या आंब्याचा रुबाबच न्यारा,आगाऊ बुकींग करावी लागते, ९ झाडांच्या सुरक्षेसाठी खास ९ गार्ड्स तैनात
फळांचा राजा म्हटला जाणारा आंबा हा सर्वांचा आवडता असतो. महाराष्ट्रात हापूस आंब्याला जसा मान आहे तसाच उत्तर भारतातील या आंब्याला आखाती देशात मागणी प्रचंड आहे.एका फळाची किंमत पाहून तुम्हाला मोठे आश्चर्य वाटेल...

मध्य प्रदेशातील आलीराजपूर जिल्ह्यात एक असा आंबा पिकतो ज्याची सुरक्षा करण्यासाठी खास गार्ड तैनात करण्यात आले आहेत. ९ झाडांच्या सुरक्षेसाठी १० ते ११ सुरक्षा रक्षक तैनात केलेले आहे. याचे कारण या आंब्याची किंमत, विशाल आकार, दुर्मिळता आणि खास स्वाद आहे. कारण देशातच नाही तर विदेशात या आंब्याची चर्चा सुरु असते. याची किंमत १५०० ते ३००० रुपये प्रति फळापर्यंत पोहचते. आणि या खास आंब्यासाठी अगोदरच एडव्हान्स बुकींग करावी लागते. या आंब्याचे नाव आहे ‘नूरजहां’ !
मध्य प्रदेशातील आदिवासी बहुल आलीराजपूर जिल्ह्यातील जूना कट्टीवाडा गावातील शिव आम फार्म मध्ये नूरजहां या आंब्याची खास पैदास केली जाते.
फार्मचे संचालक किसान भरतराजसिंह जादव सांगतात की नूरजहां या आंब्याचे मूळ अफगाणातील आहे. ६० च्या दशकात त्यांचे दिवंगत पिता रणवीरसिंह जादव यांनी गुजरातच्या बनमाह क्षेत्रातून या आंब्याची रोपे आणली होती. आज भरतराजसिंह यांच्या नूरजहा या आंब्याची नऊ मोठी झाडे आहेत. यांचे आयुष्य २० ते २५ वर्षे आहे.त्यांनी ग्राफींग तंत्राने ११ नवीन रोपे देखील तयार केली आहेत.
आजुबाजुच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या आंब्याची शेती करण्याचा प्रयत्न केला परंतू त्यांच्या फार्म सारखे मोठे आणि वजनदार फळ मिळाले नाही. त्याचमुळे हा आंबा आलीराजपूरची खास ओळख बनला आहे.
२ ते ५ किलोचा असतो एक आंबा
नूरजहां आंब्यांना जगातील सर्वात मोठा आंबा म्हणून ओळखले जाते. सामान्यपणे एका फळाचे वजन २ ते ५ किलोग्रॅमपर्यंत जाते. याचा आकार इतका विशाल असतो की एक आंबा संपूर्ण कुटुंबाला पुरतो.
याचा आकर्षक रंग, सुंगध खूपच खास आणि चव एक मधूर असते. याच कारणाने पहिल्या नजरेतच या आंबा लोकांना आकर्षित करतो.मोठ्या शहरांसह परदेशात या आंब्यांना मागणी वाढत चालली आहे.
९ झाडांसाठी ९ गार्ड
नूरजहा आंब्याची सर्वात खास बाब म्हणजे याची दुर्लभता आहे. झाडांवर मर्यादितच फळ लागते. यासाठी प्रत्येक फळ महत्वाचे आणि किमती असते. चोरी आणि नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी फार्म हाऊसवर खास गार्ड तैनात करतात. या फार्म हाऊसवर देखील नऊ झाडांसाठी नऊ गार्ड्स तैनात केले आहेत. एवढी सुरक्षा एखाद्या फॅक्ट्री किंवा बंगला किंवा उद्योग धंद्यांना दिली जाते. मात्र, येथे आंब्यांच्या झाडाला व्हीव्हीआयपी सुरक्षा देण्यात आली आहे.
