AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! ज्याची भीती होती तेच घडलं, इराणचं आत्मघाती पाऊल, जगाचा थरकाप, ट्रम्प यांना सर्वात मोठा धक्का,थेट अमेरिकेच्या…

मध्य पूर्वेतून मोठी बातमी समोर येत आहे, अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविरामावर चर्चा सुरू असतानाच आता इराणने अमेरिकेला सर्वात मोठा धक्का दिला आहे. यामुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे.

मोठी बातमी! ज्याची भीती होती तेच घडलं, इराणचं आत्मघाती पाऊल, जगाचा थरकाप, ट्रम्प यांना सर्वात मोठा धक्का,थेट अमेरिकेच्या...
Iran AttackImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 06, 2026 | 7:07 PM
Share

मध्य पूर्वेतून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. एकीकडे अमेरिका आणि इराणमध्ये पूर्ण युद्धविरामावर चर्चा सुरू आहे. मात्र दुसरीकडे आता पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. इराणने मध्य पूर्वेत हाहाकार उडवला आहे. अमेरिकेसोबत संघर्ष सुरू असतानाच इराणने शनिवारी मोठं आत्मघाती पाऊल उचललं आहे. इराणच्या या निर्णयामुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे. इराणने थेट बहरीन आणि कुवेतवर मोठा हल्ला केला आहे. बहरीन आणि कुवेत हे अमेरिकेचे सर्वात जवळचे मित्र राष्ट्र आहेत. त्यामुळे आता इराणने बहरीन आणि कुवेतवर हल्ला करून थेट अमेरिकेला इशारा दिल्याचं बोललं जात आहे. इराणने एकामागून एक अनेक मिसाईल बहरीन आणि कुवेतवर डागल्या आहेत. यामुळे आता बहरीन आणि कुवेतनं देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. अमेरिकेसाठी हा इराणचा मोठा धक्का मानला जात आहे.

अमेरिकेकडून काही आखाती देशांना ते आपले मित्र आहेत, असं भासवून त्यांच्या एअरबेसवरून इराणवर हल्ले केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी असाच एक हल्ला अमेरिकेनं इराणवर केला होता. आता या हल्ल्याचा बदला इराणने बहरीन आणि कुवेतवर हल्ला करून घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना वाटत होतं की स्ट्रेट ऑफ होर्मुजवर नाकेबंदी केल्यामुळे इराण गुडघे टेकवेल परंतु सध्या तरी याचा उलटा परिणाम होताना दिसत आहे, इराणने माघार न घेता थेट बहरीन आणि कुवेतवर हल्ला केला आहे. इराणने अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर हल्ला करून अमेरिकेला एक प्रकारे इशाराच दिला आहे.

मध्य पूर्वेत पुन्हा तणाव वाढला

28 फेब्रुवारी रोजी अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्धाला सुरुवात झाली होती. तब्बल 40 दिवस हे युद्ध सुरू होतं. या युद्धात अमेरिका आणि इस्त्रायलकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं. तर दुसरीकडे इराणने देखील अमेरिकन सैन्य तळांवर आणि इस्त्रायलवर भीषण मिसाईल हल्ले केले. दरम्यान त्यानंतर युद्धविराम झाला. परंतु आता इराणने कुवेतवर आणि बहरीनवर हल्ला केल्यामुळे पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात