AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टाटांची जुनी ‘प्रेयसी’, जिच्याकडे कंपनी पुन्हा एकदा आकर्षित

एअर इंडिया तोट्यात असून सरकारला तिचा खर्च झेपत नाही. त्यामुळे सरकारने ही विमान कंपनी विकण्यास काढली आहे.

टाटांची जुनी 'प्रेयसी', जिच्याकडे कंपनी पुन्हा एकदा आकर्षित
| Updated on: Dec 14, 2020 | 3:19 PM
Share

मुंबई : टाटांच्या जुन्या ‘प्रेयसी’कडे कंपनी पुन्हा एकदा आकर्षित झाली आहे. आता टाटांची जुनी प्रेमिका कोण? हा प्रश्न कोणाच्याही मनात येईल, तर ही प्रेमिका आहे एअर इंडिया… तीच एअरलाईन्स जी टाटाने देशाला समर्पित केली. मात्र त्याच एअरलाईन्सची आर्थिक परिस्थिती सध्या कमकुवत आहे. त्यामुळेच टाटाने ही एअरलाईन्स पुन्हा खरेदी करण्याचा विचार सुरु केला आहे. (Tata sons to buy JRD Tata’s old love Air India)

गोष्ट आहे 1932 ची… स्वातंत्र्याच्याही आधीची… जेआरडी टाटांनी भारताच्या विमान वाहतुकीच्या इतिहासातील पहिलं विमान उडवलं… बरोबर, खुद्द जेआरडी टाटाच या विमानाचे पायलट होते. Puss Moth नावाच्या या विमानात बसून टाटांनी थेट कराचीहून हवेत झेप घेतली आणि हे विमान उतरलं आपल्या मुंबईत जुहूजवळ.

टाटांच्या या विमानाच्या उड्डाणानंतर कमर्शिअल विमान वाहतुकीची सुरुवात झाली. त्यानंतर टाटांनी कधीही मागे पाहिलं नाही. टाटा एअरलाईन्स सुरु झाली आणि त्याचे पहिले पायलट होते होमी भरुचा टाटा. तर जेआरडी टाटा दुसरे पायलट.

जुहूजवळच्या एका मातीच्या रनवेवरुन विमान उड्डाण भरु लागलं. मात्र पावसाळ्यात हा रनवे ओला व्हायचा. त्यामुळे विमानांचं उड्डाण शक्य व्हायचं नाही. या अडचणीतही टाटांनी हार मानली नाही. त्यांनी पुण्यातून या विमानांचं संचलन सुरु केलं.

जेआरडी टाटांनी कुठला रेकॉर्ड केला असं नाही, तर जेआरडींची आई भारतात कार चालवणारी पहिली महिला होती. त्या फ्रान्सच्या असल्यामुळे त्यांचं सगळं बालपण फ्रान्समध्येच गेलं. (Tata sons to buy JRD Tata’s old love Air India)

टाटा एअरलाईन्स व्यवस्थित सुरु होती. मात्र दुसऱ्या महायुद्धादरम्यान हवाई सेवा बंद करावी लागली. थेट 1946 मध्ये विमान वाहतूक पुन्हा सुरु झाली. तेव्हा टाटांनी या विमानाचं नाव बदलून एअर इंडिया लिमिटेड केलं. ही कंपनी पब्लिक लिमिटेड झाली. स्वातंत्र्यानंतर 1947 ला एअर इंडियाची 49 टक्के हिस्सेदारी केंद्र सरकारने विकत घेतली आणि 1953 ला या एअरलाईन्सचं राष्ट्रीयकरण झालं.

आता हीच एअरलाईन्स तोट्यात आहे. सरकारला हिचा खर्च झेपत नाही. त्यामुळे सरकारने ही विमान कंपनी विकण्यास काढली आहे. ही कंपनी विकत घेण्यासाठी पुन्हा एकदा टाटा सन्सने कंबर कसली आहे. यासाठी टाटा सन्सकडून एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्टही सरकारकडे देण्यात आला आहे. 28 डिसेंबरला ही कंपनी विकण्यासाठी बोली लागणार आहे. त्यावेळी ही कंपनी पुन्हा ताब्यात मिळावी यासाठी टाटा सन्स आपली पूर्ण ताकद लावणार आहे.

संबंधित बातम्या :

Ratan Tata | दिलदार रतन टाटांची दानत, कोरोना रोखण्यासाठी तब्बल 500 कोटींची मदत

(Tata sons to buy JRD Tata’s old love Air India)

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.