AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आणीबाणीचा कलंक काँग्रेसच्या कपाळावरून पुसला जाणार नाही; नरेंद्र मोदींचा जोरदार हल्ला

लोकसभेत बोलताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आणीबाणीचा कलंक काँग्रेसच्या कपाळावरून पुसला जाणार नाही, असं त्यांनी यावेळी म्हटलं.

आणीबाणीचा कलंक काँग्रेसच्या कपाळावरून पुसला जाणार नाही; नरेंद्र मोदींचा जोरदार हल्ला
नरेंद्र मोदी
| Updated on: Dec 14, 2024 | 6:57 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत बोलताना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  त्यांनी आणीबाणीवरून पुन्हा एकदा काँग्रेसला कोंडीत पकडलं. देश जेव्हा  संविधानाचं 25 वं वर्ष साजरा करत होता, तेव्हा यांनी आणीबाणी आणली, नागरिकांचे अधिकार हिसकावून घेतले. प्रसारमाध्यमांचं स्वातंत्र्य हिरावलं, काँग्रेसच्या माथ्यावरील हे पाप कधीच पुसलं जाणार नाही, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले मोदी? 

देश जेव्हा  संविधानाचं 25 वं वर्ष साजरा करत होता, तेव्हा यांनी आणीबाणी आणली, नागरिकांचे अधिकार हिसकावून घेतले. प्रसारमाध्यमांचं स्वातंत्र्य हिरावलं, लोकांना तुरुंगात टाकलं, देशाला तुरुंगखाना बनवलं. काँग्रेसच्या माथ्यावरील हे पाप कधीच पुसलं जाणार नाही. जगात जेव्हा जेव्हा लोकशाहीची चर्चा होईल, तेव्हा तेव्हा काँग्रेसच्या कपाळावरील पापाची चर्चा होईल, लोकशाहीला पायदळी तुडवण्याचं काम तेव्हा काँग्रेसन केलं असं मोदी यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, संविधानाच्या ५०व्या वर्षी वाजपेयींनी हा दिवस साजरा केला होता. संविधानावर चर्चा घडवून आणली होती. मलाही संविधानाच्या प्रक्रियेतूनच मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली होती. मी मुख्यमंत्री असताना संविधानाला ६० वर्ष झाले होते. तेव्हा संविधानाचा ६० वा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. आम्ही संविधानाची प्रत हत्तीवर ठेवून रॅली काढली, तेव्हा राज्याचा मुख्यमंत्री संविधानाच्या खाली पायी चालत होता. आमच्यासाठी संविधानाचं मोठं महत्त्व आहे. आज संविधानाला ७५ वर्ष होत आहेत. मला त्यावर बोलण्याची संधी मिळाली आहे.

चढ उतार आले, पण देशातील जनता संविधानाच्या पाठी खंबीरपणे उभी राहिली. काही तथ्य मला सांगायचे आहेत. काँग्रेसच्या एका कुटुंबाने संविधानावर घाला घालण्यात कोणताही कसूर ठेवली नाही. मी एका कुटुंबाचा हा उल्लेख यासाठी करतो की 75 वर्षांपैकी एकाच कुटुंबाने 55 वर्ष राज्य केलं. त्यामुळे देशात काय काय झालं? हे माहीत करून घेण्याचा नागरिकांना अधिकार आहे. या कुटुंबाचे कुविचार, कुनिती, कुरिती याची परंपरा निरंतर सुरू आहे, अशी टीकाही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.