AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आणीबाणीचा कलंक काँग्रेसच्या कपाळावरून पुसला जाणार नाही; नरेंद्र मोदींचा जोरदार हल्ला

लोकसभेत बोलताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आणीबाणीचा कलंक काँग्रेसच्या कपाळावरून पुसला जाणार नाही, असं त्यांनी यावेळी म्हटलं.

आणीबाणीचा कलंक काँग्रेसच्या कपाळावरून पुसला जाणार नाही; नरेंद्र मोदींचा जोरदार हल्ला
नरेंद्र मोदी
| Updated on: Dec 14, 2024 | 6:57 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत बोलताना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  त्यांनी आणीबाणीवरून पुन्हा एकदा काँग्रेसला कोंडीत पकडलं. देश जेव्हा  संविधानाचं 25 वं वर्ष साजरा करत होता, तेव्हा यांनी आणीबाणी आणली, नागरिकांचे अधिकार हिसकावून घेतले. प्रसारमाध्यमांचं स्वातंत्र्य हिरावलं, काँग्रेसच्या माथ्यावरील हे पाप कधीच पुसलं जाणार नाही, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले मोदी? 

देश जेव्हा  संविधानाचं 25 वं वर्ष साजरा करत होता, तेव्हा यांनी आणीबाणी आणली, नागरिकांचे अधिकार हिसकावून घेतले. प्रसारमाध्यमांचं स्वातंत्र्य हिरावलं, लोकांना तुरुंगात टाकलं, देशाला तुरुंगखाना बनवलं. काँग्रेसच्या माथ्यावरील हे पाप कधीच पुसलं जाणार नाही. जगात जेव्हा जेव्हा लोकशाहीची चर्चा होईल, तेव्हा तेव्हा काँग्रेसच्या कपाळावरील पापाची चर्चा होईल, लोकशाहीला पायदळी तुडवण्याचं काम तेव्हा काँग्रेसन केलं असं मोदी यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, संविधानाच्या ५०व्या वर्षी वाजपेयींनी हा दिवस साजरा केला होता. संविधानावर चर्चा घडवून आणली होती. मलाही संविधानाच्या प्रक्रियेतूनच मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली होती. मी मुख्यमंत्री असताना संविधानाला ६० वर्ष झाले होते. तेव्हा संविधानाचा ६० वा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. आम्ही संविधानाची प्रत हत्तीवर ठेवून रॅली काढली, तेव्हा राज्याचा मुख्यमंत्री संविधानाच्या खाली पायी चालत होता. आमच्यासाठी संविधानाचं मोठं महत्त्व आहे. आज संविधानाला ७५ वर्ष होत आहेत. मला त्यावर बोलण्याची संधी मिळाली आहे.

चढ उतार आले, पण देशातील जनता संविधानाच्या पाठी खंबीरपणे उभी राहिली. काही तथ्य मला सांगायचे आहेत. काँग्रेसच्या एका कुटुंबाने संविधानावर घाला घालण्यात कोणताही कसूर ठेवली नाही. मी एका कुटुंबाचा हा उल्लेख यासाठी करतो की 75 वर्षांपैकी एकाच कुटुंबाने 55 वर्ष राज्य केलं. त्यामुळे देशात काय काय झालं? हे माहीत करून घेण्याचा नागरिकांना अधिकार आहे. या कुटुंबाचे कुविचार, कुनिती, कुरिती याची परंपरा निरंतर सुरू आहे, अशी टीकाही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.