AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कायदा बदललाय आता तुम्हीही बदला… हिट अँड रन केसमध्ये कठोर शिक्षेची तरतूद; काय आहेत नवे बदल?

आता नव्या कायद्यानुसार आरोपीला कमीत कमी सात वर्षाची शिक्षा ठोठावली जाणार आहे. सात वर्षाची शिक्षा आणि दंडाची तरतूद नव्या कायद्यात करण्यात आली आहे.

कायदा बदललाय आता तुम्हीही बदला...  हिट अँड रन केसमध्ये कठोर शिक्षेची तरतूद; काय आहेत नवे बदल?
बाईकचा तोल गेल्याने मोटारसायकलस्वार उकळत्या तेलात पडलाImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 12, 2023 | 9:23 AM
Share

नवी दिल्ली | 12 ऑगस्ट 2023 : गाडीला ठोकायचे आणि पळून जायचे असे प्रकार नेहमी होत असतात. पण आता हे प्रकार चालणार नाहीत. हिट अँड रन केसमध्ये आता कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर केलं आहे. त्यात अपघात करून फरार होणाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. अपघात घडल्यानंतर वाहनचालकानेच तात्काळ पोलिसांना त्याची माहिती देणं बंधनकारक आहे. पोलिसांना अपघाताची माहिती न देता पळून गेल्यास कमीत कमी 10 वर्षाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

रस्ते अपघात झाल्यानंतर आरोपी पोलीस ठाण्यात जाऊन जामीन घेतात आणि सुटून जातात. पण अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात घेऊन जाणारे त्याचे नातेवाईक किंवा मृताचे नातेवाईक हॉस्पिटल आणि पोलीस स्टेशनच्या चकरा मारून परेशान होतात. अनेक प्रकरणात तर दोष सिद्ध झाल्यावरही दंड भरून आरोपी सुटून जातात. हे चित्र बदलण्यासाठी केंद्र सरकारने आता कठोर पाऊल उचललं आहे.

बदल काय?

केंद्र सरकारने भारतीय न्याय संहिता 2023 दुरुस्ती विधेयक संसदेत मांडलं आहे. त्यात त्यांनी हिट अँड रन केसमध्ये मोठे फेरबदल करावे लागले आहेत. एखाद्याच्या निष्काळजीपणामुळे कुणाचा मृत्यू झाला तर आरोपीला त्यातून सुटका करून घेणं आता तेवढं सोपं होणार नाही. आयपीसीच्या कलम 104 नुसार निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्यास आधी दोन वर्षाची शिक्षा किंवा दंडाची तरतूद होती. किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद होती.

आता नव्या कायद्यानुसार आरोपीला कमीत कमी सात वर्षाची शिक्षा ठोठावली जाणार आहे. सात वर्षाची शिक्षा आणि दंडाची तरतूद नव्या कायद्यात करण्यात आली आहे. हत्येच्या हेतूने गुन्हा केला नसेल, पण आरोपी घटनास्थळावरून पळून गेल्यास किंवा त्याने तात्काळ पोलिस अधिकारी किंवा मॅजिस्ट्रेटला माहिती दिली नाही तर त्याला शिक्षा आणि रोख रक्कम भरणे आदी दोन्ही शिक्षा होऊ शकतात. शिक्षेचा कालावधी दहा वर्षाचा असू शकतो. या गुन्ह्यात आर्थिक दंडाच्या शिक्षेचीही तरतूद आहे.

उद्देश काय?

संसदेत हा कायदा मंजूर झाल्यास ज्यांच्या निष्काळजीपणामुळे एखाद्याचा मृत्यू झाला किंवा एखाद्याला गंभीर दुखापत झाली तर त्याच्या अडचणीत वाढ होणार आहे. नागरिकांनी आपल्या जबाबदाऱ्या काळजीपूर्वक पार पाडाव्यात आणि गंभीरपणे या गोष्टींचा विचार करावा, हा या कायद्यातील बदलाचा उद्देश आहे.

Follow Us
रमजान महिना सुरु; मुंबईचा मोहम्मद अली रोड खवय्यांनी गजबजला
रमजान महिना सुरु; मुंबईचा मोहम्मद अली रोड खवय्यांनी गजबजला.
भरत जाधव, पुष्कर श्रोत्री आणि केदार शिंदेंसह अनेक कलाकार बनले मनसेचे..
भरत जाधव, पुष्कर श्रोत्री आणि केदार शिंदेंसह अनेक कलाकार बनले मनसेचे...
इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा डोंबिवली MIDC उद्योगांना मोठा फटका
इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा डोंबिवली MIDC उद्योगांना मोठा फटका.
विदर्भ भयंकर तापला, उष्णतेच्या लाटेने घराबाहेर पडणं मुश्किल
विदर्भ भयंकर तापला, उष्णतेच्या लाटेने घराबाहेर पडणं मुश्किल.
गॅस सिलेंडरच्या मुद्द्यावरून लोकसभेत जोरदार पडसाद
गॅस सिलेंडरच्या मुद्द्यावरून लोकसभेत जोरदार पडसाद.
घरगुती गॅसला प्राधान्य; व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा ठप्प, हॉटेल्स....
घरगुती गॅसला प्राधान्य; व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा ठप्प, हॉटेल्स.....
महाराष्ट्रात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी
महाराष्ट्रात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी.
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं.
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय.
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी.