AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मधमाशीच्या दंशाने ज्येष्ठ अंपायरचा मृत्यू, मधमाशांचा दंश इतका खतरनाक का ?

मैदानात मधमाशीच्या हल्ल्याने ज्येष्ठ क्रिकेट समालोचकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याआधी करिष्मा कपूर यांचे पती उद्योजक संजय कपूर यांचा पोलो खेळताना लंडन येथे मधमाशी चावल्यानंतर हार्टअटॅक येऊन मृत्यू झाला होता. मधमाशीचा दंश जीवघेणा का ?

मधमाशीच्या दंशाने ज्येष्ठ अंपायरचा मृत्यू, मधमाशांचा दंश इतका खतरनाक का ?
Senior umpire dies of bee sting
| Updated on: Feb 19, 2026 | 8:50 PM
Share

मधमाशांच्या जवळपासही जायला लोक घाबरत असतात. खास करुन जंगलात वगैर प्रवास करत असताना पर्यटकांना मधमाशांपासून प्रचंड धोका असतो. परंतू उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे बुधवारी KDMA क्रिक्रेट लीगचा सामना सुरु असताना ज्येष्ठ किक्रेट समालोचक माणिक गुप्ता यांच्यावर अचानक मधमाशांनी हल्ला केला. रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले आहे. त्यामुळे मधमाशांच्या हल्ल्यातील अशा प्रकारे झालेला हा मृत्यू चर्चेचा विषय बनला आहे. याआधी अभिनेत्री करिष्मा कपूर हीचा पती संजय कपूर यांचा लंडन येथे मधमाशी चावल्यानंतर मृत्यू झाला होता. काय आहे यामागे कारण वाचूयात ?

क्लीव्हलँड क्लिनिकच्या अहवालानुसार मधमाशांचा दंश केवळ वेदना देत नाही. तर मृत्यूचेही कारण बनू शकतो. याची सुरुवात जेव्हा होते तेव्हा मधमाशी शरीरावर दंश करते त्यावेळी तिचे विष त्या शरीरात सोडते. काही प्रकरणात तिचे विष शरीरात वेगाने रिएक्ट करते. एलर्जीच्या रुपात ते दिसते त्यावेळी डॉक्टरांची मदत घेणे गरजेचे असते.

मधमाशा दंश का मारतात ?

मधमाशा उन्हाळ्यात सर्वात एक्टीव्ह असतात. किंवा जेथे वर्षभर तापमान एक सारखे उष्ण असते ते मधमाशा सक्रीय असतात. जेव्हा त्यांना संकट वाटते किंवा त्यांच्या पोळ्याला कोणतीही धक्का पोहचवते तेव्हा ती संरक्षणासाठी हल्ला करते. मोठी झाडे आणि फुले तसेच पाण्याचे स्रोत जिथे जास्त तेथे मधमाशांचे वास्तव्य असते.

एकदा दंश मारल्यानंतर ती मधमाशी आपल्या इतर सहकाऱ्यांना बोलवते. तिचा पाठी असलेला करवती सारखा टोकरी काटा ती माणसाच्या शरीरात टोचते.करवती सारखे दात असल्याने हा काटा उलटा बाहेर निघत नाही, मासांत अडकून बसतो. मधमाशीचे पोटातून हा दंश येत असल्याने मधमाशीनंतर बहुतांशी वेळा मरते.

Honey Bee Sting Death

दंश बनतो मृत्यूचे कारण ?

मधमाशी चावल्यानंतर अनेक प्रकारची लक्षण दिसतात. दंशाच्या जागी जळजळ होते. तीव्र वेदना होतात. दंशामुळे आजूबाजूच्या त्वचेचा रंग बदलतो. प्रभावित जागी सूज आणि खाज येते आणि उलटी आणि जुलाब होतात.

जेव्हा एलर्जी गंभीर असते तेव्हा श्वास घेण्यात अडचण होते. ब्लड प्रेशर घसरु लागते आणि हृदयाची धडधड थांबू शकते. ज्यांना आधीच हृदयाचा आजार असेल त्यांच्यासाठी ही अवघड स्थिती होते. अशा प्रकरणात किडनी फेल होऊ शकते. शरीरातील काही अवयव काम करत नाहीत. जास्त मधमाशांनी दंश केला तर मृत्यूचा धोका आणखीन वाढतो.

मधमाशाचे विष शरीरात किती वेगाने रिएक्शन करते त्यावर जोखीम ठरते. परंतू प्रत्येकाचे शरीर त्यावर पटकन रिएक्ट होईल यावर धोका अवलंबून असतो.

आता एनसीईआरटीच्या पुस्तकात मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा समावेश
आता एनसीईआरटीच्या पुस्तकात मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा समावेश.
नवी दिल्लीत इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 चे उद्घाटन
नवी दिल्लीत इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 चे उद्घाटन.
नाशिकमध्ये शेअर मार्केटच्या आमिषाने 2.16 कोटींची फसवणूक
नाशिकमध्ये शेअर मार्केटच्या आमिषाने 2.16 कोटींची फसवणूक.
ड्रग्ज प्रकरणाला इम्तियाज जलीलांचा सपोर्ट? संजय शिरसाटांचे गंभीर आरोप
ड्रग्ज प्रकरणाला इम्तियाज जलीलांचा सपोर्ट? संजय शिरसाटांचे गंभीर आरोप.
मुंबई पालिकेच्या महापौरपदावरुन महायुतीत एकमत? अपडेट आली समोर
मुंबई पालिकेच्या महापौरपदावरुन महायुतीत एकमत? अपडेट आली समोर.
शिंदे- ठाकरे भेटीवर राजकीय वाद; राऊत आणि बन यांच्यात टीका-प्रत्युत्तर
शिंदे- ठाकरे भेटीवर राजकीय वाद; राऊत आणि बन यांच्यात टीका-प्रत्युत्तर.
अजित दादांच्या अपघातावर मुलाची शंका, थेट पोस्ट करत केला सवाल
अजित दादांच्या अपघातावर मुलाची शंका, थेट पोस्ट करत केला सवाल.
धाराशिवमध्ये तानाजी सावंत-एकनाथ शिंदेंच्या भेटीत नेमकं काय घडलं?
धाराशिवमध्ये तानाजी सावंत-एकनाथ शिंदेंच्या भेटीत नेमकं काय घडलं?.
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेली मुंबई आम्हाला घडवायची आहे
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेली मुंबई आम्हाला घडवायची आहे.
आठवड्याभरानंतर तेजस ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज
आठवड्याभरानंतर तेजस ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज.