AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधींनी मेलेले मासे पकडले, त्यामुळे हरली काँग्रेस ? मतदाराचा अजब तर्क

बिहारच्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला आहे. काँग्रेसला बेगुसराय येथे पराभवाचा सामना करावा लागला. आता बेगुसराय येथील एका व्यक्तीने काँग्रेसच्या पराभवामागे अजब तर्कट मांडले आहे.

राहुल गांधींनी मेलेले मासे पकडले, त्यामुळे हरली काँग्रेस ? मतदाराचा अजब तर्क
rahul gandhi file photo
| Updated on: Nov 17, 2025 | 6:35 PM
Share

बिहार विधानसभा निवडणूकीत विरोधी महागठबंधनला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. काँग्रेसच्या सर्वात दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. काँग्रेसला केवळ पाच जागा जिंकत्या आल्या आहेत आणि 8.71 टक्के मतदान मिळाले आहे. काँग्रेसच्या या पराभवामागे बिहारच्या बेगुसराय येथील एका गावकऱ्याने अजब तर्कट मांडले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रचारादरम्यान मेलेले मासे पकडले होते. त्यामुळे त्यांच्या पार्टीला मते मिळाली नाहीत. राहुल गांधी यांनी बेगुसराय येथे प्रचारादरम्यान स्थानिक मच्छीमारांसोबत तलावात उतरुन मासे पकडले होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच चर्चेत आला आहे.

बेगुसराय येथे काँग्रेस उमेदवार अमिता भूषण यांच्या समर्थनासाठी आयोजित निवडणूक सभेत राहुल गांधी आणि विकाससील इन्सान पार्टी ( व्हीआयपी ) चे प्रमुख मुकेश सहनी यांनी भाषण केले होते. व्हीआयपी हा पक्ष मच्छीमारांचा पक्ष समजला जातो. निवडणूक प्रचारावेळी राहुल आणि सहनी यांनी स्थानिक मच्छीमारांसोबत तलावात उतरुन मासेही पकडले होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र, बेगुसराय येथे काँग्रेसचा पराभव झाला होता.

काँग्रेसने आरजेडीची सोबत सोडावी

बेगुसरायच्या शंख गावात महागठबंधनच्या पराभवासंदर्भात एका स्थानिकाने अजब तर्क सांगितला. वृ्त्तसंस्था आयएएनएसशी बोलताना तो म्हणाला की, ‘राहुल गांधी आले आणि मासे पकडे, परंतू त्यांनी मेलेले मासे पकडले होते. त्यामुळे त्यांना येथे मते मिळाली नाहीत. मते तेव्हाच मिळतात जेव्हा तुम्ही काही सार्थक करता. सहनी समुदाय आपले मत तेव्हाच देतो जेव्हा त्यांना काही ठोस काम दिसते.’ त्यांनी असेही सांगितले की सहनी समुदायाची मते मिळण्यासाठी काँग्रेसला आरजेडीची सोबत सोडावी लागेल.

अन्य एका व्यक्तीने सांगितले की राहुल गांधी यांचा मासे पकडणे एक दिखावा पेक्षा जास्त काही नव्हते. राहुल गांधी आले आणि तलावात उडी मारली. परंतू जे मासे पकडले ते मेलेले मासे होते, बाजारात विकले जाणार नव्हते.

येथे पाहा व्हिडीओ –

जनतेने ज्यांना नाकारले त्यांच्याशी केली आघाडी

एका अन्य व्यक्तीने सांगितले की निवडणूक हरण्याचे हे देखील कारण आहे की सर्वांनी लालू यादव यांचे सरकार पाहिलेले आहे. त्यांच्या कार्यकाळातील ‘जंगलराज’मध्ये सर्वसामान्य सुरक्षित नव्हते. मग ते मुकेश सहनी असो वा काँग्रेसचे राहुल गांधी त्यांनी त्या लोकांना सोबत आघाडी केली ज्यांना जनतेने आधीच अस्वीकार केले होते. हेच कारण आहे की बेगुसरायच्या लोकांनी मुकेश सहनी वा राहुल गांधी यांना पाठींबा दिला नाही.

Follow Us
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा.