AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टाटांची जुनी ‘प्रेयसी’, जिच्याकडे कंपनी पुन्हा एकदा आकर्षित

एअर इंडिया तोट्यात असून सरकारला तिचा खर्च झेपत नाही. त्यामुळे सरकारने ही विमान कंपनी विकण्यास काढली आहे.

टाटांची जुनी 'प्रेयसी', जिच्याकडे कंपनी पुन्हा एकदा आकर्षित
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Dec 14, 2020 | 3:19 PM
Share

मुंबई : टाटांच्या जुन्या ‘प्रेयसी’कडे कंपनी पुन्हा एकदा आकर्षित झाली आहे. आता टाटांची जुनी प्रेमिका कोण? हा प्रश्न कोणाच्याही मनात येईल, तर ही प्रेमिका आहे एअर इंडिया… तीच एअरलाईन्स जी टाटाने देशाला समर्पित केली. मात्र त्याच एअरलाईन्सची आर्थिक परिस्थिती सध्या कमकुवत आहे. त्यामुळेच टाटाने ही एअरलाईन्स पुन्हा खरेदी करण्याचा विचार सुरु केला आहे. (Tata sons to buy JRD Tata’s old love Air India)

गोष्ट आहे 1932 ची… स्वातंत्र्याच्याही आधीची… जेआरडी टाटांनी भारताच्या विमान वाहतुकीच्या इतिहासातील पहिलं विमान उडवलं… बरोबर, खुद्द जेआरडी टाटाच या विमानाचे पायलट होते. Puss Moth नावाच्या या विमानात बसून टाटांनी थेट कराचीहून हवेत झेप घेतली आणि हे विमान उतरलं आपल्या मुंबईत जुहूजवळ.

टाटांच्या या विमानाच्या उड्डाणानंतर कमर्शिअल विमान वाहतुकीची सुरुवात झाली. त्यानंतर टाटांनी कधीही मागे पाहिलं नाही. टाटा एअरलाईन्स सुरु झाली आणि त्याचे पहिले पायलट होते होमी भरुचा टाटा. तर जेआरडी टाटा दुसरे पायलट.

जुहूजवळच्या एका मातीच्या रनवेवरुन विमान उड्डाण भरु लागलं. मात्र पावसाळ्यात हा रनवे ओला व्हायचा. त्यामुळे विमानांचं उड्डाण शक्य व्हायचं नाही. या अडचणीतही टाटांनी हार मानली नाही. त्यांनी पुण्यातून या विमानांचं संचलन सुरु केलं.

जेआरडी टाटांनी कुठला रेकॉर्ड केला असं नाही, तर जेआरडींची आई भारतात कार चालवणारी पहिली महिला होती. त्या फ्रान्सच्या असल्यामुळे त्यांचं सगळं बालपण फ्रान्समध्येच गेलं. (Tata sons to buy JRD Tata’s old love Air India)

टाटा एअरलाईन्स व्यवस्थित सुरु होती. मात्र दुसऱ्या महायुद्धादरम्यान हवाई सेवा बंद करावी लागली. थेट 1946 मध्ये विमान वाहतूक पुन्हा सुरु झाली. तेव्हा टाटांनी या विमानाचं नाव बदलून एअर इंडिया लिमिटेड केलं. ही कंपनी पब्लिक लिमिटेड झाली. स्वातंत्र्यानंतर 1947 ला एअर इंडियाची 49 टक्के हिस्सेदारी केंद्र सरकारने विकत घेतली आणि 1953 ला या एअरलाईन्सचं राष्ट्रीयकरण झालं.

आता हीच एअरलाईन्स तोट्यात आहे. सरकारला हिचा खर्च झेपत नाही. त्यामुळे सरकारने ही विमान कंपनी विकण्यास काढली आहे. ही कंपनी विकत घेण्यासाठी पुन्हा एकदा टाटा सन्सने कंबर कसली आहे. यासाठी टाटा सन्सकडून एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्टही सरकारकडे देण्यात आला आहे. 28 डिसेंबरला ही कंपनी विकण्यासाठी बोली लागणार आहे. त्यावेळी ही कंपनी पुन्हा ताब्यात मिळावी यासाठी टाटा सन्स आपली पूर्ण ताकद लावणार आहे.

संबंधित बातम्या :

Ratan Tata | दिलदार रतन टाटांची दानत, कोरोना रोखण्यासाठी तब्बल 500 कोटींची मदत

(Tata sons to buy JRD Tata’s old love Air India)

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक