Thalapathy Vijay : थलापती विजय यांचं सरकार संकटात; 2 महिन्यातच समोर सर्वात मोठी अडचण; तामिळनाडूमध्ये काय घडतंय?

सरकार स्थापनेपासूनच थलापती विजय यांच्यापुढे संकटाचे नवनवे डोंगर उभे राहात आहेत. सध्या तर तामिळनाडूत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेला विरोधकांनी लावून धरले आहे.

Thalapathy Vijay : थलापती विजय यांचं सरकार संकटात; 2 महिन्यातच समोर सर्वात मोठी अडचण; तामिळनाडूमध्ये काय घडतंय?
thalapathy vijay
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 16, 2026 | 3:32 PM

Thalapathy Vijay : तामिळनाडूचं राजकारण सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरले आहे. मे महिन्यात पर पडलेल्या विधानसभा निवडणुकीत येथे दिग्गज अभिनेता थलापती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने दमदार विजय मळवला. त्यानंतर थलापती विजय हे थेट तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले. परंतु सरकार स्थापनेपासूनच थलापती विजय यांच्यापुढे संकटाचे नवनवे डोंगर उभे राहात आहेत. सध्या तर तामिळनाडूत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेला विरोधकांनी लावून धरले आहे. विरोधकांकडून मुख्यमंत्री थलापती विजय यांना अडकित्त्यात पडकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात आहे.

तामिळनाडूत नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार तामिळनाडूमध्ये तेथे एका दिव्यांग कैद्याचा तुरुंगात असताना मृत्यू झाला आहे. ही घटना तामिळनाडूच्या नागरकोईल येथे घडली आहे. मृत्यू झालेल्या कैद्याचे नाव एस सबरी वर्मन असे आहे. सुरूवातीला या कैद्याचा मृत्यू नैसर्गिक पद्धतीने झाला असावा, असे म्हटले जात होते. परंतु उत्तरीय चाचणीनंतर या कैद्याच्या शरीरावर वेगवेगळ्या 19 ठिकाणी जखमा असल्याचे समोर आले. त्यानंतर तामिळनाडूमध्ये राजकारण पेटले आहे. वर्मन या व्यक्तीला अवैध गुटखा विक्रीच्या आरोपाखाली 9 जुलै रोजी थेंथमराईकुलम येथून अटक करण्यात आले होते.

8 कैद्यांविरोधात गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार 13 जुलै रोजी तुरुंगात असताना रात्री वर्मन आणि इतर कैद्यांमध्ये भांडण झाले. इतर कैद्यांनी वर्मन यांना खूप मारले. हे भांडण सोडवण्यासाठी तुरुंगातील अधिकारी आले. या अधिकाऱ्यांनीही वर्मन यांना खूप मारल्याचा आरोप केला जातोय. या घटनेनंतर सीसीटीव्ही तपासण्यात आले. उपलब्ध प्रथमदर्शनी पुराव्यानुसार तीन तुरुंग कर्मचाऱ्यांना निलंबित करून अटक करण्यात आले आहे. 8 कैद्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कायदा आणि सुव्यवस्था रसातळाला गेली

दरम्यान, विरोधकांनी हाच मुद्दा लावून धरला आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था रसातळाला गेली आहे, असा आरोप केला जातोय. विजय यांचे सरकार फक्त तमाशा पाहात आहे, असा हल्लाबोल डीएमके पक्षाकडून केला जातोय.

Follow Us