AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Terror attack | भारतीय सैन्याच्या गाडीवर दहशतवाद्यांचा हल्ला, 3 जवान शहीद

जम्मू-काश्मीरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. दहशतवाद्यांनी भारतीय सैन्याच्या ट्रकवर हल्ला केलाय. या हल्ल्यात भारतीय लष्कराचे तीन जवान शहीद झाले आहेत. तर तीन जवान जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Terror attack | भारतीय सैन्याच्या गाडीवर दहशतवाद्यांचा हल्ला, 3 जवान शहीद
| Updated on: Dec 21, 2023 | 10:09 PM
Share

श्रीनगर | 21 डिसेंबर 2023 : जम्मू-काश्मीरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. दहशतवाद्यांनी भारतीय सैन्याच्या ट्रकवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात भारतीय लष्कराचे तीन जवान शहीद झाले आहेत. तर तीन जवान जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. भारतीय सैन्याकडून हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना तोडीस तोड उत्तर दिलं जात आहे. जवान आणि दहशवाद्यांमध्ये सध्या चकमक सुरु आहे. भारतीय सैन्याकडून दहशतवाद्यांना जीवंत पकडण्याचा किंवा त्यांना कंठस्नान घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत. भारतीय सैन्याचा मोठा फौजफाटा घटनास्थळाकडे रवाना झाला आहे.

संबंधित घटना ही जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात घडली आहे. विशेष म्हणजे महिन्याभरातील ही दुसरी घटना आहे. हा हल्ला थानामंडी परिसरात झाला. गेल्या महिन्यात राजौरीच्या कालाकोट येथे सैन्य दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन कॅप्टन आणि जवानही शहीद झाले होते. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. त्यानंतर पुन्हा दहशतवादी हल्ल्याची घटना घडली आहे.

संबंधित परिसर हा दहशतवाद्यांचा अड्डाच समजला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये या परिसरात भारतीय सैन्याच्या जवानांवर अनेकदा हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. यावर्षी एप्रिल-मे महिन्यात राजौरी-पुंछमध्ये झालेल्या हल्ल्यात 10 जवान शहीद झाले होते. या परिसरात सातत्याने जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक होत असते. गेल्या दोन वर्षात दहशतवादविरोधी अभियानाअंतर्गत 35 पेक्षा जास्त सैनिक शहीद झाले आहेत.

Follow Us
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....