AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

School : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील इतक्या हजार शाळांनी तोडला दम, शिक्षकांच्या नोकरीवर आली गदा, विद्यार्थी शाळेतून झाले बेदखल..

School : कोरोनाचा मोठा वाईट परिणाम देशातील शिक्षण क्षेत्रावर पडला आहे. इतक्या हजार शाळांना याकाळात टाळे लागले..

School : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील इतक्या हजार शाळांनी तोडला दम, शिक्षकांच्या नोकरीवर आली गदा, विद्यार्थी शाळेतून झाले बेदखल..
शाळेत झालेल्या भांडणात दुसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यूImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Nov 04, 2022 | 7:37 PM
Share

नवी दिल्ली : कोरोना (Covid-19) आपल्यासोबत अनेक चांगल्या गोष्टी ही घेऊन गेला. अनेकांचे प्रियजन गेले. अनेकांच्या नोकऱ्या (Jobs) गेल्या. अनेक क्षेत्रात कोरोनाचे दुष्परिणाम दिसून येतात. सर्वाधिक फटका बसला तो शिक्षण क्षेत्राला. शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी आणि शिक्षकांना (Students And Teacher) मोठी किंमत चुकवावी लागली.

भारतातील शालेय शिक्षणासाठी एकात्मिक जिल्हा शिक्षण माहिती प्रणाली प्लसचा (UDISE Plus) अहवाल समोर आला आहे. 2021-22 मधील हा अहवाल आहे. यामध्ये देशातील शिक्षणाची विदारक स्थिती समोर आली आहे.

या अहवालानुसार, देशातील जवळपास 20,000 शाळा बंद पडल्या आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या शाळांना ताळे लागले. देशभरातील एकूण शाळांपैकी एक टक्के शाळा बंद पडल्या आहेत.

त्याचा परिणाम शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर झाला. सर्वाधिक फटका बसला तो खासगी शाळांना. देशातील जवळपास 1.89 लाख शिक्षकांच्या नोकरीवर गदा आली. एकूण शिक्षकांपैकी दोन टक्के शिक्षकांना या क्षेत्राला रामराम ठोकावा लागला.

कमाई घटल्याने, नोकऱ्या गेल्याने अनेक पालकांनी त्यांच्या मुलांना खासगी शाळांमधून काढून सरकारी शाळांमध्ये घातले. त्यामुळे खासगी शाळांचे आलेले अमाप पिक एकदम गायब झाले. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत दुप्पट विद्यार्थ्यांनी सराकरी शाळांमध्ये प्रवेश घेतला.

अहवालानुसार, शाळांची एकूण संख्या 2020-21 मध्ये 15.09 लाख होती. 2021-22 मध्ये ही संख्या 14.89 लाख इतकी झाली. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत शिक्षण क्षेत्रात मोठी पडझड झाली. यापूर्वी 2018-19 मध्ये शाळांची संख्या घसरली होती.

कोरोनाच्या समाजाच्या प्रत्येक घटकावर मोठा परिणाम झाला. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. काहींच्या वेतनात कपात करण्यात आली. परिणामी पालकांनी खासगी शाळांच्या अमाप शुल्काच्या चिंतेने दाखला काढला.

अहवालानुसार, दुसऱ्या लाटेदरम्यान, सरकारी शाळांमध्ये 83.35 लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. तर यापूर्वी खासगी शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी लागलेली चढाओढ कमी झाली. खासगी शाळांमध्ये 68.85 लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.

सर्वाधिक फटका मध्यप्रदेश राज्यात बसला. 6,457 सरकारी शाळांमधील आणि 1167 खासगी शाळांमधील विद्यार्थी संख्येत मोठी घसरण झाली. तर 24 टक्के खासगी शाळा कायमच्या बंद झाल्या.

प्रत्येक राज्यात शाळा बंद होण्याचे प्रमाण आहे. तिथल्या शिक्षकांच्या नोकऱ्या त्यामुळे गेल्या. तर विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाणही चिंताजनक आहे. पूर्व प्राथमिक शिक्षणावर त्याचा मोठा परिणाम दिसून आला.

या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या 11.5 टक्क्यांपर्यंत घसरली तर प्राथमिक शिक्षणावरही त्याचा मोठा परिणाम दिसून आला. कोरोनाने या शाळांमधील अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले. इयत्ता 1-5 पर्यंत 1.79 लाख विद्यार्थी शाळेत परतले नाहीत.

Follow Us
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.