AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये निर्माणाधीन बोगदा कोसळला, 10 जणांचा मृत्यू; दोन दिवसांनंतर बचावकार्य थांबवलं

दोन दिवसांपूर्वी या राष्ट्रीय महामार्गावरील बोगद्याचा काही भाग कोसळला होता. त्यामुळे काम करत असलेले काही मजूर त्यात अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी तातडीने बचावकार्याला सुरुवात करण्यात आली. दोन दिवसानंतर जेव्हा हे बचावकार्य थांबवण्यात आलं

Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये निर्माणाधीन बोगदा कोसळला, 10 जणांचा मृत्यू; दोन दिवसांनंतर बचावकार्य थांबवलं
रामबन बोगदा दुर्घटनेतील बचावकार्य दोन दिवसांनी थांबवलंImage Credit source: ANI
| Updated on: May 22, 2022 | 12:02 AM
Share

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर (Jammu Shrinagar National Highway) एक निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग कोसळल्यानंतर सुरु करण्यात आलेलं बचावकार्य शनिवारी थांबवण्यात आलं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मलब्याखालून 9 मृतदेह (Dead Bodies) काढण्यात आले आहेत. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या 10 वर पोहोचली आहे. दोन दिवसांपूर्वी या राष्ट्रीय महामार्गावरील बोगद्याचा काही भाग कोसळला होता. त्यामुळे काम करत असलेले काही मजूर त्यात अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी तातडीने बचावकार्याला (Rescue work) सुरुवात करण्यात आली. दोन दिवसानंतर जेव्हा हे बचावकार्य थांबवण्यात आलं. त्यावेळी 10 मृतदेह मिळाल्याची माहिती रामबन उपजिल्हाधिकारी मुसर्रत इस्लाम यांनी दिली.

10 मृतांपैकी 5 जण पश्चिम बंगालचे

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व 10 मृतांच्या नातेवाईकांना दुर्घटनेची माहिती देण्यात आली आहे. 10 मृतांपैकी 5 जण पश्चिम बंगालचे असल्याची माहिती मिळतेय. तर आसामचा एकजण, नेपाळचे 2 तर दोघे स्थानिक रहिवासी होते. मृतदेह बाहेर काढल्यानंतर ते रुग्णालयात नेण्यात आले. निष्काळजीपणाचा ठपका ठेवत एफआयआर दाखल करण्यात आलाय. सर्व बेपत्ता मजुरांचे मृतदेह मिळाल्यानंतर शनिवारी दुपारी बचावकार्य थांबवण्यात आलं. दुर्घटना घडल्यानंतर तातडीने गुरुवार आणि शुक्रवारी दिवसरात्र बचावकार्य सुरु होतं. त्यात तीन लोकांना सुखरुपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे.

दोन दिवस चाललं बचावकार्य

यापूर्वी अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की, रामबन जिल्ह्याच्या खूनी नाला इथं निर्माणाधीन बोगद्याचं काम सुरु होतं. त्यादरमान बोगद्याचा काही भाग कोसळला. मात्र, शनिवारी रामबनचउ उपायुक्त मुसर्रत इस्लाम यांनी नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या हवाल्याने सांगितलं की काम सुरु असलेल्या भागात T4 पर्यंत भूस्खलन झालं.

बचावकार्यात इंडो-तिबेट पोलीस सहभागी झाले होते. 15 व्या बटालियन ITBP चे जवान एका स्निफर डॉगसह बचावकार्यात सहभागी झाले होते. या दुर्घटनेत मनुष्यहानीसह बुलडोझर आणि अन्य वाहनांचंही मोठं नुकसान झाल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.