AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वे अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांना चालना देणार, पुणे-हैदराबाद-चेन्नई थेट नवीन गाड्या…

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून 2026-27 च्या रेल्वे अर्थसंकल्पावर चर्चा केली. यादरम्यान त्यांनी राजस्थानला 2026-27 या वर्षात 10,228 कोटी बजेट दिल्याचे नमूद केले. अनेक विकासकामे रेल्वे स्टेशन सुरू आहेत.

रेल्वे अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांना चालना देणार, पुणे-हैदराबाद-चेन्नई थेट नवीन गाड्या...
railway minister ashwini vaishnaw
| Updated on: Feb 04, 2026 | 9:09 AM
Share

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी संसदेत अर्थसंकल्प मांडला. विकसित भारतावर या अर्थसंकल्पात भर देण्यात आला. अनेक मोठ्या घोषणा देखील केल्या. कर प्रणालीत कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आला नाही. पर्यटनासंदर्भात काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या. यासोबतच यावेळी रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वे पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. या संदर्भात, जोधपूरच्या भगत की कोठी रेल्वे स्थानकाला एक मोठी भेट मिळणार आहे. भगत की कोठी रेल्वे स्थानकाला नवे हब बनवले जाणार असून तिथे वंदे भारतसारख्या गाड्यांच्या देखभालीची व्यवस्था केली जाईल. यामुळे थेट फायदा होईल आणि तांत्रिक सुविधा वाढतीलच शिवाय प्रदेशातील रेल्वेचे आधुनिकीकरण होईल आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. यामुळे अनेक लोकांना धडाधड नोकऱ्या मिळण्यास मोठी मदत होईल.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून 2026-27 च्या रेल्वे अर्थसंकल्पावर चर्चा केली. यादरम्यान त्यांनी राजस्थानला 2026-27 या वर्षात 10,228 कोटी रुपयांचे विक्रमी बजेट वाटप मिळाले असल्याचे नमूद केले. त्यांनी माहिती देताना सांगितले की, राजस्थानमधील 85 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत 4,500 कोटींपेक्षा जास्त खर्चाने केला जात आहे, ज्याचे काम वेगाने सुरू आहे.

मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले की, जोधपूरहून वंदे भारत बिकानेरहून आणि जैसलमेरहून स्वर्ण नगरी एक्सप्रेससारख्या  गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. याशिवाय जोधपूर ते पुणे, हैदराबाद आणि चेन्नई अशी नवीन रेल्वे सेवा देखील सुरू करण्यात आली आहे. ज्यामुळे प्रवाशांना मोठी सुविधा मिळत आहे. यामुळे दरवर्षीच्या तुलनेत राजस्थानला पर्यटनासाठी जाणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे.

जोधपूरचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अनुराग त्रिपाठी यांनी माध्यमांसोबत बोलताना म्हटले की, राजस्थानमध्ये रेल्वे पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मोठे बजेट उपलब्ध आहे. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत विविध स्थानकांवर पुनर्विकासाचे काम सुरू आहे, लवकरच हे काम पूर्ण होतील. मेगा रेल्वे विकास प्रकल्पांतर्गत वंदे भारत देखभाल डेपो, जोधपूर जैसलमेर पाली मारवाड स्थानकांशी संबंधित कामांचीही त्यांनी माहिती दिली.

भगत की कोठी येथे नवीन रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. अनुराग त्रिपाठी यांनी पुढे बोलताना म्हटले की,  उत्तर पश्चिम रेल्वेच्या संपूर्ण रेल्वे नेटवर्कवर त्याचे काम मंजूर करण्यात आले आहे. जैसलमेर स्थानकावरील पुनर्विकासाचे काम पूर्ण झाले आहे आणि लवकरच त्याचे उद्घाटन केले जाईल. या मार्गावर रेल्वे गाड्याही वाढवल्या जाणार आहेत.

चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु.
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?.
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा.
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ.
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत.
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित.
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.