बिपीन रावतांच्या मेव्हण्याच्या जमिनीवर मध्यप्रदेश सरकारचा बुलडोझर; सोशल मीडियावर टाकली पोस्ट

सीडीएस बिपीन रावत यांच्या मृत्यूला आठवडाही उलटत नाही तोच रावत यांच्या मेव्हण्याच्या जमिनीवर मध्यप्रदेश सरकारने बुलडोझर चालवल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

बिपीन रावतांच्या मेव्हण्याच्या जमिनीवर मध्यप्रदेश सरकारचा बुलडोझर; सोशल मीडियावर टाकली पोस्ट
road roller on land
Follow us
| Updated on: Dec 14, 2021 | 7:09 PM

भोपाळ: सीडीएस बिपीन रावत यांच्या मृत्यूला आठवडाही उलटत नाही तोच रावत यांच्या मेव्हण्याच्या जमिनीवर मध्यप्रदेश सरकारने बुलडोझर चालवल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. तसा आरोपच रावत यांच्या मेव्हण्याने केला आहे.

बिपीन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचे बंधू यशवर्धन सिंह हे मध्यप्रदेशातील शहडोल जिल्ह्यात राहतात. सोहापूर येथे त्यांची जमीन आहे. मध्य प्रदेश सरकारने कोणतीही नोटीस न बजावता त्यांची जमीन ताब्यात घेतल्याचा आरोप यशवर्धन यांनी केला आहे. यशवर्धन यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून काँग्रेस सरकारच्या कारवाईवर प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहेत.

मोठी बहीण मधुलिका यांचं निधन झाल्याने यशवर्धन हे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी दिल्लीत आले होते. ते दिल्लीत असतानाच मध्य प्रदेश सरकारने त्यांची जमीन ताब्यात घेतली. त्याबाबत यशवर्धन सोशल मीडियावर पोस्ट टाकली आहे. ज्या दिवशी बिपीन रावत आणि बहीण मधुलिका यांचं अंत्यसंस्कार केलं जात होतं. त्याच दिवशी माझ्या जमिनीवर ताबा मिळवण्यात आला. माझ्या खासगी जमिनीवर मी बांधकाम केलं होतं. हे बांधकाम अवैध असल्याचं सांगून त्यावर बुलडोझर फिरवण्यात आला. झाडे तोडण्यात आली. राष्ट्रीय महामार्गासाठी हे सर्व केले गेले. आम्ही त्यात हस्तक्षेप केल्याने आमच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आम्ही न्याय मागत आहोत, असं यशवर्धन यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन

शहडोलजवळ राजाबाग सोहागपूरमध्ये राष्ट्रीय महामार्ग तयार होत आहे. त्यासाठी खासगी जमिनी अधिग्रहित केल्या जात आहेत. यात यशवर्धन यांच्या जमिनीचाही समावेश आहे. आमच्या खासगी जमिनीचं अधिग्रहण झालेलंच नाही, तरीही त्यावर ताबा मिळवला गेला आहे, असा आरोप त्यांनी केला. आमचं कुटुंब दिल्लीत होतं. तेव्हा ठेकेदार मनोज दीक्षित यांचा फोन आला. त्यांनीच मला जमीन संपादीत केल्याचं सांगितलं. दसऱ्याच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्याशी चर्चा झाली होती. त्यावेळी त्यांनी जमिनीचं अधिग्रहण होणार असल्याचं सांगितलं होतं. दरम्यान, जिल्हाधिकारी वंदना वैद्य यांनी हे प्रकरण मला कळलं असून त्याची चौकशी करण्याचे आदेश तहसिलदारांना दिली आहे, असं सांगितलं.

काँग्रेस नेत्याची टीका

दरम्यान, काँग्रेसचे मध्यप्रदेशचे सचिव केके मिश्रा यांनी या प्रकरणी सरकारवर टीका केली आहे. ज्या दिवशी रावत यांचा मृत्यू झाला, त्याच दिवशी त्यांच्या मेव्हण्याच्या जमिनीवर ताबा मिळवण्यात आला ही संतापजनक बाब आहे. देशाच्या अस्सल हिरोचा या पेक्षा दुसरा काय अवमान असू शकतो, असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या:

स्वाधार शिष्यवृत्ती, वसतिगृह प्रवेश व परदेश शिष्यवृत्ती प्रक्रिया आता ऑनलाईन होणार, विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

सावधान… गोरे दिसण्यासाठी तुम्ही वापरत आहात स्किन व्हाइटिंग क्रीम; या क्रीमने होऊ शकतं त्वचेचं नुकसान

’इट स्मार्ट सिटीज’ चॅलेंजमध्ये ठाण्याचा देशातील पहिल्या 20 शहरात समावेश

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.