बचाव करण्यासाठी देशवासियांना सल्लाही दिला.

Mann Ki Baat: ओमिक्रॉनच्या विरोधात कसं लढायचं?, द्विसूत्री काय?; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितली 'मन की बात'
prime minister narendra
| Edited By: | Updated on: Dec 26, 2021 | 11:33 AM
Share

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षीच्या शेवटच्या मन की बातमधून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ओमिक्रॉनपासून बचाव करण्यासाठी देशवासियांना सल्लाही दिला. स्वयं सतर्कता आणि शिस्त यामुळेच आपण ओमिक्रॉनवर मात करू शकतो, असा कानमंत्रच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशावासियांना दिला.

‘मन की बात’ चा आज 84 वा कार्यक्रम होता. 2021मधील ही शेवटची मन की बात होती. या मन की बातमधून पंतप्रधानांनी ओमिक्रॉनपासून ते तामिळनाडूतील हेलिकॉप्टर अपघातावरही भाष्य केलं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवावरही त्यांनी भाष्य केलं. देशात ओमिक्रोन व्हेरिएंट आला आहे. त्याचा अभ्यास आपले संशोधक करत आहेत. या व्हेरिएंटचा रोज नवा डेटा त्यांना मिळत आहेत. त्यावरून संशोधक काही सूचनाही देत आहेत. ओमिक्रॉनविरोधात लढायचं असेल तर स्वयं सतर्कता आणि स्वयं शिस्त या दोन गोष्टीचं पालन करा. हीच ओमिक्रॉन विरोधातील ही मोठी शक्ती आहे. आपली सामूहिक शक्तीच कोरोनाचा पराभव करेल, असं मोदी म्हणाले.

जनशक्तीमुळेच कोरोना पराभूत

आपल्या जनशक्तीमुळेच आपण कोरोनाचा पराभव करू शकलो आहे. जनशक्तीची ताकद आणि सर्वांच्या प्रयत्नामुळेच आपण 100 वर्षात आलेल्या या सर्वात मोठ्या महामारीशी आपण सामना करू शकलो, असं त्यांनी सांगितलं. तसेच नवं वर्ष चांगलं घालवण्यासाठी संकल्प करण्याचं आवाहनही त्यांनी केलं.

वरुण सिंग प्रेरणादायी

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूत हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू पावलेले कॅप्टन वरुण सिंग यांचं स्मरण केलं. वरुण सिंग यांना यंदाच शौर्य पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी त्यांनी त्यांच्या शिक्षकाला एक चिठ्ठी लिहिली होती. एवढ्या मोठ्या पदावर पोहोचल्यानंतरही वरुण सिंग आपलं मूळ विसरले नव्हते. त्यांची ही चिठ्ठी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अशीच आहे. एका जरी विद्यार्थ्याला मी प्रेरणा देऊ शकलो तर ही खूप मोठी गोष्ट असेल असं त्यांनी या चिठ्ठीत म्हटलं आहे. मात्र, त्यांनी केवळ एका विद्यार्थ्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला प्रेरित केलं आहे. भलेही पत्रातून ते विद्यार्थ्यांबाबत बोलत असतील, पण त्यांचा हा संदेश आपल्या संपूर्ण समाजासाठी आहे. साधारणपासून असाधारण बनण्याचा त्यांनी जो मंत्र दिला आहे. तो महत्त्वाचा आहे, असं मोदी म्हणाले.

संबंधित बातम्या:

PM Modi Mann ki Baat Live : 100 वर्षातील सर्वात मोठ्या महामारीचा सामना देशानं समर्थपणे केला: नरेंद्र मोदी

केंद्रात मोदींचे सुशासन, राज्यात ठाकरेंचे कुशासन; भाजप नेते जावडेकरांचा हल्लाबोल

काय सांगता ? महाराष्ट्र अग्रिमन अधिनिर्णय प्राधिकरणाच्या निर्णयामुळे शेतकरीही गेले चक्रावून, हळद म्हणे…

Follow Us
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक
माणसं प्रेमाने जिंकता येतात!; सुळेंच्या आव्हानावर फडणवीसांचा पलटवार
Devendra Fadnavis | माणसं प्रेमाने जिंकता येतात!; सुप्रिया सुळेंच्या आव्हानावर फडणवीसांचा पलटवार
अरे... ऐ मला हे चालणार नाही... बैठकीत एकाऐकी मुख्यमंत्री कंत्राटदार...
Video | अरे... ऐ मला हे चालणार नाही... बैठकीत एकाऐकी मुख्यमंत्री कंत्राटदारांवर भडकलेच, पाहा व्हिडीओ
1 एकर शेतीमधून 100 कोटींचं वांग्याचं उत्पन्न कसं निघतं?
1 एकर शेतीमधून 100 कोटींचं वांग्याचं उत्पन्न कसं निघतं?; सुप्रिया सुळेंच्या आरोपांवर ज्योती वाघमारेंचा पलटवार
महाराष्ट्रतील देवस्थान जमिनीबाबत सरकारचं मोठं पाऊल, तो निर्णय स्थगित,
Maharashtra Devasthan | महाराष्ट्रतील देवस्थान जमिनीबाबत सरकारचं मोठं पाऊल, तो निर्णय स्थगित, नेमकं प्रकरण काय?
भाजपला मोठा धक्का; महिला शहराध्यक्षांसह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा
भाजपला मोठा धक्का; महिला शहराध्यक्षांसह संपूर्ण कार्यकारिणीचा थेट राजीनामा, पक्षांतर्गत वाद अचानक उफाळला
राग आला थेट नाल्यात उतरले, मनसेच्या त्या आंदोलनाची तुफान चर्चा
Mumbai MNS | राग आला थेट नाल्यात उतरले, मनसेच्या त्या आंदोलनाची तुफान चर्चा; नालेसफाईच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं!
सुप्रिया सुळेंचा सर्वात मोठा निर्णय, घोडेबाजार रोखण्यासाठी आणणार......
Supriya Sule | सुप्रिया सुळेंचा सर्वात मोठा निर्णय, घोडेबाजार रोखण्यासाठी आणणार संसदेत बिल; थेट सांगूनच टाकलं!