AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरसंघचालकांच्या धर्म परिवर्तनासंबंधीच्या त्या वक्तव्याची एकच चर्चा, मोहन भागवत म्हणाले काय?

RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशातील धर्म परिवर्तनावर गंभीर मंथन केले. हिंदूच्या धर्म परिवर्तनावरून देशात अनेकदा वाद विवाद झाले. पण भागवतांच्या वक्तव्याने आता नवीन चर्चा होणार असं दिसतंय.

सरसंघचालकांच्या धर्म परिवर्तनासंबंधीच्या त्या वक्तव्याची एकच चर्चा, मोहन भागवत म्हणाले काय?
सरसंघचालक मोहन भागवतImage Credit source: गुगल
| Updated on: Apr 13, 2025 | 9:23 AM
Share

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या औरंगजेबापासून ते त्यापूर्वीच्या काही वक्तव्यांनी संघाची भूमिका ठसठशीतपणे समोर आली आहे. आता धर्म परिवर्तनाविषयी त्यांनी गंभीर चिंतन देशासमोर मांडले. देशातील धर्म परिवर्तनाविषयीच्या त्यांच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. धर्म परिवर्तनाविषयीची काही कारणे नेहमी अधोरेखित करण्यात येतात. त्याविषयी भागवतांनी केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आले आहे. काय म्हणाले सरसंघचालक?

सरसंघचालक मोहन भागवत शनिवारी वलसाड जिल्ह्यातील श्री भाव भावेश्वर महादेव मंदिराच्या रौप्य महोत्सवी उत्सवात सहभागी झाले. त्यांनी देशात सुरू असलेल्या धर्म परिवर्तनाच्या मुद्दाला हात घातला. त्यांनी या विषयावर त्यांचे विचार मांडले. धर्म हा सर्वांना सुखाकडे घेऊन जाऊ शकतो. आमिष, लोभ आणि भीतीने धर्म परिवर्तन करायला नको, असे भागवत म्हणाले.

सरसंघचालक मोहन भागवत यांनी धर्म परिवर्तनाच्या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त केली. आमिष आणि भीती आधारे धर्म परिवर्तन व्हायला नको, कारण खरा धर्म हा सर्वांना सुख आणि शांती देतो, असे ते म्हणाले. त्यांनी महाभारताचा उल्लेख केला आणि प्रत्येकाने धार्मिक विधी नियमितपणे करावेत, असे म्हटले.

आमिष आणि भीतीला बळी पडू नका

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे शनिवारी वलसाड येथे बोलत होते. आपल्या दैनंदिन जीवनात आमिष आणि प्रलोभनांचा सामना करावा लागू शकतो. या गोष्टी त्यांना त्यांच्या धर्मापासून दूर करू शकतात. पण धर्म हाच सर्वांना आनंदाकडे नेऊ शकतो. वलसाड जिल्ह्यातील बारूमल येथील सदगुरू धाममध्ये श्री भाव भावेश्वर महादेव मंदिराच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात त्यांनी त्यांचे विचार मांडले. लोभ आणि भीतीच्या प्रभावाखाली कोणत्याही परिस्थितीत धर्म बदलू नये, असे आवाहन त्यांनी केले.

आम्हाला लढायचे नाही

सरसंघचालक म्हणाले की आम्हाला संघटित कसे व्हायचे हे माहिती आहे. आम्ही संघटित राहू इच्छितो. आम्हाला लढायचे नाही. पण आपल्याला स्वतःचे रक्षण करावे लागेल. कारण आजही अशा काही शक्ती आहेत, ज्या धर्म परिवर्तन करू इच्छितात. जेव्हा आपल्या दैनंदिन जीवनात अशा शक्ती नसल्या तरी लोभ आणि मोहाच्या घटना घडतात.

Follow Us
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची...शिवसेनेच्या सुनावणीत काय काय घडलं?
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली अन्.... शिवसेनेच्या सुनावणीत आत्तापर्यंत काय काय घडलं? A टू Z माहिती
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापले
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापलेच, नेमकं काय घडलं?
रस्ते आहेत, अपघात होणारच; बालकाच्या मृत्यूनंतर नेत्याचं धक्कदायक विधान
रस्ते आहेत तर अपघात होणारच; भोरमधील बालकाच्या मृत्यूनंतर शंकर मांडेकरांच्या विधानाने खळबळ
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोस
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील...
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील बड्या नेत्याची सुचक प्रतिक्रिया
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल...
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल... नेमकं काय घडणार?
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता - कपिल सिब्बल
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम'...
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम' युक्तिवाद; सुनावणीत काय दाखला दिला?
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद!
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?