Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आणीबाणीचा कलंक काँग्रेसच्या कपाळावरून पुसला जाणार नाही; नरेंद्र मोदींचा जोरदार हल्ला

लोकसभेत बोलताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आणीबाणीचा कलंक काँग्रेसच्या कपाळावरून पुसला जाणार नाही, असं त्यांनी यावेळी म्हटलं.

आणीबाणीचा कलंक काँग्रेसच्या कपाळावरून पुसला जाणार नाही; नरेंद्र मोदींचा जोरदार हल्ला
नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Dec 14, 2024 | 6:57 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत बोलताना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  त्यांनी आणीबाणीवरून पुन्हा एकदा काँग्रेसला कोंडीत पकडलं. देश जेव्हा  संविधानाचं 25 वं वर्ष साजरा करत होता, तेव्हा यांनी आणीबाणी आणली, नागरिकांचे अधिकार हिसकावून घेतले. प्रसारमाध्यमांचं स्वातंत्र्य हिरावलं, काँग्रेसच्या माथ्यावरील हे पाप कधीच पुसलं जाणार नाही, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले मोदी? 

देश जेव्हा  संविधानाचं 25 वं वर्ष साजरा करत होता, तेव्हा यांनी आणीबाणी आणली, नागरिकांचे अधिकार हिसकावून घेतले. प्रसारमाध्यमांचं स्वातंत्र्य हिरावलं, लोकांना तुरुंगात टाकलं, देशाला तुरुंगखाना बनवलं. काँग्रेसच्या माथ्यावरील हे पाप कधीच पुसलं जाणार नाही. जगात जेव्हा जेव्हा लोकशाहीची चर्चा होईल, तेव्हा तेव्हा काँग्रेसच्या कपाळावरील पापाची चर्चा होईल, लोकशाहीला पायदळी तुडवण्याचं काम तेव्हा काँग्रेसन केलं असं मोदी यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, संविधानाच्या ५०व्या वर्षी वाजपेयींनी हा दिवस साजरा केला होता. संविधानावर चर्चा घडवून आणली होती. मलाही संविधानाच्या प्रक्रियेतूनच मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली होती. मी मुख्यमंत्री असताना संविधानाला ६० वर्ष झाले होते. तेव्हा संविधानाचा ६० वा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. आम्ही संविधानाची प्रत हत्तीवर ठेवून रॅली काढली, तेव्हा राज्याचा मुख्यमंत्री संविधानाच्या खाली पायी चालत होता. आमच्यासाठी संविधानाचं मोठं महत्त्व आहे. आज संविधानाला ७५ वर्ष होत आहेत. मला त्यावर बोलण्याची संधी मिळाली आहे.

चढ उतार आले, पण देशातील जनता संविधानाच्या पाठी खंबीरपणे उभी राहिली. काही तथ्य मला सांगायचे आहेत. काँग्रेसच्या एका कुटुंबाने संविधानावर घाला घालण्यात कोणताही कसूर ठेवली नाही. मी एका कुटुंबाचा हा उल्लेख यासाठी करतो की 75 वर्षांपैकी एकाच कुटुंबाने 55 वर्ष राज्य केलं. त्यामुळे देशात काय काय झालं? हे माहीत करून घेण्याचा नागरिकांना अधिकार आहे. या कुटुंबाचे कुविचार, कुनिती, कुरिती याची परंपरा निरंतर सुरू आहे, अशी टीकाही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.