AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“देशभरातील सगळे मदरसे बंद करा”; ‘विहिंप’च्या बड्या नेत्याने केले वादग्रस्त वक्तव्य…

आजकाल लव्ह जिहाद आणि जबरदस्तीने धर्मांतराची अनेक प्रकरणे देशभरात समोर आली आहेत. देशाची राजधानी दिल्लीपासून मध्य प्रदेशपर्यंत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

देशभरातील सगळे मदरसे बंद करा; 'विहिंप'च्या बड्या नेत्याने केले वादग्रस्त वक्तव्य...
| Updated on: Jun 11, 2023 | 10:31 PM
Share

बरेली : विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची या त्यांच्या वादग्रस्त वक्त्वयामुळे नेहमीच चर्चेत असतात. रविवारी साध्वी प्राचीने लव्ह जिहादबाबत मोठे वक्तव्य केले आहे. लव्ह जिहाद विषयी त्या म्हणाल्या की, देशभरातील सर्व मदरसे बंद करावेत. त्या मदरसे असतात तेथूनच लव्ह जिहादची सुरुवात होते. त्याचबरोबर त्या असंही म्हणाल्या की, हिंदू फक्त पैसा कमावण्याचा विचार करत असतात. तर एका विशिष्ट समाजाचे लोक भारतावर राज्य करण्याचा विचार करतात, त्यामुळे त्यांचा तो हजारो वर्षांपासून अजेंडा सुरू आहे.

साध्वी प्राची बरेलीमध्ये माध्यमांशी बोलत असताना त्या म्हणाल्या की, ज्या दिवशी भारतात मदरसे बंद होतील. त्याचवेळी देशातून लव्ह जिहादही संपेल. केवळ भारतातच नाही तर इतर देशांमध्येही शांतता नांदणार असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी साध्वी प्राची यांनी अखिलेश यादव यांनाही डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. समजावादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी पुन्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न सोडून दिले पाहिजे असं साध्वी प्राची यांनी आपले मत व्यक्त केले. ते यूपीचे मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानही होणार नाहीत असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदीच बाजी मारणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. कारण त्यावेळीही देशातील जनता पंतप्रधान मोदींनाच मतदान करणार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी बोलून दाखवला आहे. त्याचबरोबर उत्तराखंडमध्ये एकही मशीद हटवण्यात आली नसल्याचेही हिंदूत्ववादी नेत्याने सांगितले.

राज्यात केवळ बेकायदेशीर थडगी आहेत तिच पाडली जात आहेत. उत्तराखंड सरकार राज्यातील बेकायदा धार्मिक बांधकामांविरोधात अतिक्रमणविरोधी मोहीम राबवत असून देवभूमीत बिगर हिंदूंची संख्या वाढत असल्याचे वादग्रस्त वक्तव्यही त्यांनी केले आहे.

उत्तराखंडमधून हिंदू स्थलांतरित होत असून त्याबाबत मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

आजकाल लव्ह जिहाद आणि जबरदस्तीने धर्मांतराची अनेक प्रकरणे देशभरात समोर आली आहेत. देशाची राजधानी दिल्लीपासून मध्य प्रदेशपर्यंत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

दिल्लीजवळील गाझियाबादमध्येही एका गेमिंग अॅपच्या माध्यमातून धर्मांतराचा प्रकार समोर आल्याचे सांगत हे प्रकार वाढीस लागले आहेत असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...