AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेवटी पीओके भारताचे आहे आणि ते भारतात परत येईल – एस जयशंकर

पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात हॉट विषय ठरत आहे. भाजपचे नेते आता पीओकेवर बोलत आहे. दुसरीकडे पीओकेमध्ये देखील लोकं रस्त्यावर उतरले आहेत. तेथील अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. त्यामुळे पाकिस्तानची चिंता ही वाढली आहे.

शेवटी पीओके भारताचे आहे आणि ते भारतात परत येईल - एस जयशंकर
| Updated on: May 16, 2024 | 6:35 PM
Share

S Jaishankar on POK : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकव्याप्त काश्मीर (पीओके) भारताचा अविभाज्य भाग असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की शेवटी भारतात ते परत येईल. एस जयशंकर म्हणाले की, तेथील जनता आता त्यांच्याच सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरली आहे. पीओकेमधील वाढत्या अशांतता आणि सततच्या हिंसाचाराला उत्तर देताना जयशंकर म्हणाले की, जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर होत असलेला विकास पीओकेमधील लोक पाहत आहेत आणि प्रभावित होत आहेत यात शंका नाही.

PoK मधील लोक आता नियंत्रण रेषेवर (LOC) सकारात्मक बदल पाहत आहेत. ते स्वतःला विचारत आहेत की जर गोष्टी अशा आहेत, तर आम्हाला त्रास का होत आहे. आम्ही अशा अत्याचार का स्वीकारत आहोत? याचा फटका त्यांना निःसंशयपणे बसत आहे.

लोक आता हिंसाचाराला कंटाळले आहेत: जयशंकर

परराष्ट्र मंत्री पुढे म्हणाले की, पीओकेच्या मुझफ्फराबादमध्ये संपूर्ण अराजकता आहे, जिथे स्थानिक लोक हिंसक निदर्शनांना कंटाळले आहेत. वाढती महागाई आणि वाढलेली वीजबिल यावरून गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांशी चकमक सुरू आहे.

जयशंकर म्हणाले की पीओके ही एक वेगळी श्रेणी आहे, कारण शेवटी पीओके भारताचे आहे आणि ते भारतात परत येईल, मला वाटत नाही की आम्हाला याबद्दल कधीही शंका असावी.

जयशंकर म्हणाले की पीओकेचे लोक कदाचित त्यांच्या परिस्थितीची तुलना जम्मू-काश्मीरशी करत असतील आणि भारताच्या या केंद्रशासित प्रदेशात वेगाने प्रगती झाली आहे. जम्मू-काश्मीरची प्रगती पाहून पीओकेमध्ये खळबळ उडाली आहे. तेथील परिस्थितीचे विश्लेषण अत्यंत क्लिष्ट असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

परराष्ट्र मंत्री जयशंकर पुढे म्हणाले की, पीओके मधील लोकांना कळाले की त्यांना गृहीत पकडले गेले आहे, त्यांच्याशी भेदभाव केला गेला आहे आणि वाईट वागणूक दिली गेली आहे.

पीओके भारतात केव्हा विलीन होईल असे विचारले असता, जयशंकर यांनी प्रश्न दुरुस्त केला आणि पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग आहे आणि नेहमीच राहील याचा पुनरुच्चार केला.

परराष्ट्र मंत्री म्हणाले की, कलम 370 लागू होईपर्यंत, आपल्या देशात, खरं तर, पीओकेबद्दल फारशी चर्चा झाली नव्हती. १९९० च्या दशकात एक काळ असा होता जेव्हा पाश्चिमात्य देशांनी आपल्यावर थोडा दबाव आणला होता. त्यावेळी संसदेने एकमताने ठराव केला होता. जयशंकर यांची ही टिप्पणी अशा वेळी आली आहे जेव्हा शुक्रवारपासून पीओकेमध्ये हिंसक निदर्शने सुरू आहेत.

आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिसवा शर्मा यांनी देखील पीओके भारतात आणण्यासाठी मोदींना ४०० हून अधिक जागा हव्या आहेत. असे म्हटले आहे.

Follow Us
बागेश्वर बाबाने मागितली पुन्हा एकदा शिवप्रेमींची माफी, आता म्हणाले…
बागेश्वर बाबाने मागितली पुन्हा एकदा शिवप्रेमींची माफी, आता म्हणाले….
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.