AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परीक्षा केंद्रात 500 मुलींना पाहून घाम फुटला, चक्कर आली, आणि मग…

मनिष परीक्षा केंद्रावर मुलींमध्ये एकटाच होता. त्यामुळे तो घाबरून गेला. घामाघूम होऊन त्याला भोवळ आली आणि तो चक्कर येऊन पडला. तो बेशुद्ध झाला. त्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

परीक्षा केंद्रात 500 मुलींना पाहून घाम फुटला, चक्कर आली, आणि मग...
students Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 02, 2023 | 2:30 PM
Share

पाटणा: इंटर परीक्षेच्या दरम्यान बिहारच्या नालंदामध्ये एक विचित्र घटना घडली आहे. या परीक्षा केंद्रावर 50-60 नव्हे तर तब्बल 500 मुली परीक्षा देण्यासाठी आल्या होत्या. या 500 मुलींमध्ये एकच मुलगा परीक्षा देत होता. एवढ्या साऱ्या मुलींमध्ये आपण एकटेच असल्याचं पाहून या विद्यार्थ्याला चक्करच आली आणि तो जागेवर पडला. त्यामुळे त्याला घाईगडबडीत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शुद्ध आली तेव्हा आपण रुग्णालयात असल्याचं त्याला दिसून आलं. बिहारशरीफ येथील ही परीक्षा केंद्रावरील ही घटना आहे.

बिहारशरीफच्या अल्लामा इक्बाल कॉलेजातील विद्यार्थी मनिष शंकर याच्या बाबतीत हा प्रकार घडला. मनिष शंकर याला इंटर परीक्षेसाठी ब्रिलियन्ट हायस्कूल परीक्षा केंद्र म्हणून आलं होतं. त्यामुळे मनिष परीक्षेसाठी सकाळीच परीक्षा केंद्रावर गेला. पण तिथे गेल्यावर वर्गात सर्वत्र मुलीच मुली असल्याचं त्याने पाहिलं.

परीक्षा केंद्रावर एकूण 500 मुली होत्या. या 500 मुलीमध्ये आपण एकटेच असल्याचं लक्षात आल्याने त्याचे हातपाय थरथरू लागले. त्याला अस्वस्थ वाटायला लागलं अन् तो चक्कर येऊन पडला. त्यामुळे सर्वच घाबरले. शाळेच्या स्टाफने आधी त्याच्या तोंडावर पाणी मारून त्याला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला.

पण नंतर त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. यावेळी त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्याच्या प्रकृतीचीही माहिती देण्यात आली. त्यामुळे त्याचे नातेवाईकही तातडीने रुग्णालयात आले.

अन् अचानक घाम फुटला

मनिष परीक्षा केंद्रावर मुलींमध्ये एकटाच होता. त्यामुळे तो घाबरून गेला. घामाघूम होऊन त्याला भोवळ आली आणि तो चक्कर येऊन पडला. तो बेशुद्ध झाला. त्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, असं मनिषची काकी पुष्प लता सिंह यांनी सांगितलं.

परीक्षा केंद्राचा दरवाजा बंद

बिहारमध्ये बुधवारपासून इंटर मिडीएटची परीक्षा सुरू झाली आहे. नालंदा परीक्षा केंद्रावरील दरवाजा बंद असल्यामुळे मुलींनी जीव धोक्यात घालून परीक्षा केंद्रात प्रवेश केला. विशेष म्हणजे मुख्यमंत्री नितीश कुमार हे याच जिल्ह्यातून येतात.

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.