AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5000 कोटींची संपत्ती, तरीही घरात धुतात भांडी, कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक

थायरोकेअर कंपनीचे संस्थापक आणि जवळपास 5 हजार कोटींच्या संपत्तीचे मालक डॉ. वेलुमणी यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत म्हटले आहे की, तुम्ही कितीही श्रीमंत असाल तरी संबंध सुधारण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. नेमकं ते काय म्हणालेत जाणून घेऊया.

5000 कोटींची संपत्ती, तरीही घरात धुतात भांडी, कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक
velumaniImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 10, 2025 | 5:33 PM
Share

पाच हजार कोटींपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या अब्जाधीशांचे आयुष्य कसे असेल याची कल्पना करा. एक मोठा व्यवसाय आणि एक जागतिक नाव आणि सर्व लक्झरी. असा माणूस स्वयंपाक घरातील भांडी धुवेल आणि त्याची बायको स्वेयंपाक करेल, हे तुम्हालाही मान्य होणार नाही. पण, सत्य आहे. एका भारतीय व्यावसायिकाने नुकतेच सोशल मीडियावर फोटो पोस्ट केली आहे, त्यांनी विवाहितांना एक संदेश आणि सूचनाही दिली. नेमकी काय सूचना आहे, जाणून घेऊया.

आम्ही थायरोकेअरचे संस्थापक डॉ. ए. वेलुमणी यांच्याबद्दल बोलत आहोत. ज्यांनी नुकतेच दोन प्रकारच्या लोकांबद्दल आपले मत व्यक्त केले, एक जो स्वयंपाक शिकतो आणि दुसरा जो त्याला वेळेचा अपव्यय मानतो. त्यांच्या मते, पहिल्या श्रेणीतील लोक मजबूत नातेसंबंध आणि आनंदी वैवाहिक जीवनाचा आनंद घेतात, तर दुसऱ्या श्रेणीतील लोक श्रीमंत कुटुंबात लग्न केले तरीही अनेकदा नातेसंबंध टिकवण्यासाठी संघर्ष करतात.

अब्जाधीशांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर त्यांची दिवंगत पत्नी सुमती वेलुमणी यांना श्रद्धांजली अर्पण करताना आणि लिहिले की, “स्वयंपाक करण्याची कला हे एक आवश्यक जीवन कौशल्य आहे. विशेषत: ज्या कुटुंबांचे उत्पन्न 5 ते 25 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. त्यांनी असे सुचवले की, जे पालक आपल्या मुलांना स्वयंपाक कसे करावे हे शिकवत नाहीत त्यांना नंतर पश्चात्ताप होऊ शकतो, कारण भावनिक संबंध तयार करण्यात अन्न महत्वाची भूमिका बजावते. तुम्ही कितीही श्रीमंत असलात तरीही.

डॉ. वेलुमणी म्हणाले की, एसबीआयमध्ये व्यावसायिक कारकीर्द असूनही त्यांच्या पत्नीने कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि काम अतिशय चोखपणे हाताळले. पत्नी स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असताना ते भांडी धुण्याचे काम आनंदाने करायचे, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या भागीदारीत हे एक छोटेसे पण महत्त्वाचे योगदान होते.

डॉ. वेलुमणी यांच्या या पोस्टवर सोशल मीडियावरही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. एका युजरने लिहिले की, “एकत्र स्वयंपाक करणे हे केवळ एक कौशल्य नाही, तर ते नातेसंबंध मजबूत करते.” खोल नाती केवळ पैसा मिळवण्यासाठी बांधली जात नाहीत. “मी अलीकडेच माझ्या मुलाबरोबर स्वयंपाक करण्यास सुरवात केली आहे, जे एक मूलभूत जीवन कौशल्य आहे. अन्नामुळे भावनिक पातळीवरही एकमेकांशी संपर्क साधण्यास मदत होते.

यापूर्वी झिरोधाचे निखिल कामत यांनी सांगितले होते की, जेव्हा ते सिंगापूरमध्ये होते, तेव्हा तेथे भेटलेले बहुतेक लोक घरी स्वयंपाक करत नव्हते आणि काहींच्या घरात स्वयंपाकघर देखील नव्हते. ते म्हणाले की, तिथले लोक बहुतेक बाहेर जेवतात आणि त्याचे कौतुक करतात आणि यामुळे त्यांना वाटले की भारत हा ट्रेंड अनुसरण करू शकतो का, विशेषत: अर्थव्यवस्था आणि जीवनशैलीतील बदलामुळे. याआधी करीना कपूर खानच्या डायटीशियनने म्हटले होते की, श्रीमंत मुलांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. घरी बनवलेले अन्न हे बाहेर खाण्यापेक्षा आरोग्यदायी तर असतेच, पण एकत्र खाल्ल्याने कौटुंबिक बंधही दृढ होतात.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.