AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशाच्या सर्वांगीण विकासात आरएसएसची महत्त्वाची भूमिका – महेंद्रपाल सिंह ढिल्लन

आज विजयादशमीनिमित्त संघाचा दसरा मेळावा पार पडला, आजपासून संघाच्या शताब्दी वर्षाची सुरुवात झाली आहे, यानिमित्त तख्त श्री हरिमंदिर जी पटना साहिबचे धर्म प्रचार समिती अध्यक्ष महेंद्रपाल सिंह ढिल्लन यांनी संघाचं कौतुक करताना समाजाप्रति संघाचं असलेलं योगदान अधोरेखित केलं आहे.

देशाच्या सर्वांगीण विकासात आरएसएसची महत्त्वाची भूमिका - महेंद्रपाल सिंह ढिल्लन
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 02, 2025 | 9:48 PM
Share

आज विजयादशमीनिमित्त संघाचा दसरा मेळावा पार पडला, आजपासून संघाच्या शताब्दी वर्षाची सुरुवात झाली आहे, यानिमित्त तख्त श्री हरिमंदिर जी पटना साहिबचे धर्म प्रचार समिती अध्यक्ष महेंद्रपाल सिंह ढिल्लन यांनी संघाचं कौतुक करताना समाजाप्रति संघाचं असलेलं योगदान अधोरेखित केलं आहे.

नेमकं काय म्हणाले महेंद्रपाल सिंह ढिल्लन?

जगातील सर्वात मोठ्या संघटनेला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत, ही खूप आनंदाची बाब आहे. निःस्वार्थ राष्ट्रसेवेच्या भावनेने, या संघटनेने अनेक जागतिक विक्रम प्रस्थापित केले आहेत. “माझे शरीर, माझे मन आणि हे जीवन समाजासाठी समर्पित आहे” या भावनेने भारलेल्या, स्वयंसेवकांनी देशाच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. व्यक्ती श्रेष्ठ नाही तर विचार श्रेष्ठ आहेत. या भावनेने, संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी भारताची शाश्वत पवित्र ओळख असलेल्या भगव्या ध्वजाला आपले गुरु म्हणून स्वीकारले.

भारताच्या फाळणीच्या वेळी पाकिस्तानातून आलेल्या लाखो हिंदू आणि शीख समुदायांच्या लोकांची काळजी घेणे, त्यांच्या पुनर्वसनाची व्यवस्था करणे, 1962 च्या चीनशी झालेल्या युद्धात देशाचे अंतर्गत व्यवहार सांभाळणे, यासोबतच भूकंप, पूर आणि जेव्हा -जेव्हा मानवावर नौसर्गिक आपत्ती येईल, त्या -त्या काळात संघाचे स्वयंसेवक नेहमीच मदतीसाठी धावून आले आहेत. स्वयंसेवकांनी आपलं जीवन मानवतेसाठी समर्पित केलं आहे.

१९८४ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर,जे शीखविरोधी हत्याकांड घडलं, त्यावेळी हजारो शीख कुटुंबांना सुरक्षा आणि संरक्षण देण्यासाठी संघानं पुढाकार घेतला होता. 26 डिसेंबर हा दिवस वीरबाल दिन म्हणून घोषित करणे, करतारपूर कॉरिडॉरचे बांधकाम आणि दिल्ली शीख दंगलीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना सरकारी नोकरी मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न हे स्वयंसेवकांच्या दशगुरु परंपरेप्रती असलेल्या अढळ समर्पणाचे परिणाम आहेत. ही जगातील एकमेव संघटना आहे, जिने आपल्या 100 वर्षांच्या प्रवासात कधीही कोणत्याही प्रकारचं विभाजन किंवा वाद अनुभवला नाही. अशा पवित्र संघटनेच्या शताब्दीनिमित्त, संघाचे कार्य अधिक बळकट होवो, संघ वाढत राहो आणि हिंदू, शीख, बौद्ध, जैन, कबीर, नानक व इतर सर्व भारतीय धर्मांमध्ये एकतेचा हा विचार सर्व स्वरूपात विजयी होवो, असं महेंद्रपाल सिंह ढिल्लन यांनी म्हटलं आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.