Rajastan Cabinet Reshuffle: आमच्या पक्षात दुफळी नाही, नेतृत्वाने योग्य पाऊलं घेतली, दलित चेहऱ्यांनाही जागा- सचिन पायलट

रविवारी दुपारी 4 वाजता शपथविधी सोहळा होणार असून त्यात 11 आमदारांना कॅबिनेट आणि चार राज्यमंत्रीपदाची शपथ दिली जाणार आहे. राज्यातील काँग्रेस सरकार पुढील महिन्यात आपल्या कार्यकाळाची तीन वर्षे पूर्ण करत आहे. मंत्रिमंडळातील हा पहिला फेरबदल असून, याकडे पक्षश्रेष्ठींचा प्रादेशिक आणि जातीय समतोल साधण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे.

Rajastan Cabinet Reshuffle: आमच्या पक्षात दुफळी नाही, नेतृत्वाने योग्य पाऊलं घेतली, दलित चेहऱ्यांनाही जागा- सचिन पायलट
Ashok Gehlot and Sachin Pilot
Follow us
| Updated on: Nov 21, 2021 | 11:52 AM

जयपूर: राजस्थानमध्ये आज मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. रविवारी सचिन पायलट म्हणाले की, बरीच चर्चा आणि विचारविनिमय केल्यानंतर नेतृत्वाने योग्य पाऊलं घेतली आहेत आणि जी उणीव आहे ती भरून काढली आहो याचा आनंद आहे. 4 दलित चेहऱ्यांना स्थान देण्यात आले आहे. आमच्या सरकारमध्ये दलित समाजातील लोकांना मोठ्या प्रमाणात स्थान देण्यात आले आहे. सचिन पायलट यांनी मंत्रिमंडळात बदल झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत पक्षात कोणतेही दोन रट नसल्याचे सांगितले. राजस्थानात शनिवारी मोठे फेरबदल झाले. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या संपूर्ण कॅबिनेट मंत्र्यांनी राजीनामे दिले. मंत्रिमंडळाचं विस्तारात 11 नव्या चेहऱ्यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात येणार आहेत.

मंत्रिमंडळ विस्तारात प्रियंका गांधींची छाप

पायलट म्हणाले की, आज सकाळी मी वर्तमानपत्र वाचत होतो, या गटाचे इतके मंत्री, या गटाचे इतके मंत्री… आमच्या पक्षात कोणतीही दुफळी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अमित मालवीय यांच्या प्रश्नावर पायलट म्हणाले की, यूपीचा मुद्दा तिकीट देण्याचा होता आणि येथे मंत्रिमंडळात 1 ते 3 जागा देण्यात आल्या आहेत.

मंत्रिमंडळात प्रियांका गांधींची छाप दिसून येत आहे. तीन महिलांना मंत्री करण्यात आले आहे. सचिन पायलट म्हणाले की, त्यांनी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांची विचारसरणी पुढे आणली असून या विचारसरणीनुसार तीन महिलांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. एससी आणि एसटी मंत्रीही करण्यात आले आहेत.

राजस्थानात पंजाब फॉर्म्युला?

रविवारी दुपारी 4 वाजता शपथविधी सोहळा होणार असून त्यात 11 आमदारांना कॅबिनेट आणि चार राज्यमंत्रीपदाची शपथ दिली जाणार आहे. राज्यातील काँग्रेस सरकार पुढील महिन्यात आपल्या कार्यकाळाची तीन वर्षे पूर्ण करत आहे. मंत्रिमंडळातील हा पहिला फेरबदल असून, याकडे पक्षश्रेष्ठींचा प्रादेशिक आणि जातीय समतोल साधण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे.

काँग्रेसने राजस्थानात पंजाबचा फॉर्म्युला वापरल्याचं सांगितलं जात आहे. कॅबिनेटमध्ये पहिल्यांदाच चार अनुसूचित जातीच्या मंत्र्यांचा समावेश करण्यात येणार आहे. ममता भूपेश, भजनलाल जाटव, टीकाराम जुली आणि गोविंद मेघवाल या चार दलित नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार आहे. याशिवाय कोणत्याही अपक्ष आमदाराचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नाही.

इतर बातम्या

Farm Laws Repeal: कृषी कायदे पुन्हा आणले जातील!, सध्या मागे घेतले आहेत- राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा

कंगना रनौतच्या अडचणींमध्ये आणखी वाढ! दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीची पोलिसात तक्रार

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.