AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : पूरस्थितीवर नियंत्रणासाठी यंत्रणा अलर्ट, जीवीतहानी टाळण्यावर भर, मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्याचा आढावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी गडचिरोली जिल्ह्यातील काही ठिकाणच्या अतिवृष्टीची पाहणी केली आहे. पावसाने घरांची पडझड तर झालीच आहे पण पिकांचेही न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. उघडीप देताच नुकसानीचा आढावा घेतला जाणार आहे. पाहणीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली.

Eknath Shinde : पूरस्थितीवर नियंत्रणासाठी यंत्रणा अलर्ट, जीवीतहानी टाळण्यावर भर, मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्याचा आढावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेेद्र फडणवीस यांनी गडचिरोली येथील पूरस्थितीचा आढावा घेतला.Image Credit source: twitter
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Jul 12, 2022 | 4:52 PM
Share

मुंबई : राज्यात पावसाचा हाहाकार सुरु आहे. विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये (flood situation) पूरस्थिती निर्माण झाली आहे. जुलैच्या 1 तारखेपासून राज्यात सुरु असलेला पाऊस अजूनही कायम आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा अलर्ट असून कुठेही दुर्घटना होणार नाही त्या अनुशंगाने सूचना दिल्याचे (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. विशेषत: जीवीतहानी टाळण्यावर सरकारचा भर राहणार आहे. राज्यात सर्वत्रच (Heavy Rain) पावसाने थैमान घातले आहे. कमी कालावधीत अधिकचा पाऊस आणि त्यामध्ये सातत्य राहिल्याने नुकसानीची तीव्रता आहे. पण राज्यभरातील आढावा घेऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचनाही दिल्या असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

यंत्रणा अलर्टवर, नुकसान तिथे मदत

राज्यात सर्वत्रच पावसाने हाहाकार घातलेला आहे. विशेषत: कोल्हापूर, नाशिक, गडचिरोली, मुंबई, नांदेड, औरंगाबाद या जिलह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. त्यामुळे पिकांचे तर नुकसान होतच आहे पण जीवीतहानी होऊ नये म्हणून प्रशासनाला योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. झालेले नुकसान भरुन काढता येईल पण जीवीतहानी झाल्यावर सर्व कुटुंबाचे नुकसान होते. त्यामुळे सर्वप्रथम जीवीतहानी कशी टाळता येईल यावर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

गडचिरोलीत काही कमी पडणार नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी गडचिरोली जिल्ह्यातील काही ठिकाणच्या अतिवृष्टीची पाहणी केली आहे. पावसाने घरांची पडझड तर झालीच आहे पण पिकांचेही न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. उघडीप देताच नुकसानीचा आढावा घेतला जाणार आहे. पाहणीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली. यावेळी उर्वरित जिल्ह्यात काय स्थिती आहे याचा आढावा घेऊन नुकसानभरपाईसाठी आपण कमी पडणार नाही, केवळ जीवीतहानी टाळता येईल असे प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

तीन दिवस पावसाचेच

राज्यात आगामी तीन दिवसांमध्ये देखील मुसळधार ते अति मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागान वर्तवला आहे. एवढेच नाहीतर सर्व राज्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आतापर्यंत मराठवाडा आणि विदर्भात पावसाचे प्रमाण कमी होते. याभागातही पाऊस बरसणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे तर पश्चिम किनारपट्टीवरील द्रोणिय स्थितीचा परिणाम राज्यातील मान्सूनवर होणार आहे. त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.

Follow Us
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस राहणार बंद
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस बंद
मोठी बातमी! एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य
एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य: गांजा सेवनानंतर कठोर निर्णय
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ: परिवहन विभागाचा निर्णय
आजच्या महाराष्ट्र बातम्या: शिवसेना सुनावणी, राजकीय घडामोडी
महाराष्ट्रातील ताज्या बातम्या: राजकीय घडामोडी, हवामान अंदाज आणि महत्त्वाचे निर्णय
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?