AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्ता लोककल्याण मार्ग असला म्हणून काय लोकांचे कल्याण होत नाही; ईपीएफ व्याज दर कपातीवरून राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

केंद्र सरकारने ईपीएफच्या व्याज दरात कपात केली आहे. हाच मुद्दा पकडून राहुल गांधी यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारने साडेसहा कोटी कर्मचाऱ्यांचा वर्तमान आणि भविष्यकाळ बर्बाद केल्याची टीका त्यांनी केली आहे.

पत्ता लोककल्याण मार्ग असला म्हणून काय लोकांचे कल्याण होत नाही; ईपीएफ व्याज दर कपातीवरून राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
राहुल गांधीImage Credit source: tv9
| Updated on: Jun 04, 2022 | 12:44 PM
Share

मुंबई : केंद्र सरकारने ईपीएफच्या व्याज दरात कपात करत (EPF Interest Rate) लाखो कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. नव्या व्याज दरानुसार आता कर्मचाऱ्यांना ईपीएफवर 8.1 टक्के इतकेच व्याज मिळणार आहे. पूर्वी ईपीएफचा व्याज दर 8.5 टक्के इतका होता. ईपीएफमध्ये कपात करण्यात आल्याने आता वर्ष 2021 – 22 साठी कर्मचाऱ्यांना ईपीएफवर केवळ 8.1 टक्केच व्याज मिळणार आहे. ईपीएफच्या व्याज दरात कपात करण्यात आल्याने कर्मचारी नाराज आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी देखील याच मुद्द्यावरून पंतप्रधान मोदी (PM Modi) आणि केंद्रातील भाजपच्या सरकारवर निशाणा साधला आहे. घराचा पत्ता ‘लोक कल्याण मार्ग’ असा केल्याने लोकांचे कल्याण होत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साडेसहा कोटी कर्मचाऱ्यांचा वर्तमान आणि भविष्यकाळ बर्बाद केला आहे. केंद्राने सध्या महागाई वाढवा आणि कमाई घटवा मॉडेल लागू केल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे. त्यांनी ट्विट करत भाजपावर निशाणा साधला आहे.

नेमकं काय म्हटलं राहुल गांधींनी

केंद्र सरकारने ईपीएफच्या व्याज दरात कपात करण्यास मंजुरी दिली आहे. यावरून राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी ट्विट कर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. कोणी आपला पत्ता बदलून ‘लोक कल्याण मार्ग’ असा केला तर त्यामुळे लोकांचे कल्याण होत नाही. ईपीएफमध्ये जी कपात करण्यात आली आहे, त्यमुळे देशातील साडेसहा कोटी लोकांचे वर्तमान आणि भविष्यकाळ बर्बाद झाला आहे. केंद्राकडून महागाई वाढवली जात आहे, तर लोकांचे उत्पन्न कमी होत असल्याची टीका राहुल गांधी यांनी कली आहे.

कोट्यवधी कर्मचाऱ्यांना फटका

केंद्र सरकारने ईपीएफमध्ये कपात केल्याने याचा फटका सुमारे साडेसहा कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांना बसला आहे. पूर्वी ईपीएफचा व्याज दर हा  8.5 टक्के इतका होता. आता त्यामध्ये कपात करण्यात आली असून, तो  8.1 टक्के इतका करण्यात आला आहे. आता कर्मचाऱ्यांना  आर्थिक वर्ष 2021 – 22 साठी ईपीएफवर  8.1  दरानेच व्याज मिळणार आहे. व्याज दरात घट झाल्याने मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे.

Follow Us
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी घेण्याचे आवाहन!
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर; औरंगाबादमध्ये नवं समीकरण
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती समोर
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट खोल मॅनहोलमध्ये...
आता ऑपरेशन तुतारी! कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट
Sanjay Shirsat On Amol Kolhe | ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी! अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट, म्हणाले...
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक सियाच्या घरी पोहोचलं, पुढे काय घडलं?
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा; ऑपरेशन टायगर पुन्हा अॅक्टिव्ह!
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना अटक
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण...
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण... अमोल कोल्हेंचं मोठं विधान; चर्चांना मिळाला पूर्णविराम!