AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच साधला नितीश कुमार यांच्यावर निशाणा; राजभवनावरचा सांगितला तो किस्सा

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या भूमिकेवरून काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. जयराम रमेश यांनी त्यांना 'रंग बदलणारा सरडा' असे म्हटले होते. मात्र, राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच नितीश कुमार यांच्याबाबत वक्तव्य केले आहे.

राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच साधला नितीश कुमार यांच्यावर निशाणा; राजभवनावरचा सांगितला तो किस्सा
RAHUL GANDHIImage Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Feb 01, 2024 | 7:43 PM
Share

पाटणा | 1 फेब्रुवारी 2024 : इंडिया आघाडीची मोट बांधणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी अचानक यू टर्न घेतला. लालूप्रसाद यादव यांच्यापक्षासोबत असलेली युती तोडून नितीशकुमार यांनी भाजपच्या मदतीने राज्यात पुन्हा सरकार स्थापन केले. हा इंडिया आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. नितीशकुमार यांच्या या भूमिकेवरून राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच थेट भाष्य केले आहे. नितीशकुमार यांच्यावर टीका करताना राजभवनावर घडलेला एक किस्साही सांगितला. तर, अशा लोकांची गरज नाही असे म्हणत राहुल गांधी यांनी नितीशकुमार यांच्यावर निशाणा साधला.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बाजू बदलली आणि पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नितीश कुमार यांच्या या भूमिकेवरून काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. जयराम रमेश यांनी त्यांना ‘रंग बदलणारा सरडा’ असे म्हटले होते. मात्र, राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच नितीश कुमार यांच्याबाबत वक्तव्य केले आहे.

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा बिहारमध्ये दाखल झाली. या यात्रेदरम्यान लोकांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी नितीशकुमार यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, त्यांच्यावर थोडे दडपण आले होते. त्यांनी (नितीश कुमार) पाठ फिरवली. पण आम्हाला अशा लोकांची गरज नाही असा टोला त्यांनी लगावला.

नितीशकुमार यांच्यासारख्या थोड्याशा दडपणावर यू टर्न घेणाऱ्या लोकांची मला गरज नाही अशी टीका राहुल गांधी यांनी केली. यावेळी राहुल गांधी यांनी राजभवन येथे घडलेला एका किस्साही सांगितला. हा किस्सा त्यांना भूपेश बघेल यांनी सांगितल्याचे ते म्हणाले.

तुमच्या मुख्यमंत्र्यांनी (नितीशकुमार) राज्यपाल यांच्यासमोर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या मंत्र्यांनीही शपथ घेतली. टाळ्यांचा कडकडाट झाला. यानंतर ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे रवाना झाले. कारमध्ये त्यांच्या लक्षात आले की त्यांची शाल राजभवनातच राहिली. त्यांनी चालकाला पुन्हा राजभवन येथे जाण्यास सांगितले. राज्यपालांकडे पोहोचल्यावर त्यांनी विचारले, ‘अरे, इतक्या लवकर परत आलात का?’ बिहारमध्ये अशी परिस्थिती सुरु आहे असा टोला राहुल गांधी यांनी नितीशकुमार यांना लगावला.

Follow Us
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....