AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDIA आघाडीचं नाव होऊ शकतं BHARAT! शशि थरुर यांनी फुलफॉर्मसह सुचवलं असं काही..

INDIA vs BHARAT : देशाचं नाव इंडिया असावं की भारत यावरून सध्या जोरदार वाद सुरु आहे. भाजपाने भारत या नावाचं नावाचं समर्थन केलं आहे. तर काँग्रेसने इंडिया आघाडी असं नाव घेतल्यानेच पायाखालची जमिन सरकरल्याचा आरोप केला आहे.

INDIA आघाडीचं नाव होऊ शकतं BHARAT! शशि थरुर यांनी फुलफॉर्मसह सुचवलं असं काही..
INDIA vs BHARAT वादात शशि थरुर यांची उडी, आघाडीला नाव बदलण्याची सूचना देत सांगितलं असं...
| Updated on: Sep 06, 2023 | 10:13 PM
Share

मुंबई : भारत विरुद्ध इंडिया हा वाद सध्या सुरु आहे. देशाचं नाव नेमकं काय असायला हवं याचा वाद आता सोशल मीडियावर सुरु आहे. आगामी जी20 शिखर संमेलनासाठी राजभवनात डीनरच आयोजन करण्यात आलं आहे. या निमंत्रण पत्रिकेवर प्रेसिडेंट ऑफ इंडिया या ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असं लिहिलं आहे. त्यामुळे या वादाला आणखी फोडणी मिळाली आहे. आात या वादात काँग्रेस खासदार शशि थरूर यांनी उडी घेतली आहे. इतकंच काय तर भाजपा विरोधी आघाडीचं नाव भारत होऊ शकतं असंही सांगितलं आहे. शशि थरुर यांनी भारत या नावाचा फुलफॉर्मही सांगितला आहे. असं केल्यास सत्ताधारी पक्ष नाव बदलण्याच्या भानगडीतच पडणार नाही. काँग्रेस खासदार शशि थरूर यांनी एक्सवर लिहीत याबाबतची माहिती दिली आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने याबाबत नेमकं काय सांगितलं आहे याचा उल्लेखही केला आहे.

काय म्हणाले शशि थरूर?

शशि थरूर यांनी ट्विटरवर लिहित सांगितलं आहे की, “आम्ही स्वत:ला अलायन्स फॉर बेटरमेंट हारमनी अँड रिस्पॉन्सिबल एडव्हान्समेंट फॉर टूमॉरो (BHARAT) बोलू शकतो. यामुळे सत्तारुढ पार्टी नाव बदलण्याचा खेळ बंद करेल”. सध्या असलेल्या इंडिया (I.N.D.I.A.) या आघाडीचा फुलफॉर्म इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इंक्लूसिव अलायन्स असा ठेवलेलं आहे.

शशि थरुर यांनी बुधावरी एक न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून 2015 च्या एका घटनेचा उल्लेख केला आहे. यात जनहित याचिकेच्या माध्यमातून देशाचं नाव इंडिया ऐवजी भारत असावं अशी मागणी करण्यात आली होती. यावर केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितलं होतं की, भारतीय संविधान आर्टिकल 1.1 मध्ये बदल करत देशाची नाव बदलण्याची गरज नाही. संविधानच्या आर्टिकल 1.1 मध्ये अधिकृतपणे नावासाठी इंडिया आणि भारत यांची उल्लेख केला आहे.

दुसरीकडे 2015 मध्ये योगी आदित्यनाथ यांनी लोकसभेत एक प्रायव्हेट बिल सादर केलं होतं. यात इंडिया दॅट इज भारत ऐवजी इंडिया दॅट इज हिंदुस्तान असं करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्याचबरोबर, 2010 आणि 2012 मध्ये काँग्रेस खासदा शांताराम नाईक यांनी राज्यसभेत एक खासगी बिल सादर केलं होतं. यात संविधानातून इंडिया हा शब्द हटवण्याची मागणी केली होती.

Follow Us
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल