AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेशन वितरण प्रणालीत मोठा बदल, या कुटुंबांना आता कमी धान्य मिळणार; सरकारचा प्रस्तावित निर्णय काय?

Antyodaya Anna Yojana : आता देशाच्या सार्वजनिक वितरण प्रणाली आणि रेशन व्यवस्थेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा (दुरुस्ती) विधेयक, 2026 चा मसुदा जाहीर केला आहे. यात काय बदल प्रस्तावित आहे त्याची माहिती जाणून घेऊयात.

रेशन वितरण प्रणालीत मोठा बदल, या कुटुंबांना आता कमी धान्य मिळणार; सरकारचा प्रस्तावित निर्णय काय?
Ration Scheme rule changeImage Credit source: Google
| Updated on: Jun 24, 2026 | 3:14 PM
Share

सरकारतर्फे देशातील जनतेला रेशन वाटप केले जाते, आता देशाच्या सार्वजनिक वितरण प्रणाली आणि रेशन व्यवस्थेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा (दुरुस्ती) विधेयक, 2026 चा मसुदा जाहीर केला आहे. या मसुद्यात अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत रेशन वितरणाच्या पद्धतीत बदल करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. सरकारचे म्हणणे आहे की या बदलाचा उद्देश अन्न आणि पोषण सुरक्षा अधिक मजबूत करणे तसेच वितरण व्यवस्था अधिक न्याय्य बनवणे हा आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

रस्तावित बदल काय आहे?

सध्या अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला दरमहा 35 किलो धान्य दिले जाते. म्हणजे कुटुंबात 2-3 लोक असोत किंवा 10 लोक असोत, अशा कुटुंबांना 35 किलो धान्य दिले जाते. मात्र आता ही व्यवस्था बदलून प्रति व्यक्ती दरमहा 7 किलो धान्य देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. म्हणजेच आता जर एखाद्या कुटुंबात 3 लोक असतील तर त्यांना फक्त 21 किलो धान्य मिळेल. या प्रस्तावामुळे छोट्या कुटुंबांना मोठा फटका बसणार आहे. सरकारने हेही स्पष्ट केले आहे की एका कुटुंबाला मिळणाऱ्या धान्याची कमाल मर्यादा 35 किलो प्रतिमहिना कायम राहणार आहे. म्हणजेच एखाद्या कुटुंबात 10 सदस्य असले तरीही त्या कुटुंबाला 35 किलोच धान्य मिळेल.

या बदलाचा काय फायदा होणार?

सरकारचा हा प्रस्तावित बदल लागू झाल्यास रेशन वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता आणि समतोल निर्माण होईल. यामुळे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या गरजेनुसार धान्य उपलब्ध होईल. मोठ्या आणि गरजू कुटुंबांना याचा अधिक फायदा होऊ शकतो.

जनतेकडून सूचना मागवल्या

केंद्र सरकारने या मसुदा विधेयकावर सर्वसामान्य नागरिक, तज्ज्ञ आणि इतर संबंधित घटकांकडून सूचना व हरकती मागवल्या आहेत. आता याबाबत नागरिक 13 जुलै 2026 पर्यंत आपली मते आणि सूचना सरकारकडे पाठवू शकतात. त्यानंतर प्राप्त सूचनांचा आढावा घेऊन विधेयकात आवश्यक बदल करण्यात येतील आणि पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

Follow Us
15 लाख घरांची मोठी घोषणा! जयकुमार गोरेंचं विधानसभेत मोठं आश्वासन
15 लाख घरांची मोठी घोषणा! जयकुमार गोरेंचं विधानसभेत मोठं आश्वासन, म्हणाले...
धनंजय मुंडेंना थेट... बीडमध्ये मोठं घडतंय? बजरंग सोनावणेंच्या विधानाने
धनंजय मुंडेंना थेट... बीडमध्ये मोठं घडतंय? बजरंग सोनावणेंच्या विधानाने खळबळ
मुंबईकरांनो सावधान! काल बीकेसीत तर आज रेल्वे स्थानकावर आढळले विषारी...
मुंबईकरांनो सावधान! काल बीकेसीत तर आज रेल्वे स्थानकावर आढळले विषारी साप; चक्क रेल्वेच्या... पहा व्हिडीओ
6 फुटीर खासदारांच्या विरोधात खोके घेऊन रस्त्यावर उतरले ठाकरे समर्थक!
Jalna Thackeray Sena Protest | 6 फुटीर खासदारांच्या विरोधात खोके घेऊन रस्त्यावर उतरले ठाकरे समर्थक! थेट भीक मागत...
पद्मसिंह पाटलांच्या निर्दोष मुक्ततेनंतर मोठं घडणार; 8-10 दिवसांतच...
पद्मसिंह पाटलांच्या निर्दोष मुक्ततेनंतर मोठा निर्णय; 8-10 दिवसांतच... नातू मल्हार पाटलाने दिली सविस्तर माहिती
बापरे! थेट पूलच कोसळला, खडीने भरलेला ट्रक दरीत, पण ड्रायव्हर...
Video | बापरे! थेट पूलच कोसळला, खडीने भरलेला ट्रक दरीत, पण ड्रायव्हर...
लोकलचा दरवाजा बंद कर म्हणणं जीवावर बेतलं! 22 वर्षीय तरुणाची चाकूने....
मोठी बातमी! लोकलचा दरवाजा बंद कर म्हणणं जीवावर बेतलं! 22 वर्षीय तरुणाची चाकूने हत्या, नेमकं घडलं काय?
पेणमधील मुर्तीकारांची मेहनत पाण्यात! गणेशोत्सव काही महिन्यांवर असतानाच
पेणमधील मुर्तीकारांची मेहनत पाण्यात! गणेशोत्सव काही महिन्यांवर असतानाच भयंकर घडलं...
पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई! कुर्ला-सायनमध्ये पाण्यामुळे वाहतूक कोलम
Mumbai Rain Traffic | पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई! कुर्ला-सायनमध्ये पाण्यामुळे वाहतूक कोलमडली
टीका, ट्रोलिंग अन् राजकीय गदारोळ; वाद वाढताच नार्वेकरांनी मागितली माफी
Rahul Narvekar | टीका, ट्रोलिंग अन् राजकीय गदारोळ; वाद वाढताच राहुल नार्वेकरांनी मागितली माफी, जे घडलं ते चुकीचं...