AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mohan Bhagwat : शेजारच्या देशातील Gen Z च्या आंदोलनावर मोहन भागवत यांचं अत्यंत महत्वपूर्ण भाष्य

Mohan Bhagwat : "आज निसर्गाचा कोप वाढला आहे. आज डोंगररागांमध्ये हे दिसतय. हिमालय आपल्या सुरक्षेची भिंत आहे. आजची हिमालयाची अवस्था धोक्याची घंटा वाजवत आहे. राजकीय जीवनात गोंधळ वाढलाय" असं मोहन भागवत म्हणाले.

Mohan Bhagwat :  शेजारच्या देशातील Gen Z च्या आंदोलनावर मोहन भागवत यांचं अत्यंत महत्वपूर्ण भाष्य
Mohan Bhagwat
| Updated on: Oct 02, 2025 | 9:58 AM
Share

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला आज 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. आरएसएस शताब्दी वर्ष साजरं करत आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही रेशीमबागेत संघाचा विजया दशमीचा कार्यक्रम आहे. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशासमोरचे प्रश्न मांडताना विविध मुद्यांना स्पर्श केला. यावेळी शेजारच्या देशातील Gen Z च्या आंदोलनांवर मोहन भागवत यांनी अत्यंत महत्वपूर्ण भाष्य केलं. “आपल्याला शेजारच्या देशात गोंधळ पहायला मिळतोय. कधी कधी प्रशासन जनतेला विचारात न घेता धोरणं आखतात. त्यांच्यामध्ये असंतोष असतो, पण ते अशा पद्धतीने व्यक्त होणं योग्य नाही. इतकी हिंसा योग्य नाही. लोकशाही पद्धतीने बदल घडवता येतो” असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. काही दिवसांपूर्वी नेपाळमध्ये हिंसक आंदोलन झालं होतं. त्यानंतर तिथे सत्तांतर झालं. त्या पार्श्वभूमीवर मोहन भागवत हे बोलले.

“विद्यमान अर्थ प्रणालीमध्ये दोष आहेत. यामुळे श्रीमंती-गरीबी वाढते. शोषणाच नवीन तंत्र तयार होतं. आज एकटा देश आयसोलेशनमध्ये राहू शकत नाही. आपल्यासाठी स्वदेशी आणि स्वावलंबनाला पर्याय नाही. आंतरराष्ट्रीय जगाशी जोडणं ही मजबुरी नाही, ते आपल्या इच्छेने झालं पाहिजे” असं मोहन भागवत म्हणाले. “आज निसर्गाचा कोप वाढला आहे. आज डोंगररागांमध्ये हे दिसतय. हिमालय आपल्या सुरक्षेची भिंत आहे. आजची हिमालयाची अवस्था धोक्याची घंटा वाजवत आहे. राजकीय जीवनात गोंधळ वाढलाय” असं मोहन भागवत म्हणाले.

रामनाथ कोविंद यंदाचे मुख्य अतिथी

“जागतिक व्यवस्थेत परिवर्तन आवश्यक आहे. विनाश टाळण्यासाठी गरजेच आहे. आपण इतके पुढे गेलोय की, लगेच मागे वळलो तर गाडी पलटी होईल. आता आपल्याला हळूहळू पुढे जाऊन परतीचा मार्ग पकडावा लागेल. कुठलीही व्यवस्था बनवणारा समाज आहे” असं मोहन भागवत म्हणाले. सकाळी 7.40 च्या सुमारास रेशीम बागेत हा कार्यक्रम सुरु झाला. या कार्यक्रमाला 21 हजारांपेक्षा जास्त स्वयंसेवक उपस्थित होते. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यंदाचे मुख्य अतिथी आहेत. संघ प्रमुखांच्या आजच्या भाषणाकडे सगळ्या देशाच लक्ष असतं.

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.