AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंडित नेहरू आरक्षणाच्या विरोधात होते, शशी थरूर यांचं खळबळजनक विधान!

काँग्रेसचे नेते तथा प्रसिद्ध लेखक शशी थरूर यांचे Our Living Constitution या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी शशी थरूर यांनी आरक्षणाविषयी महत्त्वाचे विधान केले.

पंडित नेहरू आरक्षणाच्या विरोधात होते, शशी थरूर यांचं खळबळजनक विधान!
pandit nehru and shashi tharoor
| Updated on: Aug 02, 2025 | 6:33 PM
Share

Shashi Tharoor : काँग्रेसचे नेते तथा प्रसिद्ध लेखक शशी थरूर यांचे Our Living Constitution या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने शशी थरूर आणि माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्यात संवाद झाला. दरम्यान, याच कार्यक्रमावेळी थरूर यांनी मोठं विधान केलं आहे. आरक्षणावर बोलताना भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे आरक्षणाच्या विरोधात होते, असे विधान केले आहे.

पंडित नेहरू हे आरक्षणाच्या विरोधात होते

यावेळी बोलताना तरुणी पिढी आणि माध्यमांवर भाष्य केले. सरकारने माध्यमांत हस्तक्षेप करू नये. सरकारकडे राजकीय अजेंडा असतो, असे मत थरूर यांनी व्यक्त केले. पुढे बोलताना त्यांनी भारतातील आरक्षण व्यवस्था आणि पंडित नेहरू यांचा दृष्टकोन यावरही भाष्य केले. पंडित नेहरू हे आरक्षणाच्या विरोधात होते. पण त्यांनी UCC अर्थात समान नागरी कायदा आवश्यक आहे, असे सांगितेल होते, असे मत व्यक्त केले.

‘लिव्ह-इन’ बाबतचे कलम मला मान्य नाही

समान नागरी कायद्यावर बोलताना त्यांनी उत्तराखंडच्या UCC कायद्यातील काही कलमे हास्यास्पद आहेत. ‘लिव्ह-इन’ बाबतचे कलम मला मान्य नाही, असेही थरूर यांनी स्पष्टपणे सांगितले. बहुतेक देशांकडे समान नागरी कायदे आहेत, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

आजही हजारो खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. यावर बोलताना कोर्टांमध्ये प्रकरणांचा ढीग वाढतोय, ही परिस्थिती अविश्वसनीय आहे. एआय वापरून काही मार्ग काढता येईल का? ते पाहता येईल, असे मत थरूर यांनी व्यक्त केले.

समान नागरी कायदा लागू करताना…

याच कार्यक्रमात माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनीही वेगवेगळ्या विषयांवर आपले मत व्यक्त केले. संविधान हे समान नागरी संहितेची भावना व्यक्त करते. माझा अस म्हणणं आहे की किमान 75 वर्षांच्या संविधानानंतर संविधानाची महत्त्वाकांक्षा आणि ध्येय साध्य करणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे, असे मत चंद्रचूड यांनी व्यक्त केले. परंतु समान नागरी कायदा लागू करताना आपण आपल्या समाजाला विश्वासात घेतले पाहिजेय हे खरोखरच राष्ट्र म्हणून समाजाच्या भविष्याच्या हिताचे आहे, असे सांगितले पाहिजे हेही चंद्रचूड यांनी आवर्जून सांगितले.

Follow Us
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?.
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला.
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?.
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण.
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल.
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा....
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा.....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या.....
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला.
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून ठिकठिकाणी ध्वजारोहण करत....
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून ठिकठिकाणी ध्वजारोहण करत.....