AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : त्या दोघांचं किडनॅपिंग..ठाकरे गटाची बैठक संपताच संजय राऊत यांचा खळबळजनक दावा

Sanjay Raut : ठाकरे गटाच्या फुटलेल्या सहा खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सहीचं एक पत्र दिलं. त्यात ओमराजे आणि संजय पाटील यांची सही नसल्याचं बोललं जात आहे. ते उद्धव ठाकरे गटासोबत आहेत, असा दावा केला जात होता.

Sanjay Raut : त्या दोघांचं किडनॅपिंग..ठाकरे गटाची बैठक संपताच संजय राऊत यांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut
| Updated on: Jun 18, 2026 | 1:19 PM
Share

उद्धव ठाकरे गटात फूट पडल्याचं आज स्पष्ट झालं आहे. पक्षाकडून व्हीप जारी करुन बैठक बोलवण्यात आली होती. पण सहा खासदार या बैठकीला अनुपस्थित राहिले. या सहाखासदारांपैकी दोन खासदार अजूनही आपल्यासोबत आहेत असा संजय राऊत यांना विश्वास वाटतो. खासदार ओमराजे निंबाळकर आणि संजय दीना पाटील यांच्या बाबतीत संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. “ओमराजे निंबाळकर हे पुण्यात आहेत हे मी तुम्हाला दाव्याने सांगतो. भले, ते आमच्यासोबत बैठकीला आले नसतील पण ते त्यांच्यासोबतही नाहीत” “ते कुठे आहेत, शिंदेंच्या गुंडांनी त्यांना किडनॅप केलय का?.त्यांच्या जीवाला काही धोका आहे का? हे पहावं लागेल. ते लोक काहीही करु शकतात. आमच्या माहितीनुसार ओमराजे निंबाळकर आणि संजय दीना पाटील हे दोघेही दिल्लीत नाहीत” असा दावा संजय राऊत यांनी केला.

ठाकरे गटाच्या फुटलेल्या सहा खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सहीचं एक पत्र दिलं. त्यात ओमराजे आणि संजय पाटील यांची सही नसल्याचं बोललं जात आहे. ते उद्धव ठाकरे गटासोबत आहेत, असा दावा केला जात होता. पण उद्धव ठाकरे गटाने बोलवलेल्या बैठकीला सुद्धा हे दोन खासदार गैरहजर राहिले. त्यामुळे हे खासदार ठाकरे गटातून फुटले असं मानण्यात येत आहे.

घरी जाताना भारताच सैन्य घेऊन जावं लागेल

“चार-पाच खासदार म्हणजे पक्ष नाही. त्यांना खासदार बनवणारा पक्ष आहे, ते कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरले आहेत. उतरत राहणार. त्यांना घरात राहण कठीण होईल, हे मी ऑनरेकॉर्ड बोलतोय. त्यांनी त्यांच्या मतदारसंघात जाऊन दाखवावं. त्यांना घरी जायचं असेल तर भारताच सैन्य घेऊन जावं लागेल” असा दावा संजय राऊत यांनी केला. कोर्टाने चार वर्षापूर्वी निर्णय दिला असता तर ही वेळ आली नसती. या सगळ्यात देशाचं सर्वोच्च न्यायालयही गुन्हेगार आहे. देशात लोकशाही जी हालत आहे. त्यात सर्वात पहिलं गुन्हेगार सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग आहे” असा आरोप संजय राऊत यांनी केला.

Follow Us
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले