AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका कुलपाने घेतला 21 जणांचा जीव, दिसेल त्या दिशेने पळत सुटले, दिल्लीच्या भयानक आगीत विदेशी पर्यटकांचाही मृत्यू

दिल्लीतील एका हॉटेलला मोठी आग लागली. या आगीनंतर मोठी खळबळ उडाली. आता नुकताच अत्यंत धक्कादायक माहिती पुढे येत आहे. या आगीत 21 लोकांचा जीव गेला. 40 जणांवर उपचार सुरू आहेत.

एका कुलपाने घेतला 21 जणांचा जीव, दिसेल त्या दिशेने पळत सुटले, दिल्लीच्या भयानक आगीत विदेशी पर्यटकांचाही मृत्यू
Delhi Hotel Fire
| Updated on: Jun 03, 2026 | 1:46 PM
Share

दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये आज बुधवारी सकाळी आगीची मोठी घटना घडली. या अग्नीकांडात तब्बल 40 जण अडकली. यापैकी 21 जण जिवंत गळून मेली. या घटनेत 21 जणांचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे यात काही विदेशी नागरिकांचाही समावेश आहे. अनेक जण जखमी असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही आग अगोदर रेस्टारंटला लागली आणि त्यानंतर हॉटेलच्या रूमपर्यंत पोहोचली. काही मिनिटातच आगीने राैद्ररूप धारण केले. लोकांनी आपला जीव वाचवण्याकरिता थेट दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यावरून खाली उड्या घेतल्या. या हॉटेलमध्ये थांबलेले जवळपास लोक मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या आपल्या नातेवाईकांकरिता या हॉटेलमध्ये थांबले होते. ज्यात विदेशी नागरिकांची संख्या अधिक आहे. या हॉटेलमध्ये 25 पेक्षा जास्त रूम होत्या. मात्र, या इमारतीमधून बाहेर पडण्याकरिता एकच रस्ता आहे.

काही लोक बेसमेंटमध्ये होती. धक्कादायक म्हणजे लोक आगीत आतमध्ये जळत होते पण बेसमेंटला बाहेरून कुलूप लावण्यात आले होते. डीसीपी अनंत मित्तल यांनी या आगीच्या घटनेबद्दल बोलताना म्हटले की, सूचना मिळाल्यानंतर तात्काल फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. 8 गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आतमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवले जात आहे.

इमारतीमधून आतापर्यंत 40 लोकांना बाहेर काढून रूग्णालयात दाखल करण्यात आले. 21 लोकांचा मृत्यू झाला असून बचावकार्य सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिवंत जळालेल्या व्यक्तींमध्ये काही विदेशी नागरिकांचा समावेश आहे. जखमींमध्येही काही विदेशी नागरिक आहेत. यापैकी जास्त करून नातेवाईकांचे उपचार मॅक्समध्ये सुरू असल्याचे ते इथे थांबले होते.

आग लागल्यानंतर स्थानिक लोकांनी लगेचच घटनास्थळी धाव घेत मदत सुरू केली. ही इतकी मोठी आग नक्की कशी लागली, याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाहीये. मात्र, आगीचा मोठा भडका उडाला. मृतांच्या आकड्यात वाढ होण्याचाही अंदाज आहे. काही जण या आगीत गंभीर जखमी झालेत. अजूनही बचावकार्य सुरूच असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, या आगीच्या घटनेने लोकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात