AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या हिंदी भाषिक राज्यालाच हिंदीचे वावडे, आता या विषयापासून सुरू होणार बोर्डाची परीक्षा

या हिंदी भाषिक राज्यालाच हिंदीचे वावडे असल्याचे समोर आले आहे. माध्यमिक शिक्षण परिषद 2026 मध्ये इयत्ता 10 वी आणि इयत्ता 12 वीच्या बोर्ड परीक्षेत बदल झाला आहे.

या हिंदी भाषिक राज्यालाच हिंदीचे वावडे, आता या विषयापासून सुरू होणार बोर्डाची परीक्षा
या बोर्डाला हिंदीचे वावडे
| Updated on: Sep 09, 2025 | 4:19 PM
Share

UP Board Exam 2026 : उत्तर प्रदेश बोर्ड परीक्षा 2026 मध्ये मोठा बदल होत आहे. आता इयत्ता 10 वी आणि इयत्ता 12 वीमध्ये परीक्षेची सुरुवात आता हिंदीपासून नाही तर इतर विषयापासून सुरू होईल. बोर्डाच्या अधिकाऱ्यानुसार, पहिल्या दिवशी हिंदीचा पेपर असेल तर विद्यार्थ्यांवर मोठा दबाव येतो आणि त्यामुळे त्याच्या इतर पेपरवर परिणाम होतो असा दावा केला आहे. एकीकडे महाराष्ट्रासारख्या राज्यात पहिलीपासून हिंदी लागू करण्यावरून वाद उफळला होता. त्यात युपी बोर्डाच्या निकालाने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

नवीन निर्णयानुसार, बोर्डाच्या परीक्षेच्या पहिल्या दिवशी हिंदीचा पेपर नसेल. तर त्याऐवजी सोप्या विषयाचा पेपर होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांवर कोणत्याही आणि कसल्याही प्रकारचा तणाव येणार नाही. इतर पेपरवर या तणावाचा कोणताही परिणाम होणार नाही असे बोर्डाला वाटते.

का होत आहे हा बदल?

बोर्ड अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, हिंदी भाषेचा पहिला पेपर असल्यावर विद्यार्थ्यांवर आपोआप मानसिक दबाव येतो. ते एकदम घाबरून जातात. त्याचा परिणाम पुढील पेपरवर सुद्धा होतो. या मानसिक दबावापोटी हिंदी भाषिक मुलं, हिंदीच्याच विषयात नापास होण्याचे प्रमाण वाढले आहे, याकडे अधिकाऱ्याने लक्ष वेधले आहे. तसा हिंदी हा स्कोरिंग विषय, अधिक गुण प्राप्त होण्याचा विषय मानल्या जातो. पण विद्यार्थ्यांवर मानसिक दबाव आल्याने त्यांना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळत असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.

आता नवीन निर्णय काय?

नवीन निर्णयानुसार, पहिल्या दिवशी हिंदी पेपर नसेल. त्याऐवजी सोपा पेपर असेल. या बदलामुळे विद्यार्थ्यावर मानसिक दबाव येणार नाही. बोर्डाची परीक्षा म्हटल्यावर अगोदरच विद्यार्थी तणावात असतात. त्यांच्यावर अधिक गुण मिळवण्यासाठी मनौवैज्ञानिक दबाव येतो. सोप्या विषयाचा पेपर असेल तर बोर्ड परीक्षेच्या वातावरणाशी विद्यार्थी पहिल्या दिवशी जुळवून घेईल असे अधिकाऱ्यांना वाटते.

वृत्तानुसार, उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता 10 वी आणि इयत्ता 12 वीची येत्या तीन-चार महिन्यांनी होणाऱ्या परीक्षेच्या तारखा लवकरच तयार करणार आहे. त्यासाठीचे नियोजन सुरू झाले आहे. मुलांवर परीक्षेचा कोणताही ताण येणार नाही, यासाठी बोर्ड कसोशिने प्रयत्न करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Follow Us
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल