AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mohan Bhagwat : शेजारच्या देशातील Gen Z च्या आंदोलनावर मोहन भागवत यांचं अत्यंत महत्वपूर्ण भाष्य

Mohan Bhagwat : "आज निसर्गाचा कोप वाढला आहे. आज डोंगररागांमध्ये हे दिसतय. हिमालय आपल्या सुरक्षेची भिंत आहे. आजची हिमालयाची अवस्था धोक्याची घंटा वाजवत आहे. राजकीय जीवनात गोंधळ वाढलाय" असं मोहन भागवत म्हणाले.

Mohan Bhagwat :  शेजारच्या देशातील Gen Z च्या आंदोलनावर मोहन भागवत यांचं अत्यंत महत्वपूर्ण भाष्य
Mohan Bhagwat
| Updated on: Oct 02, 2025 | 9:58 AM
Share

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला आज 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. आरएसएस शताब्दी वर्ष साजरं करत आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही रेशीमबागेत संघाचा विजया दशमीचा कार्यक्रम आहे. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशासमोरचे प्रश्न मांडताना विविध मुद्यांना स्पर्श केला. यावेळी शेजारच्या देशातील Gen Z च्या आंदोलनांवर मोहन भागवत यांनी अत्यंत महत्वपूर्ण भाष्य केलं. “आपल्याला शेजारच्या देशात गोंधळ पहायला मिळतोय. कधी कधी प्रशासन जनतेला विचारात न घेता धोरणं आखतात. त्यांच्यामध्ये असंतोष असतो, पण ते अशा पद्धतीने व्यक्त होणं योग्य नाही. इतकी हिंसा योग्य नाही. लोकशाही पद्धतीने बदल घडवता येतो” असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. काही दिवसांपूर्वी नेपाळमध्ये हिंसक आंदोलन झालं होतं. त्यानंतर तिथे सत्तांतर झालं. त्या पार्श्वभूमीवर मोहन भागवत हे बोलले.

“विद्यमान अर्थ प्रणालीमध्ये दोष आहेत. यामुळे श्रीमंती-गरीबी वाढते. शोषणाच नवीन तंत्र तयार होतं. आज एकटा देश आयसोलेशनमध्ये राहू शकत नाही. आपल्यासाठी स्वदेशी आणि स्वावलंबनाला पर्याय नाही. आंतरराष्ट्रीय जगाशी जोडणं ही मजबुरी नाही, ते आपल्या इच्छेने झालं पाहिजे” असं मोहन भागवत म्हणाले. “आज निसर्गाचा कोप वाढला आहे. आज डोंगररागांमध्ये हे दिसतय. हिमालय आपल्या सुरक्षेची भिंत आहे. आजची हिमालयाची अवस्था धोक्याची घंटा वाजवत आहे. राजकीय जीवनात गोंधळ वाढलाय” असं मोहन भागवत म्हणाले.

रामनाथ कोविंद यंदाचे मुख्य अतिथी

“जागतिक व्यवस्थेत परिवर्तन आवश्यक आहे. विनाश टाळण्यासाठी गरजेच आहे. आपण इतके पुढे गेलोय की, लगेच मागे वळलो तर गाडी पलटी होईल. आता आपल्याला हळूहळू पुढे जाऊन परतीचा मार्ग पकडावा लागेल. कुठलीही व्यवस्था बनवणारा समाज आहे” असं मोहन भागवत म्हणाले. सकाळी 7.40 च्या सुमारास रेशीम बागेत हा कार्यक्रम सुरु झाला. या कार्यक्रमाला 21 हजारांपेक्षा जास्त स्वयंसेवक उपस्थित होते. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यंदाचे मुख्य अतिथी आहेत. संघ प्रमुखांच्या आजच्या भाषणाकडे सगळ्या देशाच लक्ष असतं.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत