AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल यांच्यांवर मोठी जबाबदारी, अजित पवार यांच्यांसाठी काय शरद पवारांच्या मनात काय

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीतून मोठी घोषणा केली. पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे या दोन नेत्यांची नियुक्ती केली. परंतु अजित पवार यांच्यांकडे काहीच जबाबदारी दिली नाही.

सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल यांच्यांवर मोठी जबाबदारी, अजित पवार यांच्यांसाठी काय शरद पवारांच्या मनात काय
| Updated on: Jun 10, 2023 | 2:00 PM
Share

संदीप राजगोळकर, नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मागील महिन्यात पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, त्यावेळी कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर तीन दिवसांनी त्यांनी राजीनामा मागे घेतला. त्यावेळी शरद पवार यांच्यासोबत कार्यकारी अध्यक्षपद निर्माण करण्यासंदर्भात चर्चा झाली. परंतु त्याला मंजुरी मिळाली नव्हती. अखेर शरद पवार यांनी पक्षाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठ्या फेरबदलांची घोषणा केली आहे. म्हणजेच शरद पवार यांनी दिल्लीत बसून भाकरी फिरवली आहे. यावेळी प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे यांच्यांवर मोठी जबाबदारी दिली आहे. परंतु अजित पवार यांना कोणतीही जबाबदारी दिली नाही.

अजित पवार यांनी केले होते समर्थन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी २ मे रोजी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून अजित पवार वगळता इतर सर्वांकडून मोठा दबाब आला. अजित पवार शरद पवार यांच्या राजीनाम्याचे समर्थन करत होते. त्यानंतर राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या अन् नेत्यांच्या आग्रहामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ५ मे रोजी त्यांचा पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर केला. त्यानंतर शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेतला. त्यावेळी अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडे आणि कार्यकारी अध्यक्षपद निर्माण करण्यासंदर्भातही चर्चा झाली. परंतु त्यालाही मंजुरी मिळाली नव्हती.

अजित पवार यांचे स्थान काय असणार

आता दिल्लीतून शरद पवार यांनी पक्षातील बदलांची घोषणा केली. शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे या दोन नेत्यांची नियुक्ती केली आहे. अजित पवार यांच्याकडे कोणतीच जबाबदारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीत अजित पवार साईड ट्रॅकवर गेले काय? अशी चर्चा सुरु झाली आहे.

कारण सुप्रिया सुळे यांच्यांवर महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे. परंतु अजित पवार यांच्यांकडे काहीच जबाबदारी दिली नाही. शरद पवार यांनी घोषणा केली तेव्हा अजित पवार कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. परंतु अजित पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ते कार्यक्रमस्थळावरुन निघून गेले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांची काय भूमिका राहणार? शरद पवार यांच्या मनात अजित पवार यांच्यांसंदर्भात काय आहे? या प्रश्नांची चर्चा सुरु झाली आहे.

हे ही वाचा

शरद पवार यांचा राजीनामा मागे घेण्याची घोषणा, पण अजितदादा अनुपस्थित, आहेत कुठे?

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.