AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंसक ट्रॅक्टर मार्चने शेतकरी आंदोलनाच्या अडचणीत वाढ, संसद घेराव रद्द होणार?

हिंसक घटनांमुळे शेतकरी आंदोलनाच्या आगामी काळातील रणनीतीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय

हिंसक ट्रॅक्टर मार्चने शेतकरी आंदोलनाच्या अडचणीत वाढ, संसद घेराव रद्द होणार?
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jan 27, 2021 | 4:49 PM
Share

नवी दिल्ली : मोदी सरकारने मंजूर केलेले नवे तीन कृषी कायदे तात्काळ रद्द करावेत या मागणीसाठी मागील 2 महिन्यांपासून शांततापूर्ण शेतकरी आंदोलन सुरु होतं. मात्र, प्रजासत्ताक दिनी (26 जानेवारी) दिल्लीत काही ठिकाणी शेतकरी आंदोलकांनी आक्रमक रुप धारण केलं आणि हिंसाचार झाला. यामुळे शेतकरी आंदोलनाला मोठा धक्का बसलाय. शेतकरी आंदोलनातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनीही या हिंसक घटनांचा निषेध केलाय. तसेच या हिसेंमागे आंदोलनाबाहेरील काही समाजविघातक घटक असल्याचा आरोप केलाय. असं असलं तरी या हिंसक घटनांमुळे शेतकरी आंदोलनाच्या आगामी काळातील रणनीतीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय (Tractor rally impact farmer protest march on 1 february on parliament whats next plan).

शेतकरी आंदोलनाच्यावतीने 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर होत असताना कृषी कायद्यांचा विरोध करत हे कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी संसदेला घेराव घालण्यात येणार आहे. मात्र, प्रजासत्ताक दिनी झालेल्या घटनाक्रमाने हा नियोजित संसद घेराव होणार की नाही यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. शेतकरी आंदोलनातील समन्वय समितीने आगामी 2 दिवसात आंदोलनाची पुढील रुपरेषा जाहीर करणार असल्याचं म्हटलंय.

मागील 2 महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन अत्यंत शिस्तबद्धपणे सुरु होतं. त्यामुळेच केंद्र सरकारला शेतकऱ्यांसोबत तोडगा काढण्यासाठी अनेकदा चर्चा कराव्या लागल्या आहेत. सरकारकडून थेट आंदोलन दडपण्याचा प्रयत्नही झाला नाही. यामागे या शेतकरी आंदोलनाला देशभरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळालाय. मात्र, हिंसक घटनांनी शेतकरी आंदोलनाच्या याच ताकदीला धक्का बसलाय. त्यामुळे आगामी काळात आंदोलक समन्वयकांकडून अशा घटना होणार नाहीत यासाठी कृती कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे.

हिंसक घटनांनंतर योगेंद्र यादव, राकेश टिकैत आणि इतर अनेक नेत्यांनी या घटनांचा निषेध केलाय. तसेच उपद्रव करणारे लोक आंदोलनाबाहेरील असल्याचं म्हटलं. असं असलं तरी केंद्र सरकारकडून अजूनही आंदोलनावर थेट टीका झालेली नाही. आंदोलनाला मिळणारा देशभरातील पाठिंबा पाहता केंद्राने सावध भूमिका घेतलीय. असं असलं तरी याआधी शेतकरी आंदोलनाच्या पाठिशी उभ्या असलेल्या विरोधी पक्षांनी मात्र हिंसक घटनानंतर सावध भूमिका घेण्यास सुरुवात केली. काँग्रेससह इतर पक्षांनी हिंसक घटनांचा निषेध करत आपल्याला आंदोलनापासून बाजूला केलंय.

आंदोलनाला जवळून पाहणाऱ्या जाणकारांनी मात्र या हिंसक घटनानंतर शेतकरी आंदोलन अधिक सावध होऊन पुढे येईल असं मत व्यक्त केलंय. तसेच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी झालेल्या हिंसक घटनांना सर्व शेतकरी आंदोलनाला जबाबदार धरणंही योग्य नसल्याचं मत व्यक्त केलंय. हिंसक घटनांमुळे शेतकरी नेते देखील व्यथित आहेत, मात्र ते आपल्या मागणीवर ठाम असून शेतकरी आंदोलन सुरुच राहिलं, असंही निरिक्षण नोंदवलं जातंय.

संबंधित बातम्या :

Farmers Tractor Rally : शेतकरी आंदोलकांनी लाल किल्ल्यावर फडकावलेला झेंडा नेमका कशाचा?

‘केंद्र सरकारनं नाटकबाजी थांबवावी’, राजू शेट्टींचा हल्लाबोल, छगन भूजबळही आक्रमक

Fact Check : दिल्लीतल्या ट्रॅक्टर रॅलीला भडकवण्याचा आरोप असलेल्या अभिनेता दिप सिद्धुचं भाजप कनेक्शन? वाचा सविस्तर

व्हिडीओ पाहा :

Tractor rally impact farmer protest march on 1 february on parliament whats next plan

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ