AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशाच्या संरक्षणात योगदान देणाऱ्या जवानांचा शौर्य पुरस्काराने सन्मान, जाणून घ्या विविध श्रेणींमध्ये का दिले जातात शौर्य सन्मान

देशाच्या संरक्षणासाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या सैनिकांची नावे शौर्य पुरस्कारासाठी निश्चित केली जातात. वीरांची नावे संरक्षण मंत्रालयाकडे पाठवली जातात. मंत्रालयात येणाऱ्या सर्व नावांचा केंद्रीय सन्मान आणि पुरस्कार समितीकडून विचार केला जातो.

देशाच्या संरक्षणात योगदान देणाऱ्या जवानांचा शौर्य पुरस्काराने सन्मान, जाणून घ्या विविध श्रेणींमध्ये का दिले जातात शौर्य सन्मान
देशाच्या संरक्षणात योगदान देणाऱ्या जवानांचा शौर्य पुरस्काराने सन्मान
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Nov 22, 2021 | 3:19 PM
Share

नवी दिल्ली : देशाच्या संरक्षणात योगदान देणाऱ्या जवानांना सोमवारी राष्ट्रपती भवनात शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासाठी 2019 मध्ये हवाई युद्धात पाकिस्तानचे F-16 लढाऊ विमान पाडणारे ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांना राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते वीरचक्र देऊन सन्मानित करण्यात आले. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्याचा खात्मा करणारे शहीद नायब सुभेदार सोमबीर यांना मरणोत्तर शौर्य चक्र प्रदान करण्यात आले. तसेच, कॉर्प्स ऑफ इंजिनिअर्सचे सॅपर शहीद प्रकाश जाधव यांना राष्ट्रपतींनी मरणोत्तर कीर्ती चक्र, शांतताकालीन दुसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार प्रदान केला.

शौर्य पुरस्कार कधी सुरू झाला?

26 जानेवारी 1950 रोजी शौर्य पुरस्कारांची स्थापना करण्यात आली. तथापि, ते 15 ऑगस्ट 1947 पासून प्रभावी मानले गेले. त्यानंतर परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीर चक्र असे तीन शौर्य पुरस्कार जाहीर झाले. यानंतर, भारत सरकारने 4 जानेवारी 1952 रोजी इतर तीन शौर्य पुरस्कार सुरू केले. त्यांची नावे आहेत – अशोक चक्र श्रेणी-I, अशोक चक्र श्रेणी-II आणि अशोक चक्र श्रेणी-III. 1967 मध्ये त्यांचे नाव अशोक चक्र, कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र अशी ठेवण्यात आले.

कोणता शौर्य पुरस्कार कधी दिला जातो?

परमवीर चक्र : हे देशातील सर्वोच्च लष्करी अलंकरण सन्मान आहे. युद्धातील शौर्य आणि बलिदानासाठी हा सन्मान दिला जातो. हा मरणोत्तर दिला जातो. या सन्मानाची ओळख करून देण्याआधी, जेव्हा भारतीय लष्कर ब्रिटीश सैन्याखाली काम करत होते, तेव्हा लष्कराचा सर्वोच्च सन्मान ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ होता. मेजर सोमनाथ शर्मा यांना पहिले परमवीर चक्र प्रदान करण्यात आले. देशात आतापर्यंत 21 सैनिकांना परमवीर चक्र मिळाले आहे.

महावीर चक्र : हे युद्धातील सैनिकाच्या शौर्याचे पदक आहे. हा सन्मान असाधारण शौर्य आणि बलिदानासाठी दिला जातो. ते मरणोत्तरही दिले जाऊ शकते. हे प्राधान्य क्रमाने परमवीर चक्रानंतर येते. आता देशातील 212 जवानांना महावीर चक्राने सन्मानित करण्यात आले आहे.

वीर चक्र : युद्धादरम्यान अदम्य साहस आणि पराक्रम दाखवणाऱ्या सैनिकांची वीर चक्रासाठी निवड केली जाते. हा देशातील तिसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे. शौर्य चक्र मरणोत्तरही दिले जाऊ शकते. देशात आतापर्यंत 1324 जणांना हा सन्मान मिळाला आहे.

अशोक चक्र : हा शांततेच्या काळात दिला जाणारा शौर्य पुरस्कार आहे. हे युद्धात अतुलनीय शौर्य, साहस आणि बलिदानासाठी दिले जाते. या सन्मानाला युद्धादरम्यानच्या परमवीर चक्राप्रमाणेच महत्त्व आहे. देशात आतापर्यंत 97 सैनिकांना अशोक चक्र देण्यात आले आहे.

कीर्ती चक्र : हे देखील शांततेच्या काळात दिले जाणारे शौर्य पदक आहे. असाधारण शौर्य आणि बलिदानासाठी हा सन्मान सैनिक आणि गैर-सैनिकांना दिला जातो. देशात आतापर्यंत 483 जवानांना कीर्ती चक्राने सन्मानित करण्यात आले आहे.

पुरस्काराचे नाव कसे ठरवले जाते

देशाच्या संरक्षणासाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या सैनिकांची नावे शौर्य पुरस्कारासाठी निश्चित केली जातात. वीरांची नावे संरक्षण मंत्रालयाकडे पाठवली जातात. मंत्रालयात येणाऱ्या सर्व नावांचा केंद्रीय सन्मान आणि पुरस्कार समितीकडून विचार केला जातो. संपूर्ण प्रक्रियेनंतर ही समिती शौर्य पुरस्कारासाठी निवडलेल्या नावांची यादी तयार करते. ही यादी राष्ट्रपतींकडे पाठवली जाते. राष्ट्रपतींच्या परवानगीनंतरच हे पुरस्कार जाहीर केले जातात. (Soldiers honored for their bravery in the defense of the country, know why gallantry honors are given in different categories)

इतर बातम्या

एकाच घरात अनेक वर्षे राहिल्यानंतर भाडेकरू मालमत्ता ताब्यात घेऊ शकतो का? जाणून घ्या कायदा काय म्हणतो ते

भोपाळ आणि इंदूरमध्ये लागू होणारी पोलीस कमिशनर सिस्टीम नेमकी काय आहे? जाणून घ्या यामुळे काय बदल होणार?

Follow Us
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..
Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर-बापट यांच्यात खडाजंगी
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर- विद्यानंद बापट यांच्यात खडाजंगी,  व्हिडीओ बघाच